शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चिपळुणात आता मदतीचा ‘महापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

रत्नागिरी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकार उडवला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, सगळा संसार उघड्यावर आला. पुरामुळे ...

रत्नागिरी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकार उडवला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, सगळा संसार उघड्यावर आला. पुरामुळे झालेल्या नुकसानानंतर अनेकजण चिपळूणकरांच्या मदतीला धावले आहेत. जात, धर्म, पंथ सारे विसरून माणुसकीच्या धर्मातून मदतीचा महापूर लाेटला आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पुरामुळे बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय असंख्य लोकांनी काबाडकष्ट करून फुलवलेला संसार उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे ‘होत्याचे नव्हते’ झाल्याने चिपळूणकरांच्या दु:खाने सर्वच हादरले आहेत. प्रशासनाकडून मदतीची हाक देण्यात आली आहे. प्रत्यक्ष प्रशासनाकडे जमा झालेली मदत अल्प आहे. मात्र, कित्येकपटीने लोक, संस्था स्वत:हून मदतीसाठी पूर आलेल्या ठिकाणी पोहोचत आहेत. प्रशासनाकडे २०० किलो तांदूळ, २०० किलो गहू, ५० किलो कडधान्यासह अन्य वस्तूंचे संकलन सुरू आहे. त्यापेक्षा कित्येक पटीने लोक, संस्थांच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. धान्य, खाद्यपदार्थ, दूध, बिस्कीटे, चटई, कपडे, फिनेल, झाडू, भांडी, औषधे, मेणबत्या, माचीस यांची आवश्यकता असून, प्रत्येकाला जे-जे शक्य होईल ती मदत केली जात आहे. ज्यांना मदतीच्या ठिकाणी जाणे शक्य नाही, त्यांनी संस्थांच्या माध्यमातून मदत दिली आहे. अनेक संस्थांनी आपापल्या कार्यालयात संकलन केंद्र उभारले आहे. त्याठिकाणी संकलन सुरू आहे.

रत्नागिरी तालुक्यातील जयगड, भाट्ये, राजीवडा, मिरकरवाडा येथून तातडीने छोट्या बोटी घेऊन नागरिक रेस्क्यू ऑपरेशनसाठी धावले होते. त्यानंतर लोकांच्या राहण्याची व्यवस्था झाली. मात्र, त्यांच्या खाण्याची, कपड्यांची व्यवस्था होणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील विविध गावातील मुस्लिम मोहल्ले, संस्थांनी पुढाकार घेत चपाती, भाजी, खिचडी, पुलाव तयार करून पाठवला. अनेकांनी पाण्याचीही व्यवस्था केली. मुलांसाठी बिस्कीटे, दुधाचे टेट्रापॅक, फरसाण, चिवडा, चकल्या, वेफर्स, लाडू असा खाऊही पाठविण्यात येत आहे. अनेकांनी जुने, नवे कपडे दिले आहेत. कोरोना व संक्रमण याची भीती न बाळगता लोक निव्वळ मदतीसाठी धावत आहेत. कुणी किती मदत केली त्यापेक्षा आपण आणखी काही करू शकतो का, यासाठी धडपड सुरू आहे. नाम फाऊंडेशन, जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान, वैश्य युवा समाज, राष्ट्रसेविका समिती, शिक्षक- कर्मचारी संघटना, हेल्पिंग हॅण्ड, संपर्क युनिक फाऊंडेशनतर्फे मदत देण्यात येत आहे.

------------------------

साफसफाईसाठी मदत

साहित्य, वस्तूंची मदत करण्यात येत असली तरी साफसफाईसाठी मदत होणे गरजेचे आहे. त्यासाठी मनुष्यबळ व पाण्याची आवश्यकता आहे. जयगड येथून दोन पाण्याचे टॅंकर पाठविण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदारांनी पाण्याच्या टाक्या भरून चिपळुणात मदतीसाठी धाव घेतली आहे. कोकणनगर, मिरकरवाडा, चांदेराई, राजीवडा, कर्ला, साखरतर आदी मोहल्ल्यांतील युवकांनी ग्रुप तयार केले असून, पूरजन्य भागातील साफसफाई, चिखल काढण्यासाठी ते मदत करत आहेत.