शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

चिपळुणात आता मदतीचा ‘महापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

रत्नागिरी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकार उडवला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, सगळा संसार उघड्यावर आला. पुरामुळे ...

रत्नागिरी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकार उडवला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, सगळा संसार उघड्यावर आला. पुरामुळे झालेल्या नुकसानानंतर अनेकजण चिपळूणकरांच्या मदतीला धावले आहेत. जात, धर्म, पंथ सारे विसरून माणुसकीच्या धर्मातून मदतीचा महापूर लाेटला आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पुरामुळे बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय असंख्य लोकांनी काबाडकष्ट करून फुलवलेला संसार उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे ‘होत्याचे नव्हते’ झाल्याने चिपळूणकरांच्या दु:खाने सर्वच हादरले आहेत. प्रशासनाकडून मदतीची हाक देण्यात आली आहे. प्रत्यक्ष प्रशासनाकडे जमा झालेली मदत अल्प आहे. मात्र, कित्येकपटीने लोक, संस्था स्वत:हून मदतीसाठी पूर आलेल्या ठिकाणी पोहोचत आहेत. प्रशासनाकडे २०० किलो तांदूळ, २०० किलो गहू, ५० किलो कडधान्यासह अन्य वस्तूंचे संकलन सुरू आहे. त्यापेक्षा कित्येक पटीने लोक, संस्थांच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. धान्य, खाद्यपदार्थ, दूध, बिस्कीटे, चटई, कपडे, फिनेल, झाडू, भांडी, औषधे, मेणबत्या, माचीस यांची आवश्यकता असून, प्रत्येकाला जे-जे शक्य होईल ती मदत केली जात आहे. ज्यांना मदतीच्या ठिकाणी जाणे शक्य नाही, त्यांनी संस्थांच्या माध्यमातून मदत दिली आहे. अनेक संस्थांनी आपापल्या कार्यालयात संकलन केंद्र उभारले आहे. त्याठिकाणी संकलन सुरू आहे.

रत्नागिरी तालुक्यातील जयगड, भाट्ये, राजीवडा, मिरकरवाडा येथून तातडीने छोट्या बोटी घेऊन नागरिक रेस्क्यू ऑपरेशनसाठी धावले होते. त्यानंतर लोकांच्या राहण्याची व्यवस्था झाली. मात्र, त्यांच्या खाण्याची, कपड्यांची व्यवस्था होणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील विविध गावातील मुस्लिम मोहल्ले, संस्थांनी पुढाकार घेत चपाती, भाजी, खिचडी, पुलाव तयार करून पाठवला. अनेकांनी पाण्याचीही व्यवस्था केली. मुलांसाठी बिस्कीटे, दुधाचे टेट्रापॅक, फरसाण, चिवडा, चकल्या, वेफर्स, लाडू असा खाऊही पाठविण्यात येत आहे. अनेकांनी जुने, नवे कपडे दिले आहेत. कोरोना व संक्रमण याची भीती न बाळगता लोक निव्वळ मदतीसाठी धावत आहेत. कुणी किती मदत केली त्यापेक्षा आपण आणखी काही करू शकतो का, यासाठी धडपड सुरू आहे. नाम फाऊंडेशन, जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान, वैश्य युवा समाज, राष्ट्रसेविका समिती, शिक्षक- कर्मचारी संघटना, हेल्पिंग हॅण्ड, संपर्क युनिक फाऊंडेशनतर्फे मदत देण्यात येत आहे.

------------------------

साफसफाईसाठी मदत

साहित्य, वस्तूंची मदत करण्यात येत असली तरी साफसफाईसाठी मदत होणे गरजेचे आहे. त्यासाठी मनुष्यबळ व पाण्याची आवश्यकता आहे. जयगड येथून दोन पाण्याचे टॅंकर पाठविण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदारांनी पाण्याच्या टाक्या भरून चिपळुणात मदतीसाठी धाव घेतली आहे. कोकणनगर, मिरकरवाडा, चांदेराई, राजीवडा, कर्ला, साखरतर आदी मोहल्ल्यांतील युवकांनी ग्रुप तयार केले असून, पूरजन्य भागातील साफसफाई, चिखल काढण्यासाठी ते मदत करत आहेत.