शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

चिपळुणात आता मदतीचा ‘महापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

रत्नागिरी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकार उडवला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, सगळा संसार उघड्यावर आला. पुरामुळे ...

रत्नागिरी : मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकार उडवला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, सगळा संसार उघड्यावर आला. पुरामुळे झालेल्या नुकसानानंतर अनेकजण चिपळूणकरांच्या मदतीला धावले आहेत. जात, धर्म, पंथ सारे विसरून माणुसकीच्या धर्मातून मदतीचा महापूर लाेटला आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पुरामुळे बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय असंख्य लोकांनी काबाडकष्ट करून फुलवलेला संसार उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे ‘होत्याचे नव्हते’ झाल्याने चिपळूणकरांच्या दु:खाने सर्वच हादरले आहेत. प्रशासनाकडून मदतीची हाक देण्यात आली आहे. प्रत्यक्ष प्रशासनाकडे जमा झालेली मदत अल्प आहे. मात्र, कित्येकपटीने लोक, संस्था स्वत:हून मदतीसाठी पूर आलेल्या ठिकाणी पोहोचत आहेत. प्रशासनाकडे २०० किलो तांदूळ, २०० किलो गहू, ५० किलो कडधान्यासह अन्य वस्तूंचे संकलन सुरू आहे. त्यापेक्षा कित्येक पटीने लोक, संस्थांच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. धान्य, खाद्यपदार्थ, दूध, बिस्कीटे, चटई, कपडे, फिनेल, झाडू, भांडी, औषधे, मेणबत्या, माचीस यांची आवश्यकता असून, प्रत्येकाला जे-जे शक्य होईल ती मदत केली जात आहे. ज्यांना मदतीच्या ठिकाणी जाणे शक्य नाही, त्यांनी संस्थांच्या माध्यमातून मदत दिली आहे. अनेक संस्थांनी आपापल्या कार्यालयात संकलन केंद्र उभारले आहे. त्याठिकाणी संकलन सुरू आहे.

रत्नागिरी तालुक्यातील जयगड, भाट्ये, राजीवडा, मिरकरवाडा येथून तातडीने छोट्या बोटी घेऊन नागरिक रेस्क्यू ऑपरेशनसाठी धावले होते. त्यानंतर लोकांच्या राहण्याची व्यवस्था झाली. मात्र, त्यांच्या खाण्याची, कपड्यांची व्यवस्था होणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील विविध गावातील मुस्लिम मोहल्ले, संस्थांनी पुढाकार घेत चपाती, भाजी, खिचडी, पुलाव तयार करून पाठवला. अनेकांनी पाण्याचीही व्यवस्था केली. मुलांसाठी बिस्कीटे, दुधाचे टेट्रापॅक, फरसाण, चिवडा, चकल्या, वेफर्स, लाडू असा खाऊही पाठविण्यात येत आहे. अनेकांनी जुने, नवे कपडे दिले आहेत. कोरोना व संक्रमण याची भीती न बाळगता लोक निव्वळ मदतीसाठी धावत आहेत. कुणी किती मदत केली त्यापेक्षा आपण आणखी काही करू शकतो का, यासाठी धडपड सुरू आहे. नाम फाऊंडेशन, जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान, वैश्य युवा समाज, राष्ट्रसेविका समिती, शिक्षक- कर्मचारी संघटना, हेल्पिंग हॅण्ड, संपर्क युनिक फाऊंडेशनतर्फे मदत देण्यात येत आहे.

------------------------

साफसफाईसाठी मदत

साहित्य, वस्तूंची मदत करण्यात येत असली तरी साफसफाईसाठी मदत होणे गरजेचे आहे. त्यासाठी मनुष्यबळ व पाण्याची आवश्यकता आहे. जयगड येथून दोन पाण्याचे टॅंकर पाठविण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदारांनी पाण्याच्या टाक्या भरून चिपळुणात मदतीसाठी धाव घेतली आहे. कोकणनगर, मिरकरवाडा, चांदेराई, राजीवडा, कर्ला, साखरतर आदी मोहल्ल्यांतील युवकांनी ग्रुप तयार केले असून, पूरजन्य भागातील साफसफाई, चिखल काढण्यासाठी ते मदत करत आहेत.