शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; रघुवीर घाटात दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:52 IST

राजापूरमध्ये अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लांजा तालुक्यातील जावडे येथील वहाळाला पूर आल्यामुळे रावारी व बापेरे तेलीवाडी या गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देनद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

 रत्नागिरी : सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूरमध्ये अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

लांजा तालुक्यात रस्त्यांवर पाणी आल्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. अर्थात या पावसामुळे शेतीच्या कामांनी मात्र वेग घेतला आहे. आज, शुक्रवारी आषाढी एकादशी असल्याने पाऊस अधिक जोर घेणार, असा अंदाज आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री जगबुडी आणि वाशिष्ठी पुलांवरून बंद करण्यात आलेली वाहतूक गुरुवारी सकाळी पूर्ववत झाली आहे. मंगळवारपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही दिवसभर सुरू होता. गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे राजापूर शहरातील अर्जुना नदी आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी आले. नगर परिषदेने सतर्कतेचा भोंगा वाजविल्यानंतर राजापुरातील सर्व शाळा तत्काळ सोडून देण्यात आल्या. वाढत्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. पाणी वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे व्यापाºयांनी तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला.

रघुवीर घाटात आकल्पे गावानजीक दरड कोसळल्यामुळे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांचा संपर्क तुटला. बुधवारी रात्री ही दरड कोसळली. सातारा जिल्ह्यातील १५ गावांचा खेड तालुक्याशी संपर्क असतो. या गावांशी आता पूर्ण संपर्क तुटला आहे. खेडचे तहसीलदारशिवाजी जाधव यांनी तेथे भेट दिली असून, दरड हटविण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका लांजा तालुक्यातील जावडे येथील वहाळाला पूर आल्यामुळे रावारी व बापेरे तेलीवाडी या गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या गेल्या २४ तासांतील प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १२७७ मिलिमीटर एवढी एकूण पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत खेडमध्ये सर्वाधिक १४१ मिलिमीटर, तर त्या खालोखाल संगमेश्वर (१२३ मिलिमीटर), दापोली (११६ मिलिमीटर) तालुक्यात पाऊस झाला आहे. आतापर्यंत मंडणगडमध्ये सर्वाधिक (१७१४ मिलिमीटर) पाऊस झाला असून, सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात (८७९ मिलिमीटर) झाला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडे गुरुवारी सकाळी आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, खेड तालुक्यात हेदली येथील मोहन घाणेकर यांच्या घराचे अंशत: ६,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात कळंवडे येथील तुकाराम वरपे आणि दिनशाद चौघुले यांच्या घरांचे अशंत: नुकसान झाले आहे. वाशिष्ठी नदीच्या नदीच्या पातळीत बुधवारी रात्री वाढ झाल्याने पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील दाभोळ येथील दीपक पितळे यांच्या घराचे अंशत: ४,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील नाझिम काझी यांच्या गाडीवर झाड पडल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी