शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरूच, जगबुडी नदी पुन्हा धोका पातळीवर

By मनोज मुळ्ये | Updated: July 15, 2024 11:33 IST

पुरामुळे बंद झालेली खेड दापोली वाहतूक आज पूर्ववत सुरू झाली

रत्नागिरी : शनिवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरीतील आपला मुक्काम सोमवारीही कायम ठेवला आहे. सोमवार सकाळपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर लांजातील मुचकुंडी नदी आणि राजापूरमधील कोदवली नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर आले आहे. सुदैवाने खेड, दापोली, संगमेश्वर येथील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.रविवारी जिल्ह्यात 145 मिलिमीटर च्या सरासरीने पाऊस पडला असून सर्वाधिक सुमारे नऊ इंचापेक्षा अधिक पाऊस खेड तालुक्यात पडला आहे. शनिवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आपला जोर रविवारीही कायम ठेवला होता तसाच पाऊस सोमवारी सकाळच्या सत्रातही पडत आहे. शनिवार सकाळपासून रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 122 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता तर रविवार सकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 145 किलोमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात कोसळला आहे. त्या खालोखाल चिपळूण, दापोली आणि मंडणगडमध्ये अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी  बरेच नुकसान झाले आहे. खेड शहरात तर मंडणगड आणि दापोली तालुक्यात काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले होते. चिपळूण शहराच्या काही भागातही पुराचे पाणी वाढले होते. सोमवारी सकाळी या चारही ठिकाणच्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूर्व सरला आहे. काल पुरामुळे बंद झालेली खेड दापोली वाहतूक आज पूर्ववत सुरू झाली आहे. रत्नागिरी शहर आणि तालुक्यात मात्र पावसाने चांगला जोर धरला आहे काहीशी तशीच परिस्थिती लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी