शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरूच, जगबुडी नदी पुन्हा धोका पातळीवर

By मनोज मुळ्ये | Updated: July 15, 2024 11:33 IST

पुरामुळे बंद झालेली खेड दापोली वाहतूक आज पूर्ववत सुरू झाली

रत्नागिरी : शनिवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरीतील आपला मुक्काम सोमवारीही कायम ठेवला आहे. सोमवार सकाळपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर लांजातील मुचकुंडी नदी आणि राजापूरमधील कोदवली नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर आले आहे. सुदैवाने खेड, दापोली, संगमेश्वर येथील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.रविवारी जिल्ह्यात 145 मिलिमीटर च्या सरासरीने पाऊस पडला असून सर्वाधिक सुमारे नऊ इंचापेक्षा अधिक पाऊस खेड तालुक्यात पडला आहे. शनिवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आपला जोर रविवारीही कायम ठेवला होता तसाच पाऊस सोमवारी सकाळच्या सत्रातही पडत आहे. शनिवार सकाळपासून रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 122 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता तर रविवार सकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 145 किलोमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात कोसळला आहे. त्या खालोखाल चिपळूण, दापोली आणि मंडणगडमध्ये अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी  बरेच नुकसान झाले आहे. खेड शहरात तर मंडणगड आणि दापोली तालुक्यात काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले होते. चिपळूण शहराच्या काही भागातही पुराचे पाणी वाढले होते. सोमवारी सकाळी या चारही ठिकाणच्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूर्व सरला आहे. काल पुरामुळे बंद झालेली खेड दापोली वाहतूक आज पूर्ववत सुरू झाली आहे. रत्नागिरी शहर आणि तालुक्यात मात्र पावसाने चांगला जोर धरला आहे काहीशी तशीच परिस्थिती लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी