शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, तोणदेतील सांब मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

By अरुण आडिवरेकर | Updated: July 22, 2023 13:44 IST

काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले असून, तोणदे (ता. रत्नागिरी) गावातील शंकराच्या स्वयंभू श्री सांब मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.जिल्ह्यात १८ व १९ जुलै राेजी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली हाेती. मात्र, गेले दाेन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पाणी पातळीत घट झाली हाेती. मात्र, शुक्रवारी (२१ जुलै) रात्रीपासून पावसाचा जाेर वाढला आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून, नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये पसरले आहे. त्यामुळे शेती जलमय झाली आहे.ताेणदे गावात शंकराचे पुरातन स्वयंभू सांब मंदिर आहे. हे मंदिर काजळी नदीकिनारी वसलेले आहे. या मंदिराला काजळी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. मंदिराच्या सभाेवताली पुराचे पाणी साचल्याने मंदिरात जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. हाेडीच्या आधारे या भागातील ग्रामस्थ मंदिरात ये-जा करतात. गतवर्षी श्रावणात हरिनाम सप्ताहाच्या काळात मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला हाेता. त्यावेळी ग्रामस्थांनी हाेडीतून जाऊन मंदिरात हरिनाम सप्ताह साजरा केला हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी