शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

पावसामुळे भात खाचरे तुडूंब भरली, हाताला आलेली पिकं हिरावली

By मेहरून नाकाडे | Updated: October 7, 2022 18:38 IST

रत्नागिरी जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी : हळवे भात तयार झाले असून निमगरवे, गरवे तयार होण्याच्या मार्गावर आहे. तयार भात शेतकऱ्यांनी कापण्यास प्रारंभ केला होता. मात्र दसऱ्यापासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने भात खाचरे पाण्याने तुडूंब भरली असून कापलेले भात पाण्यावर तरंगत असून कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून ‘निसर्गानं दिलं परंतु पावसाने हिरावलं’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी मूळातच पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या. मात्र नंतर पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने लागवडीची कामे मात्र वेळेवर आटोपली. जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. हळवे, गरवे व निमगरवे अशा तीन प्रकारच्या वाणांची लागवड शेतकरी करतात.हळवे भात तयार झाले असून दसऱ्याच्या पूर्वी चांगले कडकडीत ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला होता. कापणीनंतर दोन दिवस भात शेतावरच वाळवून नंतर झोडणी केले जाते. दसऱ्याच्या दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी, शनिवारी तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने भरली आहेत. त्यामुळे कापलेले भात पाण्यावर तरंगत आहे. शिवाय वारे व पाऊस यामुळे तयार उभी शेती जमिनदोस्त झाली आहे. पावसाचे पाण्यामुळे कापलेले भात कुजून दाण्याला कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे.रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातही कापलेल्या भात पाण्यात तरंगत असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही शेतकरी नुकसान टाळण्यासाठी पाण्यातून भात काढून रस्त्याकडेला किंवा कातळावर उंचवटयाच्या ठिकाणी भात वाळविण्यासाठी पसरविण्यात येत आहे. त्यासाठी अधिक मजूर करावे लागत असून भिजलेले भात वजनाला जड असल्याने वाहन भाड्याने घेवून अन्यत्र वाळविण्यासाठी नेण्याकरिता खर्च करावा लागत आहे. गरव्या भातासाठी पाऊस पोषक असला तरी हळव्या भात पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कृषी विभागाने दखल घेत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी