शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

पावसामुळे भात खाचरे तुडूंब भरली, हाताला आलेली पिकं हिरावली

By मेहरून नाकाडे | Updated: October 7, 2022 18:38 IST

रत्नागिरी जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी : हळवे भात तयार झाले असून निमगरवे, गरवे तयार होण्याच्या मार्गावर आहे. तयार भात शेतकऱ्यांनी कापण्यास प्रारंभ केला होता. मात्र दसऱ्यापासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने भात खाचरे पाण्याने तुडूंब भरली असून कापलेले भात पाण्यावर तरंगत असून कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून ‘निसर्गानं दिलं परंतु पावसाने हिरावलं’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी मूळातच पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या. मात्र नंतर पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने लागवडीची कामे मात्र वेळेवर आटोपली. जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. हळवे, गरवे व निमगरवे अशा तीन प्रकारच्या वाणांची लागवड शेतकरी करतात.हळवे भात तयार झाले असून दसऱ्याच्या पूर्वी चांगले कडकडीत ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला होता. कापणीनंतर दोन दिवस भात शेतावरच वाळवून नंतर झोडणी केले जाते. दसऱ्याच्या दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी, शनिवारी तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने भरली आहेत. त्यामुळे कापलेले भात पाण्यावर तरंगत आहे. शिवाय वारे व पाऊस यामुळे तयार उभी शेती जमिनदोस्त झाली आहे. पावसाचे पाण्यामुळे कापलेले भात कुजून दाण्याला कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे.रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातही कापलेल्या भात पाण्यात तरंगत असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही शेतकरी नुकसान टाळण्यासाठी पाण्यातून भात काढून रस्त्याकडेला किंवा कातळावर उंचवटयाच्या ठिकाणी भात वाळविण्यासाठी पसरविण्यात येत आहे. त्यासाठी अधिक मजूर करावे लागत असून भिजलेले भात वजनाला जड असल्याने वाहन भाड्याने घेवून अन्यत्र वाळविण्यासाठी नेण्याकरिता खर्च करावा लागत आहे. गरव्या भातासाठी पाऊस पोषक असला तरी हळव्या भात पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कृषी विभागाने दखल घेत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी