शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

पावसामुळे भात खाचरे तुडूंब भरली, हाताला आलेली पिकं हिरावली

By मेहरून नाकाडे | Updated: October 7, 2022 18:38 IST

रत्नागिरी जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी : हळवे भात तयार झाले असून निमगरवे, गरवे तयार होण्याच्या मार्गावर आहे. तयार भात शेतकऱ्यांनी कापण्यास प्रारंभ केला होता. मात्र दसऱ्यापासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने भात खाचरे पाण्याने तुडूंब भरली असून कापलेले भात पाण्यावर तरंगत असून कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून ‘निसर्गानं दिलं परंतु पावसाने हिरावलं’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी मूळातच पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या. मात्र नंतर पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने लागवडीची कामे मात्र वेळेवर आटोपली. जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. हळवे, गरवे व निमगरवे अशा तीन प्रकारच्या वाणांची लागवड शेतकरी करतात.हळवे भात तयार झाले असून दसऱ्याच्या पूर्वी चांगले कडकडीत ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला होता. कापणीनंतर दोन दिवस भात शेतावरच वाळवून नंतर झोडणी केले जाते. दसऱ्याच्या दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी, शनिवारी तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने भरली आहेत. त्यामुळे कापलेले भात पाण्यावर तरंगत आहे. शिवाय वारे व पाऊस यामुळे तयार उभी शेती जमिनदोस्त झाली आहे. पावसाचे पाण्यामुळे कापलेले भात कुजून दाण्याला कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे.रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातही कापलेल्या भात पाण्यात तरंगत असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही शेतकरी नुकसान टाळण्यासाठी पाण्यातून भात काढून रस्त्याकडेला किंवा कातळावर उंचवटयाच्या ठिकाणी भात वाळविण्यासाठी पसरविण्यात येत आहे. त्यासाठी अधिक मजूर करावे लागत असून भिजलेले भात वजनाला जड असल्याने वाहन भाड्याने घेवून अन्यत्र वाळविण्यासाठी नेण्याकरिता खर्च करावा लागत आहे. गरव्या भातासाठी पाऊस पोषक असला तरी हळव्या भात पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कृषी विभागाने दखल घेत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी