शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस थांबताच वाढला उकाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:53 IST

८ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाची विश्रांती राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

रत्नागिरी : जिल्ह्यात २९ मे पासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घैतली आहे. पण पावसाने उसंत घेताच उकाड्यात वाढ होऊ लागली आहे. रविवारी आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र, त्यामुळे गारवा येण्याऐवजी अधिकच उकाडा वाढला.पावसाने मे महिन्याच्या २० तारखेपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पडण्यास सुरुवात केली. २१ मेपासून पावसाची संततधार सुरू झाली. काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने शेतजमिनीत पाणी भरले. जिल्ह्यातील नद्या, धरणे यांची पात्रे वाढली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ३१ मेपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले.त्यातच केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाल्याचेही हवामान खात्याने जाहीर केले. त्यामुळे ५ जूनपासून मान्सून नियमित होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सलग पडणाऱ्या पावसाने आतापर्यंतच्या कालावधीतील मे महिन्याचा उच्चांक गाठला होता. आतापर्यंत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यावर्षी पडलेल्या पावसाची वेगळी नोंद झाली.मात्र, २९ मेपासून पाऊस पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे पुन्हा कडक ऊन पडायला सुरुवात झाली असून उष्माही वाढला आहे. २६ ते २७ अंशावर पोहोचलेले कमाल तापमान आता पुन्हा ३२ ते ३३ अंशापर्यंत वाढले आहे. त्यामुळे पुन्हा उकाड्याला सुरुवात होऊ लागली आहे.हवामान खात्याने १ आणि २ जून रोजी किरकोळ पावसाची शक्यता व्यक्त केली होती. या दोन दिवसात अगदीच किरकोळ सरी पडल्या. त्यामुळे उकाडा अधिकच वाढला आहे. सध्या ८ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाची विश्रांती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसTemperatureतापमान