शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

पाच महिने धान्य नेले नाही, रेशनकार्ड होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:55 IST

Ration Ratnagiri- ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत धान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य क्षेत्रीय स्तरावर तपासणी होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात यावे, असे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १५,६६१ शिधापत्रिकांचा यात समावेश असून, यापैकी मंगळवारपर्यंत १४,५१० शिधापत्रिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपाच महिने धान्य नेले नाही, रेशनकार्ड होणार रद्दजिल्ह्यात १५ हजाराहून अधिक शिधापत्रिका पुरवठा खात्याच्या रडारवर

शोभना कांबळेरत्नागिरी : ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत धान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य क्षेत्रीय स्तरावर तपासणी होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात यावे, असे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १५,६६१ शिधापत्रिकांचा यात समावेश असून, यापैकी मंगळवारपर्यंत १४,५१० शिधापत्रिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पातंर्गत राज्यात अँिं१ एल्लुं’ी िस्र४ु’्रू ऊ्र२३१्रु४३्रङ्मल्ल र८२३ीे (अीढऊर) ही प्रणाली यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे संगणकीकृत केलेल्या शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंवे वाटप करण्यात येते. हे वाटप करताना काही शिधापत्रिकाधारकांनी काही महिन्यांपासून धान्याची उचल केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत राज्यात सुमारे ७.९० लक्ष शिधापत्रिकेवर धान्याची उचल न झाल्याचे दिसून आले आहे.५ महिने कालावधीपर्यंत धान्याची उचल न केलेल्या या शिधापत्रिका अपात्र, बोगस, अनिच्छुक असण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने अन्न व नागरी पुरवठा विभागाने अशा शिधापत्रिकांची राज्याची आकडेवारी तयार केली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक १७४० आणि प्राधान्य गटातील १४०३३ अशा एकूण १५,७७३ शिधापत्रिकांची नावे जिल्हा पुरवठा विभागाकडे कळवली आहेत. यापैकी ११२ शिधापत्रिका जिल्हा पुरवठा विभागाने रद्द ठरविल्या असून, उर्वरित १५,६६१ शिधापत्रिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४,५१० शिधापत्रिकांवरील धान्य मंगळवारी तात्पुरते निलंबित करण्यात आले. पुढील निर्णय तपासणीनंतर घेतला जाणार आहे.पुरवठा विभागाकडून कार्यवाहीधान्याची उचल न झाल्यामुळे राज्याचे उचलीचे प्रमाण ८८ ते,९० टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहत आहे. तसेच राज्याला दिलेल्या ७००.१६ लक्ष इष्टांकाएवढे लाभार्थी फं३्रङ्म0ल्ल उं१ िटंल्लँीेील्ल३ र८२३ीे (फउटर) प्रणालीवर संगणकीकृत झाल्यामुळे नवीन शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची नोंदणी फउटर या प्रणालीवर करता येत नाही. यामुळे अपात्र लाभार्थ्यांना वगळल्याखेरीज नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करणे शक्य होणार नाही. यासाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून या कार्यवाही सर्व जिल्ह्यांमध्ये प्रारंभ करण्यात आला आहे.

कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये, हा मुख्य उद्देश शासनाचा आहे. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज नाही, अशांना वगळून पात्र नव्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.- सुशांत बनसोडे,प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :TahasildarतहसीलदारRatnagiriरत्नागिरी