शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

नुकसान भरपाई देण्याबाबत शासन उदासिन

By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST

उत्पादक संघाची खंत : आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे सरकारला जाब

रत्नागिरी : अवकाळी पाऊस व हवामानात सातत्याने होणारे बदल, यामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंबा उत्पादक शेतकरी यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. तरीही शासन नुकसान भरपाई देण्यास उदासीन असल्याची खंत रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.आंबा, काजू हंगामाला माहे नोव्हेंबरपासून फवारणी करावी लागते. नोव्हेंबर ते मार्च महिन्यांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे उत्पादकांना परत परत फवारणीची कामे करावी लागली. परिणामी फवारणीसाठी दुप्पट खर्च करावा लागला आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झाडांना आलेला मोहोर मोठ्या प्रमाणात होता. शिवाय उत्पादकांना दिलासा देणारा होता. मोहोराला कणीएवढी फळधारणा झाल्यावर अचानकपणे तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने मोहोर कुजला. त्यामुळे बुरशीसारख्या रोगांनी मोहोरातील कणी खराब होऊन झडून गेल्याने आंबा पिकाचे नुकसान झाले.शासकीय कृषी खात्यातर्फे पिकाचा पंचनामा सुरू आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. आंबा पिकाची ही दयनीय अवस्था आंबा उत्पादक संस्थेने शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. परंतु, शासन याबाबत संवेदनशील दिसत नाही. अजूनही नुकसानात गेलेल्या आंबा उत्पादकांना कोणत्या प्रकारे शासन मदत करणार आहे, याचा अंदाजच बांधता येणे अवघड झाले आहे. शासकीय उदासीन धोरणाबाबत आंबा उत्पादकातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.आंबा पिकाला हेक्टरी नुकसान भरपाईचा फायदा होणार नाही. हा निकष आंबा पिकाला अयोग्य आहे. आंबा पिकासाठी उत्पादकांना मोठा खर्च करावा लागतो. यावर्षी उत्पादनावरील खर्चसुध्दा भागणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादकांना सावरण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीची घोषणा करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा आंबा उत्पादक संस्थेतर्फे करण्यात आली आहे.जिल्हा आंबा उत्पादक संघाने कोकणातील आंबा नुकसानग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईबाबत शासन दाखवत असलेल्या उदासिन धोरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. बागायतदार यातून सावरला नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)