शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

नुकसान भरपाई देण्याबाबत शासन उदासिन

By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST

उत्पादक संघाची खंत : आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे सरकारला जाब

रत्नागिरी : अवकाळी पाऊस व हवामानात सातत्याने होणारे बदल, यामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंबा उत्पादक शेतकरी यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. तरीही शासन नुकसान भरपाई देण्यास उदासीन असल्याची खंत रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.आंबा, काजू हंगामाला माहे नोव्हेंबरपासून फवारणी करावी लागते. नोव्हेंबर ते मार्च महिन्यांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे उत्पादकांना परत परत फवारणीची कामे करावी लागली. परिणामी फवारणीसाठी दुप्पट खर्च करावा लागला आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झाडांना आलेला मोहोर मोठ्या प्रमाणात होता. शिवाय उत्पादकांना दिलासा देणारा होता. मोहोराला कणीएवढी फळधारणा झाल्यावर अचानकपणे तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने मोहोर कुजला. त्यामुळे बुरशीसारख्या रोगांनी मोहोरातील कणी खराब होऊन झडून गेल्याने आंबा पिकाचे नुकसान झाले.शासकीय कृषी खात्यातर्फे पिकाचा पंचनामा सुरू आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. आंबा पिकाची ही दयनीय अवस्था आंबा उत्पादक संस्थेने शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. परंतु, शासन याबाबत संवेदनशील दिसत नाही. अजूनही नुकसानात गेलेल्या आंबा उत्पादकांना कोणत्या प्रकारे शासन मदत करणार आहे, याचा अंदाजच बांधता येणे अवघड झाले आहे. शासकीय उदासीन धोरणाबाबत आंबा उत्पादकातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.आंबा पिकाला हेक्टरी नुकसान भरपाईचा फायदा होणार नाही. हा निकष आंबा पिकाला अयोग्य आहे. आंबा पिकासाठी उत्पादकांना मोठा खर्च करावा लागतो. यावर्षी उत्पादनावरील खर्चसुध्दा भागणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादकांना सावरण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीची घोषणा करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा आंबा उत्पादक संस्थेतर्फे करण्यात आली आहे.जिल्हा आंबा उत्पादक संघाने कोकणातील आंबा नुकसानग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईबाबत शासन दाखवत असलेल्या उदासिन धोरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. बागायतदार यातून सावरला नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)