शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बारसू प्रकल्पग्रस्तांशी सरकारचा संवाद सुरू; तज्ञांची विशेष टीम बैठकीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 10:05 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्थानिकांशी चर्चा

विनोद पवार

राजापूर (जि. रत्नागिरी) : बारसू रिफायनरीवरून राजकीय रणकंदन सुरू असतानाच आता सरकारने स्थानिकांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यानी राजापुरात प्रकल्प समर्थक आणि विरोधक अशी दोघांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. प्रकल्प विरोधकांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी तज्ञांच्या उपस्थितीत ही बैठक सिंग यांनी आयोजित केली होती. दिल्ली, मुंबई येथील एक तज्ञांची विशेष टीम बैठकीला उपस्थित होती.

नाणारला प्रस्तावित रिफायनरी ६० एम. एम. टी. पी. ए. क्षमतेची होती. बारसू येथे २० एम. एम. टी.पी.ए. होणार आहे. त्यामुळे  बारसू आणि नाणार अशी ६० एम. एम. टी. पी. ए.  रिफायनरी उभारावी अशी मागणी  प्रकल्प समर्थक अविनाश महाजन यांनी केली. दरम्यान, बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर हा प्रकल्प पूर्वनियोजित जागी म्हणजे नाणार परिसरात व्हावा, अशी मागणी नाणार परिसरातील शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासनाकडे ८ हजार ५०० हजार एकर जमिनी प्रकल्पासाठी देण्याची संमतीपत्रेही सादर केली आहेत, ज्यांचा विरोध आहे, अशी गावे वगळून उर्वरित गावात हा प्रकल्प करावा, अशी अपेक्षाही स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.  बारसूमध्ये प्रकल्प नेताना त्याचा आवाका कमी केला आहे. तो आधी ठरवलेल्या जागेतच करावा अशी मागणी आहे. 

कोकणचा कायापालट करणारा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात व्हावा, यासाठी आम्ही २०१९च्या दरम्यान शासनाकडे आमच्या साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे सादर केलेली आहेत. आता जर बारसू परिसरात या प्रकल्पाला विरोध असेल तर शासनाने आमच्या साडेआठ हजार एकर जमिनी ताब्यात घ्यावात व रिफायनरी प्रकल्प मूळ नियाेजित परिसरातच करावा.  - प्रल्हाद तावडे, विलये दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती, शेतकरी व सदस्य.बारसू असेल वा नाणार; तो भाग वगळून देवगड व राजापूरचा भाग असेल तिथे हा प्रकल्प होणार असून तो  थांबविण्याची कुणात ताकद नाही.- नितेश राणे, आमदार

टॅग्स :GovernmentसरकारMumbaiमुंबईRatnagiriरत्नागिरीagitationआंदोलन