शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

बारसू प्रकल्पग्रस्तांशी सरकारचा संवाद सुरू; तज्ञांची विशेष टीम बैठकीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 10:05 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्थानिकांशी चर्चा

विनोद पवार

राजापूर (जि. रत्नागिरी) : बारसू रिफायनरीवरून राजकीय रणकंदन सुरू असतानाच आता सरकारने स्थानिकांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यानी राजापुरात प्रकल्प समर्थक आणि विरोधक अशी दोघांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. प्रकल्प विरोधकांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी तज्ञांच्या उपस्थितीत ही बैठक सिंग यांनी आयोजित केली होती. दिल्ली, मुंबई येथील एक तज्ञांची विशेष टीम बैठकीला उपस्थित होती.

नाणारला प्रस्तावित रिफायनरी ६० एम. एम. टी. पी. ए. क्षमतेची होती. बारसू येथे २० एम. एम. टी.पी.ए. होणार आहे. त्यामुळे  बारसू आणि नाणार अशी ६० एम. एम. टी. पी. ए.  रिफायनरी उभारावी अशी मागणी  प्रकल्प समर्थक अविनाश महाजन यांनी केली. दरम्यान, बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर हा प्रकल्प पूर्वनियोजित जागी म्हणजे नाणार परिसरात व्हावा, अशी मागणी नाणार परिसरातील शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासनाकडे ८ हजार ५०० हजार एकर जमिनी प्रकल्पासाठी देण्याची संमतीपत्रेही सादर केली आहेत, ज्यांचा विरोध आहे, अशी गावे वगळून उर्वरित गावात हा प्रकल्प करावा, अशी अपेक्षाही स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.  बारसूमध्ये प्रकल्प नेताना त्याचा आवाका कमी केला आहे. तो आधी ठरवलेल्या जागेतच करावा अशी मागणी आहे. 

कोकणचा कायापालट करणारा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात व्हावा, यासाठी आम्ही २०१९च्या दरम्यान शासनाकडे आमच्या साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे सादर केलेली आहेत. आता जर बारसू परिसरात या प्रकल्पाला विरोध असेल तर शासनाने आमच्या साडेआठ हजार एकर जमिनी ताब्यात घ्यावात व रिफायनरी प्रकल्प मूळ नियाेजित परिसरातच करावा.  - प्रल्हाद तावडे, विलये दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती, शेतकरी व सदस्य.बारसू असेल वा नाणार; तो भाग वगळून देवगड व राजापूरचा भाग असेल तिथे हा प्रकल्प होणार असून तो  थांबविण्याची कुणात ताकद नाही.- नितेश राणे, आमदार

टॅग्स :GovernmentसरकारMumbaiमुंबईRatnagiriरत्नागिरीagitationआंदोलन