शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ganeshotsav : कोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज, २०० फेऱ्यांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:55 IST

कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्जकोकण रेल्वे मार्गावर २०० फेऱ्यांचे नियोजन

रत्नागिरी : कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठीकोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण आधीच संपल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांच्या बोगींची संख्या २ ते ४ ने वाढविण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार अजूनही काही फेऱ्या वाढविण्याची शक्यता आहे.कोकण रेल्वेने २०१८च्या गणेशोत्सवासाठी सुरूवातीला सुमारे दीडशे जादा फेऱ्यांचे नियोजन केले होते. तरीही हजारो लोकांना आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे गणेशोत्सव फेऱ्यांची संख्या वाढवून १८३ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आटोक्यात येत नसल्याने रेल्वेफेऱ्यांची संख्या आता सुमारे २००पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या बोगींची संख्याही गणेशोत्सव काळात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.यंदा १३ सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होणार आहे. कोकणात घरोघरी श्री गणेशाची पूजा-अर्चा केली जाते. गणेशोत्सव हा कोकणचा दिवाळी सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अर्धी मुंबई या सणासाठी कोकणात उतरते, असे म्हटले जाते. या सणासाठी मुंबईत नोकरी-व्यवसाय करणारे कोकणवासीय मोठ्या संख्येने मिळेल त्या वाहनाने कोकणात येतात.

पहिल्या पाच दिवसात गणेशोत्सव साजरा होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर ९, ११ व १३ दिवसांसाठी गणपतींचे वास्तव्य असते. या काळात कोकण रेल्वेकडून प्रवासी वाहतूक व्यवस्था चांगल्याप्रकारे केली जाते. रेल्वेने गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.कोकण रेल्वे सुरक्षितकोकण रेल्वेमार्ग अद्यापही एकेरी आहे. त्यामुळे परस्पर विरोधी दिशेने येणाऱ्या गाड्यांना एकेरी मार्गावरून बाजू देताना बराचवेळ जातो. गणेशोत्सव काळात गाड्या उशिराने धावण्याची समस्या निर्माण होते. परंतु, कोकण रेल्वेची वाहतूक सुरक्षित असल्याने व रस्तेमार्गाच्या तुलनेत कोकण रेल्वेने गणेशोत्सवात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापासूनच रेल्वे फुल्ल झाली आहे.जलद गाड्यांनाही थांबेकोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात केलेल्या जादा रेल्वे फेऱ्यांना प्रवाशांच्या सोईसाठी कोकणात बहुतांश स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे येथून रत्नागिरी, सावंतवाडी, थिवीम, मडगाव दरम्यान जादा रेल्वे फेऱ्या धावणार आहेत. जलद गाड्यांच्या थांब्यांमध्येही उत्सवकाळासाठी वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे