शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दोन महिने अगोदरच गणेश आले आकाराला!

By admin | Updated: July 6, 2016 00:37 IST

चाहुल गणेशोत्सवाची : यंदाच्या बाप्पांनाही महागाईचे ग्रहण!

रत्नागिरी : वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा असते, त्या बाप्पांचे आगमन ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवाला अजून दोन महिने शिल्लक असले तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे. सर्वत्र महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढतो, परिणामी मजुरी, रंग, मातीचे दर वधारल्याने यावर्षी मूर्तींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणून भक्तिभावाने त्या पूजल्या जातात. यावर्षी गणेशोत्सव ४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गतवर्षी अधिक आषाढ महिन्यामुळे १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता. मात्र, यावर्षी १३ दिवस आधी गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे. बहुतांश मूर्तिकारांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माती भिजवून कामाचा शुभारंभ केला आहे. प्रामुख्याने शाडूच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. शाडूची माती गुजरातमधून भावनगर येथून मागवली जाते. भावनगरहून पेण येथे अधिकतम माती आयात केली जाते. तेथून महाराष्ट्रभर मातीचे वितरण केले जाते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे २५० ते २७५ रूपये दराने विकण्यात येणारे मातीचे पोते ३०० ते ३२५ रुपये दराने विकण्यात येत आहे. भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेश मूर्तीचा आकार दिला जातो. मूर्तीवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता आहे. शेतीची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागात सध्या कारागिरांची उणीव भासू लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने वातावरणात आर्द्रता असते. परिणामी मूर्ती वाळण्यास वेळ लागतो. शेतीची कामे सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. तसेच रंगाच्या दरातही वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे बाप्पांच्या मूर्तीच्या दरावर परिणाम होणार आहे.गणपती बाप्पा सर्वांचा लाडका देव असल्याने भक्त त्याला विविध रूपामध्ये पाहणे पसंत करतो. मुंबईतला गणेशोत्सव कोकणवासीयांना भुरळ घालतो. मुंबईमध्ये विविध आकारातील, रूपातील आकर्षक मूर्ती पाहावयास मिळतात. त्यामुळे फोटोच्या स्वरूपात किंवा व्हाट्सअ‍ॅप, मोबाईलव्दारे फोटो पाठवून मूर्ती तयार करण्यास सांगण्यात येत आहे. इंटरनेटवरील सोशल साईट्सव्दारे कार्टून्सपासून पौराणिक कथेतील अर्जुन, परशुराम, महादेव, बालगणेश, हनुमान रूपातील गणेशमूर्ती तयार करण्याची गळ मूर्तिकारास घातली जात आहे.सव्वा इंचापासून साडेतीन ते चार फुटी गणेशमूर्ती भक्त तयार करून घेतात. सार्वजनिक गणेश मूर्ती चार फुटांपासून दहा बारा फुटी असते. मुंबई, पुणेसारख्या शहरात मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मंडळामध्ये चुरस लागते. बहुधा मोठ्या मूर्ती जागेवरच तयार केल्या जातात, जेणेकरून हलवताना त्याचा त्रास होत नाही. तसेच मोठ्या मूर्ती मातीऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या तयार करण्यात येतात. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टर आॅफ पॅरिस वापरास मज्जाव करण्यात येत असला तरी मोठ्या मूर्तींसाठी सर्रास वापर सुरू आहे. शाडूची माती महाग पडत असल्याने काही मूर्तिकारांनी लाल चिकणमातीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती वाळण्यास जास्त दिवस जात असल्यामुळे मूर्तिकार सध्या कामात व्यस्त झाले आहेत.लाल मातीपेक्षा शाडूची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते. मात्र, त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्यामुळे लाल मातीपासूनही गणपती तयार करण्यात येत आहेत. लाल मातीतील कठीण गुणधर्मामुळे मूर्ती चांगली बनते. बहुतांश कारखानदारही लाल मातीचा वापर करू लागले आहेत. (प्रतिनिधी)