शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: आई-वडील हजयात्रेवरुन आल्यावर ‘त्या’ चौघांचा दफनविधी; आरे-वारे समुद्रात बुडून झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:59 IST

दाेन दिवसांत जाणार हाेते मुंबईला

रत्नागिरी : शहरानजीकच्या आरे-वारे समुद्रात शनिवारी चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. चौघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. उज्मा, उमेरा, जैनब यांचे आई-वडील उमरा (हजयात्रा) करण्यासाठी सौदी अरेबिया येथे गेले आहेत. ते सोमवारी रत्नागिरीत येणार असून, त्यानंतर चौघांचा दफनविधी होणार आहे.या दुर्घटनेत उज्मा शमशुद्दीन शेख (वय १८), उमेरा शमशुद्दीन शेख (२९), जैनब जुनेद काझी (२६), जुनैद बशीर काझी (३०) यांचा दुर्दैव्यारित्या बुडून मृत्यू झाला आहे. जुनैद काझी याचे मूळ गाव कसबा (ता. संगमेश्वर) येथे आहे. मात्र, व्यवसायासाठी ते ओसवालनगर येथे पत्नी जुनैब, दोन वर्षांचा लहान मुलगा व वयोवृद्ध आईसह राहत होते. शनिवारी सायंकाळी जुनैद, पत्नी जैनब, उज्मा, उमेरासह आरे-वारे येथे फिरायला गेले होते. समुद्रात भिजत असताना लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले आणि चाैघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.उमेरा, उज्मा, जैनब यांच्या आणखी दोन बहिणी व एक भाऊ आहे. एक बहीण मुंबईत, तर दुसरी बहीण दुबईत असते तर भाऊ कतार येथे असतो. दुर्घटनेनंतर मुंबईतील बहीण रविवारी रत्नागिरीत दाखल झाली. मात्र, आई-वडील साैदीवरून कतार येथे गेले असून, कतारवरून मुलासह रविवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून त्यांना रत्नागिरीत आणण्यात येणार आहे. साेमवारी ते आल्यानंतर चारही मृतदेहांवर कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार असल्याचे काझी कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी सांगितले.

दोन वर्षांचा नातू, वयोवृद्ध आजीमृत जुनैद व जैनब यांचा दोन वर्षांचा मुलगा आहे. जुनैद यांची वयोवृद्ध आई आहे. काळाने झडप घातल्याने मुलाचा व सुनेचा मृत्यू पाहण्याची वेळ आईवर आली आहे. शिवाय दोन वर्षांच्या नातवाच्या संगोपनाची जबाबदारी आली आहे. जुनैद यांची एक बहीण ओसवालनगर येथे राहते. सून व मुलगा फिरायला गेल्याने आजी नातवाला घेऊन लेकीकडे आली होती.

दाेन दिवसांत जाणार हाेते मुंबईलाजुनैद यांचे सासू-सासरे उमरा करण्यासाठी साैदी अरेबिया येथे गेले होते. ते दि. २३ रोजी मुंबईत परतणार होते. तोपर्यंत अविवाहित मुलींना जावई जुनैद व मुलगी जैनब यांच्याकडे पाठविले होते. आई-वडील येणार असल्याने उज्मा व उमेरा दोन दिवसांत मुंबईला जाणार होत्या. त्यांचे तिकीटही काढण्यात आले होते.