शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

गणवेश खरेदीसाठी निधी झाला तोकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:38 IST

CoronaVirusUnlock, EducationSector, School, Ratnagirinews सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्यरेषेखालील मुलगे यांना दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात येतात. यावर्षी मात्र शासनाने एकच गणवेश देण्याचे निश्चित केले आहे. शासनाने एकाच गणवेशासाठी निधी दिला असला, तरी तो अपुरा असल्याने शिक्षण विभागाने आवश्यक निधीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देगणवेश खरेदीसाठी निधी झाला तोकडारत्नागिरी जिल्ह्यातील ५५,८७७ विद्यार्थी ठरले लाभार्थी

मेहरून नाकाडेरत्त्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्यरेषेखालील मुलगे यांना दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात येतात. यावर्षी मात्र शासनाने एकच गणवेश देण्याचे निश्चित केले आहे. शासनाने एकाच गणवेशासाठी निधी दिला असला, तरी तो अपुरा असल्याने शिक्षण विभागाने आवश्यक निधीची मागणी केली आहे.जिल्ह्यात एकूण ५५ हजार ८७७ विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी एका गणवेशाकरिता एक कोटी ६७ लाख ६३ हजार रूपयांची आवश्यकता आहे. मात्र, राज्य शासनाकडून एक कोटी ३६ लाख ७३ हजार रूपये निधी प्राप्त झाला आहे.

अद्याप गणवेशासाठी ३० लाख ९० हजार रूपयांचा निधी आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईकडे शिक्षण विभागातर्फे पत्र पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना नवीन गणवेशासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.निधीसाठी शिक्षण परिषदेकडे मागणीपहिली ते आठवीतील मुलींची संख्या ४१ हजार १४५ असून, मुलांमध्ये एस. सी. ३,२५४, एस. टी. १०१२, दारिद्र्यरेषेखालील १० हजार ४६६ मिळून एकूण १४ हजार ७३२ मुलगे आहेत. दोन गणवेशांसाठी ३ कोटी ३५ लाख २६ हजार रूपये निधीची गरज होती. मात्र, एका गणवेशासाठी निधी प्राप्त झाला असला तरी तो अपुरा आहे.शाळा व्यवस्थापन समितीमार्फत वितरणजिल्हा परिषद शिक्षण विभागातर्र्फे प्रत्येक शाळेच्या खात्यावर विद्यार्थी संख्येनुसार गणवेशाची रक्कम वर्ग करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीतर्र्फे गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येतात. शिक्षण विभागाकडेच अपुरा निधी प्राप्त झाला असल्याने गणवेश वितरण प्रक्रिया रेंगाळणार आहे.

एकूण लाभार्थी विद्यार्थी व त्यांना एका गणवेशासाठी आवश्यक असणाऱ्या निधीपेक्षा प्राप्त निधी अपुरा आहे. त्यामुळे आवश्यक निधीची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईकडे करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच तो जिल्ह्यातील शाळांना वर्ग केला जाणार आहे. त्यानंतरच वितरण होणार आहे.- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी