शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निधी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:43 IST

विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी आणि गावांच्या मूलभूत विकासासाठी पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींना १४ कोटी ८८ लाख १ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांचा निधी शासनाकडून रोखण्यात आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर गेले १० महिने प्रशासकीय राजवट असल्यानेच हा निधी देण्यात आलेला नाही.

प्रत्येक गावात रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, बांधकाम अशा विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात अबंधित ६० टक्के आणि बंधित ४० टक्के असे प्रमाण आहे. त्यापैकी ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होतो. उर्वरित २० टक्क्यांपैकी प्रत्येकी १० जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना देण्यात येतो. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींना १४ कोटी ८८ लाख रुपये तर पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला एकही रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून आलेला नाही.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनी विकास आराखडे तयार करून ते शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यानंतर अबंधित निधीचा पहिला हप्ता मंजूर झाला असला तरी शासनाकडून जिल्हा परिषद, ९ पंचायत समित्या आणि ५५ ग्रामपंचायतींचा निधी रोखण्यात आला आहे. प्रशासकीय राजवटीमुळे शासनाने निधी राेखून ठेवला असून, निवडणुका जाहीर निधीची खैरात करण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

तरीही खर्चाला ब्रेक

जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर, २०२२ मध्ये होणार आहेत. या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध झालेला असला तरी निवडणुकीच्या लागलेल्या आचारसंहितेमुळे तो खर्च करता येणार नाही. त्यामुळे या निधी खर्च करण्याचा फायदा येणाऱ्या नव्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांना होणार आहे.

तालुका ग्रामपंचायती आलेला निधी

तालुका  ग्रामपंचायत आलेला निधी
मंडणगड४७६५०४०००
दापोली१०११७८६९०००
खेड१०६१७७३९०००
चिपळूण१२७२५३१८०००
गुहागर६११२०४७०००
संगमेश्वर१२३२१०१९०००
रत्नागिरी९०२५६१५०००
लांजा४५७३७३०००
राजापूर९११५३१७०००
एकूण७९११४८८०१०००

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद