शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निधी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:43 IST

विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी आणि गावांच्या मूलभूत विकासासाठी पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींना १४ कोटी ८८ लाख १ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांचा निधी शासनाकडून रोखण्यात आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर गेले १० महिने प्रशासकीय राजवट असल्यानेच हा निधी देण्यात आलेला नाही.

प्रत्येक गावात रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, बांधकाम अशा विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात अबंधित ६० टक्के आणि बंधित ४० टक्के असे प्रमाण आहे. त्यापैकी ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होतो. उर्वरित २० टक्क्यांपैकी प्रत्येकी १० जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना देण्यात येतो. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींना १४ कोटी ८८ लाख रुपये तर पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला एकही रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून आलेला नाही.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनी विकास आराखडे तयार करून ते शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यानंतर अबंधित निधीचा पहिला हप्ता मंजूर झाला असला तरी शासनाकडून जिल्हा परिषद, ९ पंचायत समित्या आणि ५५ ग्रामपंचायतींचा निधी रोखण्यात आला आहे. प्रशासकीय राजवटीमुळे शासनाने निधी राेखून ठेवला असून, निवडणुका जाहीर निधीची खैरात करण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

तरीही खर्चाला ब्रेक

जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर, २०२२ मध्ये होणार आहेत. या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध झालेला असला तरी निवडणुकीच्या लागलेल्या आचारसंहितेमुळे तो खर्च करता येणार नाही. त्यामुळे या निधी खर्च करण्याचा फायदा येणाऱ्या नव्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांना होणार आहे.

तालुका ग्रामपंचायती आलेला निधी

तालुका  ग्रामपंचायत आलेला निधी
मंडणगड४७६५०४०००
दापोली१०११७८६९०००
खेड१०६१७७३९०००
चिपळूण१२७२५३१८०००
गुहागर६११२०४७०००
संगमेश्वर१२३२१०१९०००
रत्नागिरी९०२५६१५०००
लांजा४५७३७३०००
राजापूर९११५३१७०००
एकूण७९११४८८०१०००

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद