शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आंब्यापाठोपाठ काजू पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंताग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:47 IST

रत्नागिरी : जिल्ह्याच्या अर्थार्जनात मोठा वाटा असलेल्या काजूवर फळमाशीसदृश रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. टरफलापासून गरापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव होत ...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या अर्थार्जनात मोठा वाटा असलेल्या काजूवर फळमाशीसदृश रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. टरफलापासून गरापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. कीटकनाशकाची फवारणी करूनही फारसा प्रभाव जाणवत नाही. कीड लागलेला काजू बाजारात चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे हे पांढरे सोने काळवंडले आहे.जिल्ह्यात १ लाख ११ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. उत्पादनक्षम क्षेत्र ९४ हजार ६८० हेक्टर आहे. हेक्टरी उत्पादकता १.५० टन असून, दरवर्षी १ लाख ४२ हजार २० मेट्रिक टन काजूचे उत्पादन होते. आंबा लागवडीप्रमाणे काजू लागवडीसाठी बागायतदारांना विशेष परिश्रम घ्यावे लागत नसल्याने काजू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. योग्य खत व्यवस्थापन असल्यास चांगले उत्पादन मिळते.मात्र, सध्या नैसर्गिक बदलाचा परिणाम काजू पिकावरही झाला आहे. टीम माॅस्क्युटोसारख्या कीडरोगाचा प्रादुर्भाव आधी होता. परंतु, आता फळमाशीसदृश किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादकता धोक्यात आली आहे.

१८० रुपयेयावर्षी काजूबीला सर्वोच्च दर मिळाला. हंगामाच्या सुरुवातीला १८० रुपये किलो दराने बी खरेदी केली जात होती. गेल्या पाच वर्षातील हा उच्चांकी दर आहे. मात्र, जसजशी आवक वाढली तसतशी दरात घसरण सुरू झाली. सध्या १५० ते १६० रुपये काजूला दर मिळत आहे. यावर्षी काजूचे उत्पादन चांगले आहे, दरही चांगला होता. मात्र, कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात आले आहेत.

  • जिल्ह्यातील लागवड क्षेत्र- १ लाख ११ हजार ६२५ हेक्टर
  • उत्पादनक्षम क्षेत्र - ९४ हजार ६८० हेक्टर
  • हेक्टरी उत्पादकता - १.५० टन
  • वार्षिक उत्पादन - १ लाख ४२ हजार २० मेट्रिक टन

आंब्याप्रमाणे काजूवर फळमाशीसदृश रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कृषी विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. गतवर्षी हा प्रादुर्भाव कमी होता. मात्र, यावर्षी वाढला आहे. परिणाम काजूची उत्पादकता धोक्यात येऊ लागली आहे. नियंत्रणासाठी प्रभावी कीटकनाशके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. - संदीप कांबळे, शेतकरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरीMangoआंबाweatherहवामान अंदाज