शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

अथर्व कंपनीकडून रत्नागिरीत फसवणूक, जिल्ह्यात २८ कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 14:43 IST

fraud, crimenews, police, ratnagiri अथर्व फॉर यू इन्फ्रा ॲण्ड अ‍ॅॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गुंतवणूकदारांची ९०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातून तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देअथर्व कंपनीकडून रत्नागिरीत फसवणूक, जिल्ह्यात २८ कोटींची गुंतवणूक मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे एकत्रित गुन्हे

रत्नागिरी : अथर्व फॉर यू इन्फ्रा ॲण्ड अ‍ॅॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गुंतवणूकदारांची ९०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातून तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात या कंपनीची २८ कोटींची गुंतवणूक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन, फ्लॅटचा समावेश आहे. या कंपनीविरोधात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे एकत्रित गुन्हा दाखल असल्याने रत्नागिरीतील तक्रारदारांनी तिकडेच तक्रार दाखल करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात या कंपनीची रत्नागिरी, चिपळूण, दापोली येथे कार्यालये होती. ही कार्यालये गेले काही महिने बंद असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. तर कंपनीचे रत्नागिरीतील कार्यालय गेली दोन वर्ष बंद आहे. याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये गावामधून एक तक्रार अर्ज रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झाला आहे. या कंपनीविरोधात हळूहळू तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्यभरातून एकत्रित गुन्हे मुंबई आर्थिक शाखेकडे दाखल केले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २८ कोटी रूपयांची गुंतवणूक झाल्याचे कंपनीच्या एजंटकडून सांगण्यात आले. मात्र, किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली, ते समजू शकले नाही. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी या कंपनीने आपल्या शाखा सुरू केल्या. कंपनीने गुंतवणूकदारांना दुप्पट व तिप्पट रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवले होते. अथर्व कंपनीकडून एजंट्स नेमून गुंतवणूकदारांना प्रलोभने दाखवण्यात आली. काही कालावधीनंतर गुंतवणूकदारांचा परतावा देणे अशक्य होऊ लागताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून पोबारा केला होता.गुंतवणूकदारांना आमीषदिनांक २२ ऑक्टोबर रोजी दहिसर येथून कंपनीचे अधिकारी सूरदास पाटील (४८), सुखदेव म्हात्रे (४१) व सुभाष नाईक (४०) या संशयितांना अटक करण्यात आली. कंपनीचे संचालक शिवाजी नेफाडे, गणेश हजारे, सचिन गोसावी, मुकेश सुदेश यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी कृषी, शैक्षणिक, आरोग्य, शेळीपालन, आयुर्वेदिक प्रसाधने, औषधे आदी प्रकारांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगण्यात येत होते.

टॅग्स :fraudधोकेबाजीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी