शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

गणपतीपुळे समुद्रात पंढरपूरचे चाैघे बुडाले, एकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 11:33 IST

स्नानाचा माेह जिवावर

गणपतीपुळे : देवदर्शनासाठी आलेले पंढरपूर येथील चाैघे अंघाेळ करताना खाेल समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सकाळी गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. या दुर्घटनेत अजित धनाजी वाडेकर (२५, रा. इसबावे परिचारक नगर, पंढरपूर, जि. साेलापूर) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मात्र, अन्य तिघांना वाचविण्यात यश आले.अजय बबन शिंदे (२३), आकाश प्रकाश पाटील (२५) आणि सार्थ दत्तात्रय माने (२४, सर्व रा. इसबावे, पंढरपूर) अशी दुर्घटनेतून वाचलेल्या तिघांची नावे आहेत. अजित वाडेकर आणि त्यांचे मित्र रविवारी सकाळी १० वाजता दुचाकींवरून पंढरपूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले हाेते. देवदर्शन न करता आधी समुद्रात स्नान करण्याचा निर्णय चाैघांनी घेतला. स्नान करताना खाेल पाण्यात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी अजित वाडेकर खाेल पाण्यात अडकले.त्यांना बाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच मित्रांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरड केली. ही गाेष्ट जीवरक्षक आणि गस्तीसाठी असलेले गणपतीपुळे पाेलिस दूरक्षेत्राचे सहायक पाेलिस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेडकाॅन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जीवरक्षकांना बाेलावून समुद्राच्या पाण्यात पाठवले.

जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अजिंक्य रामाणी, विशाल निंबरे यांच्यासह व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उड्या घेऊन तिघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आराेग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. मधुरा जाधव यांनी तपासून अजित वाडेकर यांचा मृत्यू झाल्याचे घाेषित केले. उर्वरित तिघांची प्रकृती सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जयगड पाेलिस स्थानकात नाेंद करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वीच लग्नसमुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेले अजित धनावडे यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले हाेते. मित्रांसाेबत देवदर्शनाला ते आले असता काळाने त्यांना हिरावून घेतले.

स्नानाचा माेह जिवावरपावसाळी हंगामामुळे सध्या जलपर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही चाैघे खाेल पाण्यात स्नानासाठी उतरले. त्यांचा हा माेह एकाच्या जिवावर बेतला.

खाेल पाण्यात जाऊ नकापावसाळी हंगामामुळे समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलत चालला आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांनी समुद्राच्या खाेल पाण्यात अंघाेळीसाठी जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत व गणपतीपुळे-जयगड पाेलिसांतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPandharpurपंढरपूर