शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

आई-वडिलांसह दोन मुलांना एकाच सरणावर शेवटचा निरोप, गाव गेलं गलबलून; रायगड जवळ अपघातात ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 13:44 IST

पंडित कुटुंबाला काळाने एकाचवेळी आपल्यासोबत नेले

गुहागर : ज्याच्या आयुष्याला स्थैर्य येत होतं, असा ४२ वर्षीय नीलेश, त्याची ३५ वर्षांची पत्नी नंदिनी, १२ वर्षांची लेक मुद्रा आणि अवघ्या चार वर्षांचा चिमुरडा भव्य, या पंडित कुटुंबाला काळाने एकाचवेळी आपल्यासोबत नेले. स्मशानभूमीत दोनच शवदाहिन्या असल्याने या चौघांनाही एकाच सरणावर ठेवून शेवटचा निरोप देताना अख्खा गाव गलबलून गेला. कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवेल, असा प्रकार गुहागर तालुक्यातील हेदवीवासीयांनी प्रथमच अनुभवला.रायगड जिल्ह्यातील गोरेगाव रेपोली येथील अपघातात दहा जण ठार झाल्यानंतर सकाळपासूनच हेदवी गावात सन्नाटा पसरला होता. यामधील जाधव व पंडित कुटुंबीयांपैकी सात जणांना रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल वातावरणात अग्नी देण्यात आला. हेदवी जुवेवाडी येथील मनोहर जाधव यांच्या आईचे वर्षश्राद्ध असल्याने गुरुवारी रात्री उशिरा मुंबई येथून जाधव व पंडित कुटुंबीय निघाले. शुक्रवारी पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात या दहा जणांना मृत्यूने गाठले.पोलिस तपास प्रक्रिया व विच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात देण्यात आले. यामध्ये अमोल, दिनेश, निशांत जाधव व नीलेश, नंदिनी, मुद्रा व भव्य पंडित या सात जणांना हेदवी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्याचे ठरले. नीलेश पंडित हे हेदवी गावचे जावई असून, डावखोल (तालुका संगमेश्वर) हे त्यांचे मूळ गाव आहे. गावात घरचे कोणी नसल्याने त्यांच्यावरही हेदवी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.शुक्रवारची सकाळ गावाला अपघाताच्या बातमीने धक्का देऊन गेली. मात्र, इतके मृतदेह एकाचवेळी स्मशानभूमीत आल्याने रात्र अधिकच भयाण वाटत होती. रात्री नऊ वाजता हे सातही मृतदेह घरी आल्यानंतर एकच आक्रोश झाला. वेगवेगळ्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात नातेवाईक आले होते. संपूर्ण गाव त्यांना निरोप देण्यासाठी जमला होता.हेदवी समुद्रकिनारी उमामहेश्वर मंदिरासमोर एकमेव स्मशानभूमी आहे. येथे दोन शवदाहिनी आहेत. त्यांची अवस्था दयनीय असल्याने एकाच वेळी सात जणांवर अग्निसंस्कार कसा करायचा? असा पेच ग्रामस्थांसमोर पडला होता. अखेर मोठी चिता रचून नीलेश, नंदिनी, मुद्रा व भव्य या पंडित कुटुंबातील चौघांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. मुलगी, जावई व दोन लहानग्या नातवांना अग्नी देण्याची वेळ रघुनाथ जाधव यांच्यावर आली. अन्य मृतदेहांना स्वतंत्रपणे सरण रचून अग्नी देण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaigadरायगडAccidentअपघातDeathमृत्यू