शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
4
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
5
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
6
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
7
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
8
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
9
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
10
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
11
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
12
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
14
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
15
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
16
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
17
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
18
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
19
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
20
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांचे पालन करा, नाहीतर संचारबंदी : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 10:50 IST

corona virus UdaySamant Ratnagiri-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करायचं की नाही, हा निर्णय जनतेवर सोपवला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन होऊ नये, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर नाईलाजाने जिल्हा प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देलॉकडाऊन टाळण्यासाठीची जबाबदारी आता लोकांवरच अवलंबून मास्क नसल्यास पोलीस करणार कारवाई

रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट येण्याची तीव्र शक्यता आहे. कोरोना काय आहे, हे वर्षभरात साऱ्यांनाच कळलं आहे. त्यामुळे निष्काळजीपणे कोरोनाला सामोरे जाण्यापेक्षा काळजी घेऊन सामोरे जाणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करायचं की नाही, हा निर्णय जनतेवर सोपवला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन होऊ नये, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर नाईलाजाने जिल्हा प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले आदी अधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक घेतल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

आतापर्यंत नगरपालिका, महसूल यांच्याकडे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले होते. आता त्यात पोलिसांचाही समावेश असून मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे. मागच्या वेळेसारखे निर्बंध लावायचे असतील तर तो निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा, असे ते म्हणाले.जे सार्वजनिक कार्यक्रम विनापरवाना आयोजित केले जातील, त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शक्यतो रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणी बाहेर पडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोकणातील शिमगा हा सण महत्त्वाचा आहे, त्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे हा सणही साधेपणाने साजरा केला जावा, असे ते म्हणाले.

येत्या २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. हा दिवसही साधेपणाने साजरा करण्याबाबत आपण तसेच जिल्हाधिकारी गणपतीपुळे येथील देवस्थानच्या विश्वस्तांशी बोलणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.ते म्हणाले की, सुरुवातीला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिले १५ दिवस पोलिसांना जी कारवाई करावी लागली ती वेळ आणू नका. त्यासाठी येत्या १५ दिवसांच्या कालावधीतील महोत्सव, सण तसेच क्रिकेट, खोखो आदी खेळ, स्नेहसंमेलन काही दिवसांसाठी थांबवावीत, असे आवाहन त्यांनी केले.दररोज घेणार आढावाजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे सर्व रुग्ण येतील, त्यांच्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे छोट्या-छोट्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचीही स्वॅब चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये यांचा आढावा दररोज अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, तर प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घेतील....तर पर्यटकांनाही बंदीरत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन केले नाही, तर पर्यटकांनाही जिल्ह्यात येणे बंद केले जाईल. याबाबतही कडक निर्बंध लादण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. लोकांनी ऐकलं नाही, तर संचारबंदी लागू करावी लागेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. लोकांनी या साऱ्याची स्वत:हून दखल घेतली नाही तर प्रशासनाला कडक कारवाई करावी लागेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी