शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
9
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
10
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
11
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
12
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
13
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
14
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
15
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
16
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
17
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
18
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
19
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
20
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पाच वाहनांचा अपघात, २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:30 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मंगळवारी दुपारी २:३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. एकाच ठिकाणी पाच वाहने ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मंगळवारी दुपारी २:३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. एकाच ठिकाणी पाच वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात घरडा कंपनीच्या बसचा समावेश असून, या बसमधील २० कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. घाटात दोन तास वाहतूक बंद झाली होती. हा अपघात भीषण असला तरी सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी आतापर्यंत चारवेळा अपघात झाला आहे.परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली आहे, त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. मंगळवारी दुपारी २:३० वाजता चिपळुणातून लोटे औद्योगिक वसाहतीकडे निघालेल्या घरडा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बसला मुंबईहून आलेल्या कंटेनरची समोरासमोर धडक बसली. यामध्ये बसला जोरदार दणका बसला. याचवेळी कंटेनर बाजूला असलेल्या आयशर टेम्पोवर उलटला.घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्याने घरडा कंपनीच्या बसमधील वीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. खासगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलिसांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पाहणी करून महामार्ग मोकळा करून घेण्यासाठी मदत केली.खबरदारीअभावी अपघातया घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही चौथी घटना आहे. या ठिकाणी अपघाताच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर याच ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघात