शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पाच वाहनांचा अपघात, २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:30 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मंगळवारी दुपारी २:३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. एकाच ठिकाणी पाच वाहने ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मंगळवारी दुपारी २:३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. एकाच ठिकाणी पाच वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात घरडा कंपनीच्या बसचा समावेश असून, या बसमधील २० कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. घाटात दोन तास वाहतूक बंद झाली होती. हा अपघात भीषण असला तरी सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी आतापर्यंत चारवेळा अपघात झाला आहे.परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली आहे, त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. मंगळवारी दुपारी २:३० वाजता चिपळुणातून लोटे औद्योगिक वसाहतीकडे निघालेल्या घरडा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बसला मुंबईहून आलेल्या कंटेनरची समोरासमोर धडक बसली. यामध्ये बसला जोरदार दणका बसला. याचवेळी कंटेनर बाजूला असलेल्या आयशर टेम्पोवर उलटला.घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्याने घरडा कंपनीच्या बसमधील वीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. खासगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलिसांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पाहणी करून महामार्ग मोकळा करून घेण्यासाठी मदत केली.खबरदारीअभावी अपघातया घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही चौथी घटना आहे. या ठिकाणी अपघाताच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर याच ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघात