शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

तिवरे धरण दुर्घटनेतील ५ जण अजून बेपत्ताच; १८ मृतदेह हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 3:50 AM

आतापर्यंत एकुण १८ मृतदेह हाती लागले असून अजून पाचजण बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : तिवरे धरण दुर्घटनेतील आणखी पाच बेपत्ता ग्रामस्थांचे मृतदेह गुरूवारी सापडले आहेत. आतापर्यंत एकुण १८ मृतदेह हाती लागले असून अजून पाचजण बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्याने गावातील भेंदवाडीमध्ये कहर झाला. काहीजण जेवायला बसले होते, काहीजण झोपले होते. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि काही तासातच अख्खी भेंदवाडी धरणाच्या पाण्याने गिळली. या वाडीतील १३ घरे, गोठे पाण्यात वाहून गेले. या दुर्घटनेत काहींनी आपला जीव वाचवला. मात्र २४ लोक यात बेपत्ता झाले. त्यातील बळीराम कृष्णा चव्हाण हे एकमेव आतापर्यंत जिवंत सापडले आहेत. बुधवारी रात्रीपर्यंत १३ जणांचे मृतदेह हाती आले होते. खा. विनायक राऊत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांचा धनादेश देण्यात आला.काळ आला होता पण...काळ आला होता पण वेळ आली नव्हती, देवाचा धावा केल्यानेच वाचलो, अशी प्रतिक्रिया या संकटातून बचावलेल्या अरूण पुजारी यांनी बोलून दाखविली. पुजारी हे मूळचे मालवण तोंडवली येथील असून त्यांनी तिवरे गावामध्ये भेंदवाडी येथे मजबूत दोन मजली घर बांधले आहे. स्लॅबच्या असलेल्या या घराच्या मध्यभागी या पाण्याचा मारा होत होता. मात्र आपण वरच्या मजल्यावर असल्याने सुखरुप राहिलो. नजरेसमोरुन पाण्याचा मोठा प्रवाह तासभर वाहत होता. हे भीतीदायक चित्र पाहताना आपणदेखील मनाची तयारी केली होती. मात्र सुदैवाने घराचा मागील कोपरा पाण्याच्या माऱ्यामुळे तुटून गेला. स्लॅबच्या घरामुळे आपण वाचल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरण