शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
3
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
4
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
5
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
6
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
7
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
8
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
9
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
10
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
11
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
12
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
14
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
15
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
16
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
17
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
18
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
19
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
20
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?

जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 06:40 IST

देवरुखचे  काशीराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची मिरारोडची कन्या मिताली, जावई विवेक आणि नातू निहार हे रविवारी रात्री कारने निघाले होते. 

खेड (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरून सुमारे १०० फूट खोल कार कोसळून दोन कुटुंबांतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. दोन्ही कुटुंबे मुंबईहून देवरूखला अंत्यविधीसाठी जात असताना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.

मेधा परमेश पराडकर (५०), सौरभ परमेश पराडकर (२२), मिताली विवेक मोरे (४५), निहार विवेक मोरे (१९), श्रेयस राजेंद्र सावंत (२३) अशी मृतांची नावे आहेत. कार चालवणाऱ्या परमेश पराडकर (५२) आणि विवेक श्रीराम मोरे (४९) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

देवरुखचे  काशीराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची मिरारोडची कन्या मिताली, जावई विवेक आणि नातू निहार हे रविवारी रात्री कारने निघाले होते. 

चालकाला डुलकी?दुहेरी मार्ग असल्यामुळे जगबुडी नदीवर येणारा व जाणारा असे दोन पूल आहेत. या पुलांच्यामध्ये असलेल्या छोट्या जागेतून कार नदीच्या पात्रात कोसळली. येथील कठडा यापूर्वीच तुटलेला आहे. चालकाला डुलकी आल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक धावले मदतीलामारे यांचे नालासोपाऱ्यातील नातलग परमेश पराडकर, पत्नी मेघा, मुलगा सौरव आणि श्रेयस सावंत हेही त्यांच्या सोबत होते. परमेश कार चालवत होते. पहाटे खेड-भरणे येथे पुलाचा कठडा तोडून त्यांची कार नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. कार पात्रातून काढून जखमींना हाॅस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र, पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात विवेक मोरे आणि परमेश पराडकर जखमी झाले. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू