शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 13:33 IST

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे.

ठळक मुद्देकोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवानाआडे गावातील कौस्तुभ लिमये शेतकऱ्याला बहुमान

शिवाजी गोरेदापोली/रत्नागिरी : कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे.

यंदाच्या हंगामातील रत्नागिरी जिल्ह्यातील कौस्तुभ लिमये या शेतकऱ्याची दापोली तालुक्यातुन पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केट ला रवाना झाली आहे.

यावर्षी पाऊस लाबल्याने आंबा पीक उशिरा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे , पाऊस लांबल्याने हापूस आंब्याच्या झाडांना मोहर उशिरा आला आहे, या वर्षी थंडी सुद्धा गायब झाली होती, त्यामुळे आंबा पिकावर परिणाम होऊन, हापूस आंबा मार्केटमध्ये उशिरा येईल असे वाटत आहे, मात्र असे असले तरीही दापोली तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार कौस्तुभ लिमये यांनी 20 जानेवारी रोजी वाशी मार्केटला आंबा पेटी पाठवण्याची किमया केली आहे.

एकीकडे आंबा बागायतदार संकटात सापडले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे लिमये यांनी आपल्या बागेतील हापूसची पेटी वाशी मार्केट ला पाठवून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याचे दाखवून दिले आहे.

कोकणातील अतिशय महत्त्वाचे असणारे हापुस आंबा पीक यावर्षी लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे परंतु गेल्या आठ दिवसापासून कोकणात थंडी चा गारठा वाढल्याने आंबा बागा चांगल्यात मोहरल्या आहेत, काही ठिकाणी तर आंबा झाडांना फळधारणा सुद्धा व्हायला लागले आहे, त्यामुळे हापुस बागायतदार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पुढील काही दिवस थंडी कायम राहिल्यास हापुस आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आडे गावातील लिमये या शेतकऱ्यांनी वाशी मार्केटला पहिली आंबा पेटी पाठवण्याचा बहुमान मिळवला असून पुढील काही दिवसातच अजून त्यांच्या आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीNavi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी