शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 13:33 IST

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे.

ठळक मुद्देकोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवानाआडे गावातील कौस्तुभ लिमये शेतकऱ्याला बहुमान

शिवाजी गोरेदापोली/रत्नागिरी : कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे.

यंदाच्या हंगामातील रत्नागिरी जिल्ह्यातील कौस्तुभ लिमये या शेतकऱ्याची दापोली तालुक्यातुन पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केट ला रवाना झाली आहे.

यावर्षी पाऊस लाबल्याने आंबा पीक उशिरा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे , पाऊस लांबल्याने हापूस आंब्याच्या झाडांना मोहर उशिरा आला आहे, या वर्षी थंडी सुद्धा गायब झाली होती, त्यामुळे आंबा पिकावर परिणाम होऊन, हापूस आंबा मार्केटमध्ये उशिरा येईल असे वाटत आहे, मात्र असे असले तरीही दापोली तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार कौस्तुभ लिमये यांनी 20 जानेवारी रोजी वाशी मार्केटला आंबा पेटी पाठवण्याची किमया केली आहे.

एकीकडे आंबा बागायतदार संकटात सापडले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे लिमये यांनी आपल्या बागेतील हापूसची पेटी वाशी मार्केट ला पाठवून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याचे दाखवून दिले आहे.

कोकणातील अतिशय महत्त्वाचे असणारे हापुस आंबा पीक यावर्षी लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे परंतु गेल्या आठ दिवसापासून कोकणात थंडी चा गारठा वाढल्याने आंबा बागा चांगल्यात मोहरल्या आहेत, काही ठिकाणी तर आंबा झाडांना फळधारणा सुद्धा व्हायला लागले आहे, त्यामुळे हापुस बागायतदार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पुढील काही दिवस थंडी कायम राहिल्यास हापुस आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आडे गावातील लिमये या शेतकऱ्यांनी वाशी मार्केटला पहिली आंबा पेटी पाठवण्याचा बहुमान मिळवला असून पुढील काही दिवसातच अजून त्यांच्या आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीNavi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी