शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खतांच्या दरवाढीमुळे आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढवले आहे. ...

रत्नागिरी : खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढवले आहे. वाढलेले खतांचे दर परवडणारे नसल्याने ते तात्काळ कमी करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार संघटनेद्वारे करण्यात येत आहे.

गतवर्षीपासून लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. शेतीची कामे जरी सुरू असली तरी बाजारपेठा मात्र बंद आहेत. हवामानातील बदलामुळे शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. चक्रीवादळामुळे तर यावर्षी शेवटच्या टप्प्यातील आंबा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असतानाच रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असताना, कोरोना संकटाचा सामना करत असतानाच खतांच्या किमतीमध्ये ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे दर तात्काळ कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. १२०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या मिश्र (डीएपी) खताचे पोते आता १९०० रुपयांना मिळत आहे. शेतीसह बागायतीसाठी युरियापेक्षा मिश्र खतांना विशेष मागणी होत आहे. मे महिन्यातच शेतकरी खताची मागणी नोंदवितात; परंतु खताच्या भरमसाट दरवाढीमुळे खत खरेदी करावे की करू नये, असाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

खतांच्या वाढत्या किमतीमुळे पीक व्यवस्थापनाची गणिते मात्र बिघडणार आहेत. शेतीच्या खर्चात वाढ होणार आहे. हवामानातील बदलामुळे आधीच शेतीच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यात खते व शेतीशी संलग्न अन्य वस्तूंनाही महागाईची झळ बसली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

.........................

मिश्र खतांचे जुने व वाढलेले दर पुढीलप्रमाणे

खते जुने दर नवीन दर

१०:२६:२६ ११७५ १७७५

१०:३२:१६ ११९० १८००

२०:२०:०० ९७५ १३५०

डीएपी १८७५ १९००

डीएपी १२०० १९००

२०:२०:०० ९७५ १४००

पोटॅश ८५० १०००