शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

खतांच्या दरवाढीमुळे आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढवले आहे. ...

रत्नागिरी : खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढवले आहे. वाढलेले खतांचे दर परवडणारे नसल्याने ते तात्काळ कमी करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार संघटनेद्वारे करण्यात येत आहे.

गतवर्षीपासून लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. शेतीची कामे जरी सुरू असली तरी बाजारपेठा मात्र बंद आहेत. हवामानातील बदलामुळे शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. चक्रीवादळामुळे तर यावर्षी शेवटच्या टप्प्यातील आंबा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असतानाच रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असताना, कोरोना संकटाचा सामना करत असतानाच खतांच्या किमतीमध्ये ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे दर तात्काळ कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. १२०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या मिश्र (डीएपी) खताचे पोते आता १९०० रुपयांना मिळत आहे. शेतीसह बागायतीसाठी युरियापेक्षा मिश्र खतांना विशेष मागणी होत आहे. मे महिन्यातच शेतकरी खताची मागणी नोंदवितात; परंतु खताच्या भरमसाट दरवाढीमुळे खत खरेदी करावे की करू नये, असाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

खतांच्या वाढत्या किमतीमुळे पीक व्यवस्थापनाची गणिते मात्र बिघडणार आहेत. शेतीच्या खर्चात वाढ होणार आहे. हवामानातील बदलामुळे आधीच शेतीच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यात खते व शेतीशी संलग्न अन्य वस्तूंनाही महागाईची झळ बसली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

.........................

मिश्र खतांचे जुने व वाढलेले दर पुढीलप्रमाणे

खते जुने दर नवीन दर

१०:२६:२६ ११७५ १७७५

१०:३२:१६ ११९० १८००

२०:२०:०० ९७५ १३५०

डीएपी १८७५ १९००

डीएपी १२०० १९००

२०:२०:०० ९७५ १४००

पोटॅश ८५० १०००