शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

खतांच्या दरवाढीमुळे आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढवले आहे. ...

रत्नागिरी : खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढवले आहे. वाढलेले खतांचे दर परवडणारे नसल्याने ते तात्काळ कमी करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार संघटनेद्वारे करण्यात येत आहे.

गतवर्षीपासून लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. शेतीची कामे जरी सुरू असली तरी बाजारपेठा मात्र बंद आहेत. हवामानातील बदलामुळे शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. चक्रीवादळामुळे तर यावर्षी शेवटच्या टप्प्यातील आंबा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असतानाच रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असताना, कोरोना संकटाचा सामना करत असतानाच खतांच्या किमतीमध्ये ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे दर तात्काळ कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. १२०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या मिश्र (डीएपी) खताचे पोते आता १९०० रुपयांना मिळत आहे. शेतीसह बागायतीसाठी युरियापेक्षा मिश्र खतांना विशेष मागणी होत आहे. मे महिन्यातच शेतकरी खताची मागणी नोंदवितात; परंतु खताच्या भरमसाट दरवाढीमुळे खत खरेदी करावे की करू नये, असाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

खतांच्या वाढत्या किमतीमुळे पीक व्यवस्थापनाची गणिते मात्र बिघडणार आहेत. शेतीच्या खर्चात वाढ होणार आहे. हवामानातील बदलामुळे आधीच शेतीच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यात खते व शेतीशी संलग्न अन्य वस्तूंनाही महागाईची झळ बसली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

.........................

मिश्र खतांचे जुने व वाढलेले दर पुढीलप्रमाणे

खते जुने दर नवीन दर

१०:२६:२६ ११७५ १७७५

१०:३२:१६ ११९० १८००

२०:२०:०० ९७५ १३५०

डीएपी १८७५ १९००

डीएपी १२०० १९००

२०:२०:०० ९७५ १४००

पोटॅश ८५० १०००