शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

अखेर ताम्हाणे - धनगरवाडी रस्त्यासाठी २ काेटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील ताम्हाणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतरही डाेलीचाच आधार घ्यावा लागत असल्याचे सर्वप्रथम ...

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील ताम्हाणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतरही डाेलीचाच आधार घ्यावा लागत असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लाेकमत’ने १९ सप्टेंबर राेजी प्रसिद्ध केले हाेते. या वृत्ताची दखल घेत आमदार राजन साळवी यांनी येथील रस्त्याच्या कामासाठी निधी मिळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. अखेर या रस्त्याच्या कामासाठी २.४० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटामध्ये होणाऱ्या सतत पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना म्हणून चव्हाणवाडी येथे धरण बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार चव्हाणवाडी लघु पाटबंधारे योजना १९८८ रोजी ताम्हाणे पहिलीवाडी येथे अस्तित्वात आली. १९९५ मध्ये युती शासनाच्या काळामध्ये ९५२.५४ लाख रुपये या योजनेवर प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर २००१ साली धरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, भाववाढीमुळे भूसंपादन किमतीतही वाढ झाल्याने काम ठप्प होऊन २००३ साली पुन्हा एकदा २०५०.९९ लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर २००६ साली काम सुरू झाले.

धरणालगतच्या आजूबाजूला असलेल्या धनगरवाडी व बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनीकडे जाणारे रस्ते बाधित क्षेत्रात येत आहेत. आजपर्यंत प्रकल्पावर २०.५४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून ताम्हाणे धनगरवाडी व बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनीकडे जाणारे रस्ते यासाठी लागणार निधी उपलब्ध करून मिळावा म्हणून मागणी केली हाेती. त्यानुसार नवीन अंदाजपत्रकात ताम्हाणे धनगरवाडीकडे जाण्याऱ्या रस्त्यासाठी २ कोटी ४० लाख रुपये तरतूद केली आहे. यासाठीचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडे आहे.

-------------------

‘लाेकमत’ने वेधले लक्ष

ताम्हाणे - धनगरवाडीतील ग्रामस्थ नाना धाेंडू अर्चिणेकर (६५) यांना उपचारासाठी चार किलाेमीटर चालत डाेलीतून आणण्यात आले. अनेक वर्षे निवडणुकांमध्ये केवळ आश्वासन देण्यात येत हाेती. मात्र, रस्ता हाेत नव्हता. या गाेष्टीकडे ‘लाेकमत’ने लक्ष वेधून ग्रामस्थांची व्यथा मांडली हाेती. या वृत्तानंतर आमदार राजन साळवी यांनी तातडीने याबाबत केलेल्या पत्रव्यवहारांबाबत पाठपुरावा सुरू केला.

--------------

अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या १००८ कोटी रुपये पाचव्या सुधारित अंदाजपत्रकला मंजुरी दिली आहे. त्यानुसारच येणाऱ्या काही काळातच महाविकास आघाडी सरकारकडून सुधारित अंदाजपत्रकानुसार ११८.७३ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात येणार आहे. त्या निधीमधून ताम्हाणे धनगरवाडी रिंग रोडचे काम प्राधान्याने घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.

-राजन साळवी, आमदार