शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

अखेर ताम्हाणे - धनगरवाडी रस्त्यासाठी २ काेटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील ताम्हाणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतरही डाेलीचाच आधार घ्यावा लागत असल्याचे सर्वप्रथम ...

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील ताम्हाणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतरही डाेलीचाच आधार घ्यावा लागत असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लाेकमत’ने १९ सप्टेंबर राेजी प्रसिद्ध केले हाेते. या वृत्ताची दखल घेत आमदार राजन साळवी यांनी येथील रस्त्याच्या कामासाठी निधी मिळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. अखेर या रस्त्याच्या कामासाठी २.४० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटामध्ये होणाऱ्या सतत पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना म्हणून चव्हाणवाडी येथे धरण बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार चव्हाणवाडी लघु पाटबंधारे योजना १९८८ रोजी ताम्हाणे पहिलीवाडी येथे अस्तित्वात आली. १९९५ मध्ये युती शासनाच्या काळामध्ये ९५२.५४ लाख रुपये या योजनेवर प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर २००१ साली धरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, भाववाढीमुळे भूसंपादन किमतीतही वाढ झाल्याने काम ठप्प होऊन २००३ साली पुन्हा एकदा २०५०.९९ लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर २००६ साली काम सुरू झाले.

धरणालगतच्या आजूबाजूला असलेल्या धनगरवाडी व बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनीकडे जाणारे रस्ते बाधित क्षेत्रात येत आहेत. आजपर्यंत प्रकल्पावर २०.५४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून ताम्हाणे धनगरवाडी व बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनीकडे जाणारे रस्ते यासाठी लागणार निधी उपलब्ध करून मिळावा म्हणून मागणी केली हाेती. त्यानुसार नवीन अंदाजपत्रकात ताम्हाणे धनगरवाडीकडे जाण्याऱ्या रस्त्यासाठी २ कोटी ४० लाख रुपये तरतूद केली आहे. यासाठीचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडे आहे.

-------------------

‘लाेकमत’ने वेधले लक्ष

ताम्हाणे - धनगरवाडीतील ग्रामस्थ नाना धाेंडू अर्चिणेकर (६५) यांना उपचारासाठी चार किलाेमीटर चालत डाेलीतून आणण्यात आले. अनेक वर्षे निवडणुकांमध्ये केवळ आश्वासन देण्यात येत हाेती. मात्र, रस्ता हाेत नव्हता. या गाेष्टीकडे ‘लाेकमत’ने लक्ष वेधून ग्रामस्थांची व्यथा मांडली हाेती. या वृत्तानंतर आमदार राजन साळवी यांनी तातडीने याबाबत केलेल्या पत्रव्यवहारांबाबत पाठपुरावा सुरू केला.

--------------

अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या १००८ कोटी रुपये पाचव्या सुधारित अंदाजपत्रकला मंजुरी दिली आहे. त्यानुसारच येणाऱ्या काही काळातच महाविकास आघाडी सरकारकडून सुधारित अंदाजपत्रकानुसार ११८.७३ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात येणार आहे. त्या निधीमधून ताम्हाणे धनगरवाडी रिंग रोडचे काम प्राधान्याने घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.

-राजन साळवी, आमदार