शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

तिवरे धरण फुटीप्रकरणी दोषारोप दाखल करा, पुनर्विलोकन समितीच्या अहवालाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:49 IST

तिवरे धरणफुटीची दुर्घटना २ जुलै २०१९ रोजी घडली होती. या घटनेत २३ जणांचा बळी गेला होता.

चिपळूण : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या चिपळुणातील तिवरे धरण दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या ठेकेदारासह अधिकाऱ्यावर दोषारोप दाखल करून त्यांची विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना राज्य सरकारतर्फे पुणे येथील मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्राचे अप्पर आयुक्त यांना दिल्या आहेत. पुनर्विलाेकन समितीच्या एका अहवालाद्वारे या सूचना दिल्या आहेत.तिवरे धरणफुटीची दुर्घटना २ जुलै २०१९ रोजी घडली होती. या घटनेत २३ जणांचा बळी गेला होता. दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती नेमली होती. त्यात काही आक्षेप नोंदविल्याने पुनर्विलोकन समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल सादर केला आहे. पुनर्विलोकन समितीच्या सूचनेनुसार, ठेकेदारावर स्वीकृत निविदेच्या अटी, शर्तीनुसार कारवाई करावी, धरणांच्या संकल्पनाची प्रचलित पद्धती व प्रत्यक्ष संकल्पना तपासून दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, सिंचन विमोचकाचे प्रत्यक्ष काम सुरू असताना गुणनियंत्रण शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांची शासन निर्देश, निविदा शर्तीच्या अनुषंगाने विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.धरणाची प्रथम गळती निदर्शनास आल्यापासून धरणफुटीची घटना घडेपर्यंत, देखभाल व दुरुस्ती, वरिष्ठ स्तरावर उपाययोजनांबाबत अवगत न करणे, धरणाच्या खालील बाजूस असणारी लोकवस्ती न हटविणे, त्रुटीपूर्ण पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतरची तपासणी करण्यासाठी जबाबदार शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, संबंधित कार्यकारी अभियंता यांची तसेच महसूल विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, असेही या अहवालात म्हटले आहे.

अहवालातून समितीने दिली क्लीन चिटतिवरे धरणात २ जुलै २०१९ रोजी सकाळी ९ वाजता पाण्याची पातळी १३२ मीटर इतकी होती. सायंकाळी ५ वाजता पाणीपातळी १३९ मीटर होती. त्यानंतरही पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच होता. दोषींवर कारवाई करताना या बाबींचा विचार करावा, असे समितीने सूचित करत एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे.

पुनर्विलाेकन समितीचा अहवाल मिळविण्यासाठी प्रथम जिल्हाधिकारी, त्यानंतर रत्नागिरीतील जलसंधारण, ठाणेतील जलसंधारण कार्यालय व तेथून पुण्यातील मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक कार्यालय गाठले. या सर्वांकडे अहवाल मिळाला नाही. जलसंधारण प्रधान सचिवांकडे समितीचा अहवाल माहिती अधिकारात उपलब्ध झाला. - विद्याधर साळुंखे, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण