शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

तिवरे धरण फुटीप्रकरणी दोषारोप दाखल करा, पुनर्विलोकन समितीच्या अहवालाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:49 IST

तिवरे धरणफुटीची दुर्घटना २ जुलै २०१९ रोजी घडली होती. या घटनेत २३ जणांचा बळी गेला होता.

चिपळूण : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या चिपळुणातील तिवरे धरण दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या ठेकेदारासह अधिकाऱ्यावर दोषारोप दाखल करून त्यांची विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना राज्य सरकारतर्फे पुणे येथील मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्राचे अप्पर आयुक्त यांना दिल्या आहेत. पुनर्विलाेकन समितीच्या एका अहवालाद्वारे या सूचना दिल्या आहेत.तिवरे धरणफुटीची दुर्घटना २ जुलै २०१९ रोजी घडली होती. या घटनेत २३ जणांचा बळी गेला होता. दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती नेमली होती. त्यात काही आक्षेप नोंदविल्याने पुनर्विलोकन समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल सादर केला आहे. पुनर्विलोकन समितीच्या सूचनेनुसार, ठेकेदारावर स्वीकृत निविदेच्या अटी, शर्तीनुसार कारवाई करावी, धरणांच्या संकल्पनाची प्रचलित पद्धती व प्रत्यक्ष संकल्पना तपासून दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, सिंचन विमोचकाचे प्रत्यक्ष काम सुरू असताना गुणनियंत्रण शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांची शासन निर्देश, निविदा शर्तीच्या अनुषंगाने विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.धरणाची प्रथम गळती निदर्शनास आल्यापासून धरणफुटीची घटना घडेपर्यंत, देखभाल व दुरुस्ती, वरिष्ठ स्तरावर उपाययोजनांबाबत अवगत न करणे, धरणाच्या खालील बाजूस असणारी लोकवस्ती न हटविणे, त्रुटीपूर्ण पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतरची तपासणी करण्यासाठी जबाबदार शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, संबंधित कार्यकारी अभियंता यांची तसेच महसूल विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, असेही या अहवालात म्हटले आहे.

अहवालातून समितीने दिली क्लीन चिटतिवरे धरणात २ जुलै २०१९ रोजी सकाळी ९ वाजता पाण्याची पातळी १३२ मीटर इतकी होती. सायंकाळी ५ वाजता पाणीपातळी १३९ मीटर होती. त्यानंतरही पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच होता. दोषींवर कारवाई करताना या बाबींचा विचार करावा, असे समितीने सूचित करत एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे.

पुनर्विलाेकन समितीचा अहवाल मिळविण्यासाठी प्रथम जिल्हाधिकारी, त्यानंतर रत्नागिरीतील जलसंधारण, ठाणेतील जलसंधारण कार्यालय व तेथून पुण्यातील मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक कार्यालय गाठले. या सर्वांकडे अहवाल मिळाला नाही. जलसंधारण प्रधान सचिवांकडे समितीचा अहवाल माहिती अधिकारात उपलब्ध झाला. - विद्याधर साळुंखे, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण