शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

वसुलीपेक्षा पाणीपुरवठा योजनांवर खर्च भारी

By admin | Updated: March 30, 2015 00:17 IST

नळपाणी योजना : साडेतीन कोटीचा खर्च अन् ७४ लाखांची वसुली

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांवर ३ कोटी ५६ लाख ९६ हजार ३७८ रुपये वर्षभरात खर्च करण्यात आले आहेत. मात्र, पाणीपट्टीच्या वसुलीतून केवळ केवळ ७४ लाख ६० हजार २६९ रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनांवर वसुलीपेक्षा खर्च जास्त होत असल्याने पांढरा हत्ती पोसण्याचाच हा प्रकार आहे. जिल्ह्यात १२ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना आहेत. त्याद्वारे हजारो लोकांची तहान भागते. या योजनांमुळे अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या योजनांसाठी चालू आर्थिक वर्षामध्ये ७६ लाख ६० हजार २६९ रुपये पाणीपट्टी वसूलीचे उद्दीष्ट जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिले आहे. मात्र, ही वसूलीही ग्रामपंचायतींना पूर्ण करता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे खर्च आणि वसुली यामध्ये बरीच तफावत असल्याने या नळपाणी योजना चालवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचाच प्रकार होता, असे म्हटले जात आहे. या नळपाणी योजना चालवताना सध्या जिल्हा प्रशासनाची दमछाक होताना दिसत आहे.या योजनांची थकबाकीची स्थिती पाहता मागील १५ वर्षांची थकबाकीही ग्रामपंचायतींनी वसूली केलेली नाही. २ कोटी २७ लाख ७० हजार २२० रुपये एवढी प्रचंड थकबाकी अजूनही बाकी आहे. ही वसूली कधी करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ही वसूली करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागानेही आता लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.बारा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांवर ब्लिचिंग पावडर, पंप दुरुस्ती, व्यवस्थापन, दूरध्वनी, वेतन, आणि योजना दुरुस्ती आदींवर हा खर्च ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. या योजनांवर वर्षाचा वीज देयकाचा २ कोटी ६४ लाख ५७ हजार २८२ रुपये खर्च होत आहे. ब्लिचिंग पावडरवर ६७ हजार ५०० रुपये, पंप दुरुस्तीवर ७८ हजार ५२० रुपये, व्यवस्थापनावर ५४ लाख ७५ हजार १ रुपये, दूरध्वनी ६४५१ रुपये आणि योजना दुरुस्तीवर ३६ लाख ११ हजार ६२२ रुपये असा एकूण ३ कोटी ५६ लाख ९६ हजार ३७६ रुपये खर्च करण्यात आला आहे. खर्च आणि पाणीपट्टी वसूली यांचे प्रमाण व्यस्त असल्याने मेळ बसवणे पाणी पुरवठा विभागाला अवघड जात आहे. मात्र, प्रत्येकाला पाणी देणे हा शासन निर्णय आहे. त्यामुळे नळपाणी योजनांवर एवढा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो तर दुसरीकडे त्याची वसुली मात्र मोठ्या प्रमाणावर रखडली आहे. गेल्या १५ वर्षातील ही वसुली आहे. केवळ जिल्ह्यातील १२ नळपाणी पुरवठा योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. (शहर वार्ताहर)