शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

बेदखल कुळांचं बेदखल जगणं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

हा प्रकार लक्षात घेऊन काँग्रेस आघाडी सरकारने २००४ मध्ये कायद्याच्या ७० (ब) कलमात पुन्हा दुरुस्ती केली. त्यानुसार पुराव्यासाठी ग्राह्य ...

हा प्रकार लक्षात घेऊन काँग्रेस आघाडी सरकारने २००४ मध्ये कायद्याच्या ७० (ब) कलमात पुन्हा दुरुस्ती केली. त्यानुसार पुराव्यासाठी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या पाच अटींपैकी एका अटीची पूर्तता केली, तरी त्याचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवावे, असे आदेश देण्यात आले. तरीही बेदखल कुळांच्या हक्क नोंदणीचा प्रश्न पुढे गेला नाही आणि मूळ समस्या तशीच कायम राहिली.

आज तीच समस्या सरसकट भेडसावू लागली आहे. प्रत्येक गावागावात हा प्रश्न सतावू लागला आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत हा वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याबाबतचे अनेक खटले न्यायालयात सुरु आहेत. चिपळूण तालुक्यातील परशुराम गावचा प्रश्न तर सर्वांनाच परिचित आहे. आजही येथील ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही. उलट अनेक आंदोलन व मोर्चे काढूनही अपयश आले आहे. गावाने एकजुटीने न्याय मागूनही मिळत नसेल तर वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणाऱ्यांना तरी तो कसा मिळेल. आता तर दिवसेंदिवस जमिनीचे भाव वाढत असल्याने व सोन्याचा भाव जमिनींना आला असल्याने कुळ कायद्याच्या आधारे जागा मिळवणे सोपेही राहिलेले नाही. परिणामी शेतकरी व अल्पभूधारक यामध्ये पूर्णतः भरडला गेला आहे. अनेकांनी शेतकऱ्यांकडील जमिनी काढून घेतल्या आहेत. एकेकाळी कसदार पीक देणाऱ्या या जमिनी आता पडीक झाल्या आहेत. कुळ कायद्याच्या भीतीने शेती पडीक ठेवली जात असल्याने त्या-त्या भागात शेतीचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. शेतीऐवजी केवळ झाडी व झुडपं वाढत आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. चिपळूण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सभेत या समस्येचा अंदाज अनेकांना आला. या सभेत ‘प्रधानमंत्री घरकुल’ व ‘घर तेथे शौचालय’ या दोन्ही योजनांचा आढावा घेण्यात आला. गेल्या चार वर्षांत चिपळूण शहरातील अवघ्या २३ जणांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. तसेच शौचालय उभारण्यासाठी अनुदान स्वरूपात प्रत्येकी २२ हजार रुपये मिळत असतानाही त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. कुळांच्या जमिनी हा प्रमुख अडथळा निर्माण झाला असून, त्यामुळे अनेकांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. चिपळूण शहराचा विचार करता शहरातील गोवळकोट, पेठमाप, मुरदपूर, उक्ताड, शंकरवाडी, काविळतळी, खेंड, पाग, रावतळे या भागात कुळांच्याच जमिनी आहेत. या भागात बेदखल कुळांना एखादे बांधकाम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील तीन-चार पिढ्या बांधकाम असतानाही नवीन बांधकाम व दुरुस्तीसाठी प्रत्येकालाच झगडावं लागत आहे. अशा बांधकामांची ना नगर परिषद जबाबदारी घेत अथवा ना परवानगी देत आणि बँकाही कर्ज देत नाही. एकूणच बेदखल कुळांना जगण्याचाही अधिकार नाही, अशी काहीशी बिकट परिस्थिती कधी-कधी काहींच्या बाबतीत दिसून येते. काही कुटुंब तर याविरुद्ध अनेक वर्षे झटताहेत. परंतु प्रत्येकाची ही लढाई वैयक्तिक पातळीवर सुरु असल्याने फारशी लक्षात येत नाही. अगदी सीमाप्रश्न जसा अनुत्तरित राहिला आहे, तीच गत बेदखल कुळांच्या प्रश्नाची झाली आहे.

- संदीप बांद्रे