शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

बेदखल कुळांचं बेदखल जगणं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

हा प्रकार लक्षात घेऊन काँग्रेस आघाडी सरकारने २००४ मध्ये कायद्याच्या ७० (ब) कलमात पुन्हा दुरुस्ती केली. त्यानुसार पुराव्यासाठी ग्राह्य ...

हा प्रकार लक्षात घेऊन काँग्रेस आघाडी सरकारने २००४ मध्ये कायद्याच्या ७० (ब) कलमात पुन्हा दुरुस्ती केली. त्यानुसार पुराव्यासाठी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या पाच अटींपैकी एका अटीची पूर्तता केली, तरी त्याचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवावे, असे आदेश देण्यात आले. तरीही बेदखल कुळांच्या हक्क नोंदणीचा प्रश्न पुढे गेला नाही आणि मूळ समस्या तशीच कायम राहिली.

आज तीच समस्या सरसकट भेडसावू लागली आहे. प्रत्येक गावागावात हा प्रश्न सतावू लागला आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत हा वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याबाबतचे अनेक खटले न्यायालयात सुरु आहेत. चिपळूण तालुक्यातील परशुराम गावचा प्रश्न तर सर्वांनाच परिचित आहे. आजही येथील ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही. उलट अनेक आंदोलन व मोर्चे काढूनही अपयश आले आहे. गावाने एकजुटीने न्याय मागूनही मिळत नसेल तर वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणाऱ्यांना तरी तो कसा मिळेल. आता तर दिवसेंदिवस जमिनीचे भाव वाढत असल्याने व सोन्याचा भाव जमिनींना आला असल्याने कुळ कायद्याच्या आधारे जागा मिळवणे सोपेही राहिलेले नाही. परिणामी शेतकरी व अल्पभूधारक यामध्ये पूर्णतः भरडला गेला आहे. अनेकांनी शेतकऱ्यांकडील जमिनी काढून घेतल्या आहेत. एकेकाळी कसदार पीक देणाऱ्या या जमिनी आता पडीक झाल्या आहेत. कुळ कायद्याच्या भीतीने शेती पडीक ठेवली जात असल्याने त्या-त्या भागात शेतीचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. शेतीऐवजी केवळ झाडी व झुडपं वाढत आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. चिपळूण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सभेत या समस्येचा अंदाज अनेकांना आला. या सभेत ‘प्रधानमंत्री घरकुल’ व ‘घर तेथे शौचालय’ या दोन्ही योजनांचा आढावा घेण्यात आला. गेल्या चार वर्षांत चिपळूण शहरातील अवघ्या २३ जणांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. तसेच शौचालय उभारण्यासाठी अनुदान स्वरूपात प्रत्येकी २२ हजार रुपये मिळत असतानाही त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. कुळांच्या जमिनी हा प्रमुख अडथळा निर्माण झाला असून, त्यामुळे अनेकांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. चिपळूण शहराचा विचार करता शहरातील गोवळकोट, पेठमाप, मुरदपूर, उक्ताड, शंकरवाडी, काविळतळी, खेंड, पाग, रावतळे या भागात कुळांच्याच जमिनी आहेत. या भागात बेदखल कुळांना एखादे बांधकाम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील तीन-चार पिढ्या बांधकाम असतानाही नवीन बांधकाम व दुरुस्तीसाठी प्रत्येकालाच झगडावं लागत आहे. अशा बांधकामांची ना नगर परिषद जबाबदारी घेत अथवा ना परवानगी देत आणि बँकाही कर्ज देत नाही. एकूणच बेदखल कुळांना जगण्याचाही अधिकार नाही, अशी काहीशी बिकट परिस्थिती कधी-कधी काहींच्या बाबतीत दिसून येते. काही कुटुंब तर याविरुद्ध अनेक वर्षे झटताहेत. परंतु प्रत्येकाची ही लढाई वैयक्तिक पातळीवर सुरु असल्याने फारशी लक्षात येत नाही. अगदी सीमाप्रश्न जसा अनुत्तरित राहिला आहे, तीच गत बेदखल कुळांच्या प्रश्नाची झाली आहे.

- संदीप बांद्रे