शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मत्स्य व्यवसायात बड्या भांडवलदारांचे अतिक्रमण

By admin | Updated: July 9, 2016 00:58 IST

अनंत पाटील यांची खंत : मत्स्य विकास खात्याच्या योजनांमध्ये बदल आवश्यक

चिपळूण : क्रियाशील पारंपरिक मच्छीमाराची व्याख्या ठरवून रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांच्या व बंदरांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रभावीपणे योजनांची आखणी करुन अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. पारंपरिक मत्स्य व्यवसायामध्ये बड्या भांडवलदारांचा हस्तक्षेप, परराज्यातील हायस्पीड नौकांचा वावर, आधुनिक साधनांद्वारे जलद होणारी मासेमारी यामुळे भविष्यातील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून, ही चिंतेची बाब असल्याचे प्रतिपादन मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी केले. परिवर्तन संस्था, चिपळूण व अ‍ॅक्शन एड असोसिएशन, मुंबई यांच्यातर्फे आयोजित केलेल्या नेटवर्किंग बैठकीमध्ये ते बोलत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना जेटी, रस्ता, मत्स्य ओटे आदी मुलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राज्य सरकारद्वारे डिझेल खरेदीवर देण्यात येणारी सवलत वेळेवर मिळत नाही. त्यामुळे मच्छीमारांमध्ये याबाबत उदासिनता आहे. या कारणास्तव ७० टक्के मच्छीमार सहकारी सोसायटी या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.मत्स्य विकास खात्याच्या योजनांमध्ये बदल करुन एनसीडीसी कर्जाचा व्याजदर कमी करावा, कर्ज फेड कालावधी, बिगर यांत्रिकी नौका योजनेच्या लाभासाठी उत्पन्न मर्यादा व अनुदान रक्कम वाढवावी ही मच्छीमारांची शासनाकडून अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.सागर किनारी राहणाऱ्या मच्छीमारांचा त्यांच्या घराच्या जमिनीवरही अधिकार नाही. वाढती लोकसंख्या विचारात घेता उपलब्ध क्षेत्र हे कमी पडत असून, यासाठी शासनाने गावठाण क्षेत्र मच्छीमारांना उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी या बैठकीत पुढे आली. मेरिटाईम बोर्ड व फिशरीज खात्यामध्ये योग्य समन्वय नसल्याने व तालुकास्तरावर कायमस्वरुपी परवाना अधिकारी नसल्याने मच्छीमारांना व्ही.आर.सी. मिळविणे खर्चिक व त्रासदायक होत असल्याचे त्यांंनी सांगितले. शासनाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या मच्छीमार बांधवांना आजही मुलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे. भारताचा नागरिक म्हणून घटनेने दिलेले अधिकार, कायदा, शासन निर्णय व धोरणांचा अभ्यास करणे गरजेचे असून, प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जात, धर्म व पक्ष बाजूला ठेवून संघर्ष करावा लागेल, असे प्रतिपादन अशोक कदम यांनी यावेळी केले. बैठकीचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक गणेश खेतले यांनी केले तर बैठक यशस्वीतेसाठी क्षेत्रीय समन्वयक केतन गांधी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)परिवर्तन, अ‍ॅक्शन एड असोसिएशनतर्फे नेटवर्किंग बैठक.हर्णै बंदरात कोट्यवधींची उलाढाल होऊनही मुलभूत सुविधा नाहीत.मच्छीमारांना अनेक समस्यांना जावे लागते सामोरे.