शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

Ratnagiri: कोळसावाहू ट्रेलरचा ब्रेक फेल, आठ गाड्या चिरडल्या; युवक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:17 IST

एअर बॅग उघडली अन् उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बचावले

रत्नागिरी : कोळसावाहू ट्रेलरने तब्बल आठ गाड्यांचा चुराडा केल्याचा भीषण अपघातात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे झाला. यात आयटीआयमधील १९ वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. चार कार, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला ठोकरून हा ट्रेलर संरक्षक कठड्यावर जाऊन आदळला. ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. शिवम रवींद्र गोताड (झरेवाडी, ता. रत्नागिरी), असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यात काही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला असला तरी अनेक जण सुदैवाने बचावले आहेत.नोकरी आटोपून घरी जाणारे कर्मचारी, शाळा-महाविद्यालय संपल्यानंतर घरी जाणारे विद्यार्थी यामुळे सायंकाळच्या वेळी हा मार्ग गजबजलेला असतो. अशावेळी निवळीकडून गोव्याकडे जाणारा १६ चाकी ट्रेलर (केए २९ सी १८४३) ब्रेक फेल झाल्यामुळे काळ बनून आला. हातखंबा गावापूर्वी असलेल्या तीव्र वळणावर या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाले. महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे जेथे रस्ता अरुंद आहे, तेथे वाहने एका रांगेत चालली होती.ब्रेक निकामी झालेल्या या ट्रेलरने आपल्या पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. त्या गाड्या पुढे एकमेकांवर आपटल्या. त्याचा फटका चार कार, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला बसला. जवळपास २०० मीटर ट्रेलरने आपल्यासोबत बाकी गाड्या फरफटत नेल्या. आयटीआयमध्ये शिकणारा शिवम गोताड दुचाकीवरून आपल्या घरी जात होता. त्याची दुचाकी ट्रेलरच्या चाकाखाली आली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात डॉ. महेश महाले यांची क्रेटा कार, मंगेश नागले यांची रिक्षा, कृष्णदेव भरत येडगे यांची स्प्लेंडर, अविनाश विजय ठाकरे (रा. लांजा) यांची मोटारसायकल, तर लांजा येथील ॲड. समीर दळवी, डॉ. सुदेशकुमार शिवाजीराव चव्हाण यांची कार, संग्राम विलास साळवी (रा. नाचणे, रत्नागिरी) यांची कार, तर सत्यविनायक सुरेश देसाई यांच्या कारला ट्रेलरने धडक दिली.या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक धुमसकर यांच्यासह हातखंबा वाहतूक मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवम गोताड याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. अन्य वाहन चालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

आतापर्यंत ४ बळीहातखंबा येथे गेल्या काही महिन्यांत त्याच जागी अनेक अपघात झाले आहेत. तीव्र उतार आणि महामार्ग रुंदीकरणाचे काम यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पुलाचे काम बराच काळ रखडले आहे. ते काम झाले तर अपघातांची संख्या कमी होईल. गेल्या काही महिन्यांत याच भागात अपघातात चार जणांचा बळी गेला आहे.

एअर बॅग उघडली अन् ते वाचलेरत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंत करपे हे शासकीय काम आटोपून राजापूर येथे कामानिमित्त जात होते. अचानक त्यांच्या कारवर ट्रकने धडक दिल्यानंतर त्यांची गाडी समोरील गाडीवर आदळली. यामध्ये त्यांच्या पूर्ण कारचा चुराडा झाला. मात्र, क्षणार्धात एअर बॅग उघडल्यामुळे करपे बालंबाल बचावले.