शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कोळसावाहू ट्रेलरचा ब्रेक फेल, आठ गाड्या चिरडल्या; युवक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:17 IST

एअर बॅग उघडली अन् उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बचावले

रत्नागिरी : कोळसावाहू ट्रेलरने तब्बल आठ गाड्यांचा चुराडा केल्याचा भीषण अपघातात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे झाला. यात आयटीआयमधील १९ वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. चार कार, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला ठोकरून हा ट्रेलर संरक्षक कठड्यावर जाऊन आदळला. ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. शिवम रवींद्र गोताड (झरेवाडी, ता. रत्नागिरी), असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यात काही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला असला तरी अनेक जण सुदैवाने बचावले आहेत.नोकरी आटोपून घरी जाणारे कर्मचारी, शाळा-महाविद्यालय संपल्यानंतर घरी जाणारे विद्यार्थी यामुळे सायंकाळच्या वेळी हा मार्ग गजबजलेला असतो. अशावेळी निवळीकडून गोव्याकडे जाणारा १६ चाकी ट्रेलर (केए २९ सी १८४३) ब्रेक फेल झाल्यामुळे काळ बनून आला. हातखंबा गावापूर्वी असलेल्या तीव्र वळणावर या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाले. महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे जेथे रस्ता अरुंद आहे, तेथे वाहने एका रांगेत चालली होती.ब्रेक निकामी झालेल्या या ट्रेलरने आपल्या पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. त्या गाड्या पुढे एकमेकांवर आपटल्या. त्याचा फटका चार कार, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला बसला. जवळपास २०० मीटर ट्रेलरने आपल्यासोबत बाकी गाड्या फरफटत नेल्या. आयटीआयमध्ये शिकणारा शिवम गोताड दुचाकीवरून आपल्या घरी जात होता. त्याची दुचाकी ट्रेलरच्या चाकाखाली आली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात डॉ. महेश महाले यांची क्रेटा कार, मंगेश नागले यांची रिक्षा, कृष्णदेव भरत येडगे यांची स्प्लेंडर, अविनाश विजय ठाकरे (रा. लांजा) यांची मोटारसायकल, तर लांजा येथील ॲड. समीर दळवी, डॉ. सुदेशकुमार शिवाजीराव चव्हाण यांची कार, संग्राम विलास साळवी (रा. नाचणे, रत्नागिरी) यांची कार, तर सत्यविनायक सुरेश देसाई यांच्या कारला ट्रेलरने धडक दिली.या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक धुमसकर यांच्यासह हातखंबा वाहतूक मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवम गोताड याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. अन्य वाहन चालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

आतापर्यंत ४ बळीहातखंबा येथे गेल्या काही महिन्यांत त्याच जागी अनेक अपघात झाले आहेत. तीव्र उतार आणि महामार्ग रुंदीकरणाचे काम यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पुलाचे काम बराच काळ रखडले आहे. ते काम झाले तर अपघातांची संख्या कमी होईल. गेल्या काही महिन्यांत याच भागात अपघातात चार जणांचा बळी गेला आहे.

एअर बॅग उघडली अन् ते वाचलेरत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंत करपे हे शासकीय काम आटोपून राजापूर येथे कामानिमित्त जात होते. अचानक त्यांच्या कारवर ट्रकने धडक दिल्यानंतर त्यांची गाडी समोरील गाडीवर आदळली. यामध्ये त्यांच्या पूर्ण कारचा चुराडा झाला. मात्र, क्षणार्धात एअर बॅग उघडल्यामुळे करपे बालंबाल बचावले.