शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

Ratnagiri: प्रशासकीय राजवटीमुळे ४० कोटी शासन दरबारीच पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 12:44 IST

१५व्या वित्त आयोगाचा निधी : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे विकास आराखडे रखडले

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे गेली दोन वर्षांत जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळालेला नाही. प्रशासकीय राजवटीमुळे जिल्हा परिषदेच्या तिजाेरीत पडणारे ४० कोटी अजून शासन दरबारीच पडून आहेत.केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा आधार घेऊन बंधित आणि अबंधित या दोन प्रकारात निधी दिला जातो. या निधीतून ग्रामपंचायतींना ८० टक्के, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रत्येकी १० टक्के असा निधी वितरित करण्यात येतो.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर २१ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना मिळणारा प्रत्येकी १० टक्के निधी केंद्र शासनाने रोखला आहे. हा निधी मिळत नसल्याने पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांनी तयार केलेले विकास आराखडे फाइलमध्येच राहिले आहेत. निधी नसल्याने सर्वच कामे प्रलंबित राहिली आहेत.सन २०२२ २३ या आर्थिक वर्षात बंधित आणि अबंधितचे चार टप्प्यांत अनुदान आले. मात्र, या वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना एकही रुपया आलेला नाही. ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी वेळोवेळी देण्यात आला आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे २० कोटी आणि ९ पंचायत समित्यांचे २० कोटी असा एकूण ४० कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून प्रशासक असल्याने रोखण्यात आला आहे.आराखडा ऑनलाइन सादर

पंधराव्या वित्त आयोगातील केंद्र शासनाकडून जिल्हा परिषदेला दमडीही आलेली नाही. तरीही जिल्हा परिषदेने विविध विकासकामांचा आराखडा तयार करून तो ऑनलाइन शासनाला सादर केला आहे. त्यामध्ये शाळा दुरुस्ती, पाखाडी बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, वर्ग खोल्या बांधणे, नळपाणी योजना दुरुस्ती करणे, विहिरींची दुरुस्ती, शौचालय उभारणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, बंदिस्त गटार बांधणे, भूजल पुनर्भरण करणे या कामांचा समावेश आहे.आवाज काेण उठविणार?राजकीय पक्षांकडून वेळोवेळी निवडणूक घेण्याची मागणी हाेत आहे. प्रशासकीय राजवट असल्याने त्याचे दूरगामी परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या विकासकामांवर हाेत आहेत. त्यातच पंधराव्या वित्त आयोगाचा दोन वर्षांचा निधी न आल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यासाठीच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये पदाधिकारी असल्यास ते निधीसाठी आवाज उठवू शकतात. मात्र, प्रशासकीय राजवटीत आवाज कोण उठवणार?

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद