शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

Ratnagiri: प्रशासकीय राजवटीमुळे ४० कोटी शासन दरबारीच पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 12:44 IST

१५व्या वित्त आयोगाचा निधी : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे विकास आराखडे रखडले

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे गेली दोन वर्षांत जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळालेला नाही. प्रशासकीय राजवटीमुळे जिल्हा परिषदेच्या तिजाेरीत पडणारे ४० कोटी अजून शासन दरबारीच पडून आहेत.केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा आधार घेऊन बंधित आणि अबंधित या दोन प्रकारात निधी दिला जातो. या निधीतून ग्रामपंचायतींना ८० टक्के, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रत्येकी १० टक्के असा निधी वितरित करण्यात येतो.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर २१ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना मिळणारा प्रत्येकी १० टक्के निधी केंद्र शासनाने रोखला आहे. हा निधी मिळत नसल्याने पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांनी तयार केलेले विकास आराखडे फाइलमध्येच राहिले आहेत. निधी नसल्याने सर्वच कामे प्रलंबित राहिली आहेत.सन २०२२ २३ या आर्थिक वर्षात बंधित आणि अबंधितचे चार टप्प्यांत अनुदान आले. मात्र, या वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना एकही रुपया आलेला नाही. ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी वेळोवेळी देण्यात आला आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे २० कोटी आणि ९ पंचायत समित्यांचे २० कोटी असा एकूण ४० कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून प्रशासक असल्याने रोखण्यात आला आहे.आराखडा ऑनलाइन सादर

पंधराव्या वित्त आयोगातील केंद्र शासनाकडून जिल्हा परिषदेला दमडीही आलेली नाही. तरीही जिल्हा परिषदेने विविध विकासकामांचा आराखडा तयार करून तो ऑनलाइन शासनाला सादर केला आहे. त्यामध्ये शाळा दुरुस्ती, पाखाडी बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, वर्ग खोल्या बांधणे, नळपाणी योजना दुरुस्ती करणे, विहिरींची दुरुस्ती, शौचालय उभारणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, बंदिस्त गटार बांधणे, भूजल पुनर्भरण करणे या कामांचा समावेश आहे.आवाज काेण उठविणार?राजकीय पक्षांकडून वेळोवेळी निवडणूक घेण्याची मागणी हाेत आहे. प्रशासकीय राजवट असल्याने त्याचे दूरगामी परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या विकासकामांवर हाेत आहेत. त्यातच पंधराव्या वित्त आयोगाचा दोन वर्षांचा निधी न आल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यासाठीच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये पदाधिकारी असल्यास ते निधीसाठी आवाज उठवू शकतात. मात्र, प्रशासकीय राजवटीत आवाज कोण उठवणार?

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद