शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे चिपळूण जलमय, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 11:47 IST

रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणि सह्याद्रीच्या खो-यात पडणारा पाऊस यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढली आहे.

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारीही जोरदार फटका बसला. मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणि सह्याद्रीच्या खो-यात पडणारा पाऊस यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढली आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच चिपळूण शहरात पाणी वाढू लागले. प्रथम बाजारपेठ भाग आणि त्यानंतर चिंचनाका भाग पाण्याखाली गेला. शहरातील मुख्य बस स्थानकादरम्यानही ढोपरभर पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथे दरड कोसळून दहा घरांना धोका निर्माण झाला आहे.

चिपळूणप्रमाणेच खेडलाही पावसाचा फटका बसला आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील मच्छीमार्केटही पाण्याखाली गेले आहे. जगबुडी नदीचे पाणी ७ मीटरपर्यंत वाढल्यानंतर धोक्याची सूचना दिली जाते. आता पाणी आठ मीटरपर्यंत वाढले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस