शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लहरी हवामानामुळे ‘कोकणचा राजा’ बेभरवशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 02:30 IST

हापूसचे उत्पादन ३० टक्केच होण्याची शक्यता, चक्रीवादळानंतर ऋतूचक्र बदलल्याचा परिणाम

मनोज मुळ्ये/महेश सरनाईकरत्नागिरी / सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर कोकणातील हवामानात मोठे फेरबदल होत आहेत. उशिरापर्यंत पडलेला पाऊस, लांबलेली थंडी यामुळे मोहोर खूपच कमी आल्याने हापूस आंब्याचे उत्पादन यंदा केवळ २५ ते ३० टक्केच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे हापूस पिकला तरी कोकणचा राजा काही झिम्मा खेळू शकणार नाही आणि सर्वसामान्य ग्राहकांनाही बाजारात परडवणाऱ्या दरात आंबा मिळण्याची शक्यता धूसर आहे.कोकणच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा आंबा पिकावर अवलंबून  आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ५०० कोटींची उलाढाल होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही साधारण तेवढीच उलाढाल होते. मात्र, ऋतूचक्रात सतत होणाऱ्या बदलांमुळे आंबा पीक आता खूपच बेभरवशी झाले आहे.

दरवर्षी फेब्रुवारीत १० टक्के, मार्चमध्ये सुमारे २० टक्के आंबा मुंबईला जातो. एप्रिल आणि मेमध्ये उर्वरित आंबा बाजारात जातो.

nमेच्या अखेरच्या आठवड्यापासून कोकणातील आंबा कॅनिंगसाठी जातो आणि त्याचवेळी अन्य राज्यातील आंबा मुंबईत येतो. 

nयंदा फेब्रुवारीत गतवर्षीपेक्षा अधिक आंबा मुंबईत गेला. त्यात दरवर्षीप्रमाणे देवगड हापूसचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता आंब्यासाठी बाजाराला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा फेब्रुवारीत जादा आंबा मुंबई बाजारात गेल्याचा विरोधाभास दिसत असला तरी मार्च, एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचे प्रमाण खूप कमी असेल.

५०००० टन देवगड हापूसचे उत्पादन

देवगड येथील हापूस आंबा हा ४५,००० एकर क्षेत्रावर पिकविला जातो आणि पोषक वातावरण लाभल्यास उत्पादन ५० हजार टनांवर जाते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड नावाची आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भारतातील सर्वांत जुनी आणि सर्वांत मोठी सहकारी संस्था आहे. त्यात ७०० सदस्य असून, २०१३ साली या संस्थेस २५ वर्षे पूर्ण झाली.

निसर्ग वादळामुळे चक्र बिघडलेn गतवर्षी जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळ आले. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील हवामानात खूप मोठे बदल झाले. पाऊस उशिरापर्यंत पडत होता. त्यामुळे थंडी उशिराने सुरू झाली. n सप्टेंबरमध्ये पाऊस थांबल्यानंतर ऑक्टोबरमधील उन्हामुळे झाडांच्या मुळावर ताण येतो आणि त्यातून मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते.n मात्र, त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडीचे प्रमाण अपेक्षित असते. यंदा ऑक्टोबरमध्येही पाऊस पडत होता. त्यामुळे तेव्हा उन्हाळा जाणवला नाही. n थंडीही जानेवारीत सुरू झाली. त्यामुळे झाडांना मोहोर येण्याऐवजी सतत पालवीच येत होती.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा