शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

जंगलातल्या या ‘शबरीं’साठी कोणी घर देता का... घर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 01:00 IST

संदीप बांद्रे । चिपळूण : रानावनात औषधी वनस्पती व मध पोळ्यांच्या शोधात फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कातकरी समाजातील दीडशे ...

संदीप बांद्रे ।चिपळूण : रानावनात औषधी वनस्पती व मध पोळ्यांच्या शोधात फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कातकरी समाजातील दीडशे ते दोनशे कुटुंब जागेअभावी ‘घरकुल आवास’ योजनेपासून वंचित आहेत. या कुटुंबांना शासकीय जागा उपलब्ध व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षात अवघ्या १६ जणांना ‘शबरी घरकुल आवास’ योजनेचा लाभ मिळाला आहे.या समाजातील प्रत्येक जण आपल्या संसाराचा गाडा ओढताना स्वत:चे घर असावे अशी कल्पनादेखील आपल्या मनात आणत नसावा. जिथे रोजच्या खाण्या-जगण्याचीच खात्री नाही तिथे घराचे स्वप्नही त्यांना परवडत नसावे. म्हणूनच वर्षानुवर्ष झोपडीतील जगणे त्यांनी प्रिय मानले आहे. स्वत:ची जागाच नाही तर घर कसे बांधणार, हा विचार त्यांच्या मनात ठासून भरलेला असल्यानेच घराची कल्पना त्यांच्या मनाला शिवत नसावी.वर्षानुवर्षे या समाजाची पिढी येथे वाढत आहे. आजही अनेक कुटुंबांचे स्वत:चे घर नाही. जागा मिळेल तेथे वास्तव्य करून प्रत्येकजण जीवन जगत आहे. तालुक्यात अशी सुमारे दीडशे ते दोनशे कुटुंब असल्याची माहिती आदिवासी आदिम कातकरी संघटनेमार्फत देण्यात आली आहे.कातकरी समाजाच्या घरकुलांसाठी शासनामार्फत ‘शबरी आवास योजना’ राबवली जाते. मात्र, या योजनेचा गेल्या तीन वर्षात अवघ्या १६ जणांनी लाभ घेतला आहे. २०१६-१७ मध्ये १४ जण, २०१७-१८ व २०१८-१९मध्ये प्रत्येकी एक घरकुल आकले, नांदिवसे, तिवरे व कुंभार्ली येथे उभारण्यात आले. संबंधित जमीनमालकाने बक्षीसपत्रामार्फत जागा दिल्याने हा प्रश्न सुटला. तसेच तत्कालिन तहसीलदार जीवन देसाई यांच्या प्रयत्नांतून काही कुटुंबांच्या घराखालील जमीन त्यांच्या नावे करण्यात आल्याने काहींना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही, हाच आता प्रश्न आहे.शेतात मजुरी, औषधी वनस्पती, मध आणि मासेचिपळूण तालुक्यातील मुंढे तर्फे चिपळूण, कुटरे, निरबाडे, नांदगाव, मांडकी बुद्रुक, आकले, तिवरे, नांदिवसे, कुंभार्ली, कादवड, रिक्टोली, गाणे, कळकवणे, ओवळी, पिंपरी खुर्द, बौद्धवाडी, पेढांबे, नागावे आदी गावांमध्ये कातकरी समाजाची लोकवस्ती आहे. एखाद्या गावातील जमीनदाराच्या जागेत वस्ती करून त्याची शेती-वाडीची कामे करायची आणि आपला घरसंसार चालवायचा. तसेच वेळ पडल्यास रानात जाऊन औषधी वनस्पती व मध पोळ्यांचा शोध घेऊन त्यातून थोडीफार कमाई करुन आपल्या झोपडीत पुन्हा विसावा घ्यायचा, हा या समाजाचा नित्यक्रम असतो. त्याचबरोबर गावच्या नदीत जाऊन मासेमारी करणे हादेखील या समाजाचा व्यवसाय मानला जातो. अर्थात त्यातून फारच तुटपुंजे उत्पन्न त्यांच्या वाट्याला येते.