शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

जिल्हा परिषदेला दुजाभावाची वागणूक : सिंधुदुर्गला ८० डॉक्टर, तर रत्नागिरीला शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:07 IST

शासकीय रूग्णालयांमध्ये वेलनेस क्लिनिकअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० बीएएमएस डॉक्टर्सची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपुरी संख्या असतानाही एकाही डॉक्टरची भरती करण्यात येणार नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेला दुजाभावाची वागणूक : सिंधुदुर्गला ८० डॉक्टर, तर रत्नागिरीला शून्यवेलनेस क्लिनिकमधून रत्नागिरी जिल्हा दूरच

रहिम दलाल

रत्नागिरी : शासकीय रूग्णालयांमध्ये वेलनेस क्लिनिकअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० बीएएमएस डॉक्टर्सची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपुरी संख्या असतानाही एकाही डॉक्टरची भरती करण्यात येणार नाही. त्यामुळे शासनाकडून रत्नागिरी जिल्हा परिषदेला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याची ओरड जिल्हाभरात सुरु आहे. त्यासाठी डॉक्टर्सची भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे.

डॉक्टर्स कमी असल्याप्रकरणी अनेकदा जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा झाली. या मागणीचे ठराव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत. तरीही शासनाकडून या मागणीची दखल घेतली जात नसून आरोग्याचा खेळ सुरु आहे.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदांमुळे त्याचा भार केवळ ९१ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शासनाकडील ६३ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

रत्नागिरी जिल्हा डोंगराळ आहे. त्याचबरोबर बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून दूर आहेत. त्याचबरोबर या प्राथमिक आरोग्य केंंद्रांच्या शेजारीच त्यांच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहावे लागते. त्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी अर्धवट सेवा करुन ते निघून गेले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी पुढाकार घेतल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १६ हजार रुपयांच्या मानधनावर २८ बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. ते आजही कार्यरत आहेत. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन-दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा बजवावी लागते. त्यामुळे रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांमुळे कार्यरत असलेल्यांची तारांबळ उडते.

वेलनेस क्लिनिक योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे. या योजनेमध्ये राज्यातील १७ जिल्हे घेण्यात आले आहेत. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० डॉक्टरांची लवकरच भरती करण्यात येणार आहे. मात्र रत्नागिरीचा या योजनेत समावेशच करण्यात आलेला नाही.रत्नागिरी जिल्ह्याचा समावेशच नाहीरत्नागिरी जिल्हा वेलनेस क्लिनिकमध्ये घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेतून एकही डॉक्टर भरण्यात येणार नसल्याने रत्नागिरी जिल्ह्याची झोळी रिकामीच राहणार आहे. त्यामुळे शासनाचा जिल्ह्यातील रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु असून रत्नागिरी जिल्हा परिषदेबाबत दुजाभाव होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरzpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी