शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सोशल मिडियावरील फसवणूक प्रकार रत्नागिरीत उघड, भेटवस्तू पाठवण्याचा बहाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 14:01 IST

परदेशी नागरिक असल्याचे भासवताना किंमती वस्तू भेटवस्तू म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा एक अनोखा फंडा सध्या सोशल मिडियावर विशेष करून फेसबुकवर सुरु आहे. रत्नागिरीत उघडकीस आलेल्या तवंगर जमादार झारी (आदमपूर, रत्नागिरी) यांच्या फसवणुकीवरून त्यामध्ये काहीजण फसले गेल्याचेही दिसून आले आहे.

ठळक मुद्देसोशल मिडियावरील फसवणूक प्रकार रत्नागिरीत उघडपरदेशी नागरिक असल्याचे भासवत किंमती भेटवस्तू पाठवण्याचा बहाणा

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : परदेशी नागरिक असल्याचे भासवताना किंमती वस्तू भेटवस्तू म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा एक अनोखा फंडा सध्या सोशल मिडियावर विशेष करून फेसबुकवर सुरु असून त्यामध्ये काहीजण फसले गेल्याचेही रत्नागिरीत उघडकीस आलेल्या तवंगर जमादार झारी (आदमपूर, रत्नागिरी) यांच्या झालेल्या फसवणुकीवरून दिसून आले असून या प्रकरणात एक टोळकेच सामील असावे, असा कयास काढला जात आहे.

झारी यांच्यासोबतच शहरातील एका नागरिकालाही असाच अनुभव आला असून मात्र तो वेळीच सावध झाल्याने त्याची आर्थिक फसवणूक टळली. तवंगर जमादार झारी यांची ज्या तरूणीने फसवणूक केली, त्या तथाकथित प्रिस्का विल्यम्स हीची आणखी एक फेसबुक प्रोफाईल असून ती या प्रोफाईलवर मेरी जॉन्सन स्मिथ (लंडन) या नावाने कार्यरत आहे. या दोन्ही प्रोफाईलवरील फोटो हा एकच आहे. या दोन्ही अकाऊंटवरून नागरिकांना मैत्रीचे नाटक करून फसवणुकीसाठी जाळ्यात ओढले जात आहे.

याबाबत फसवणूक टळलेल्या नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, जाळ्यात ओढतानाही पध्दतशीरपणे आणि आपल्याबाबत गैरसमज होणार नाहीत, अशा पध्दतीने ओढले जाते. तुमच्यामुळे मला नोकरीत बढती मिळाली म्हणून मी आपल्यावर खूष होऊन महागड्या भेटवस्तू देत आहे, असे मेरी नावाच्या या तरूणीने सांगितले. त्यानंतर महागड्या वस्तू खरेदी केल्याचे सांगून त्याचे फोटो, वस्तूचे पॅकिंग, एवढेच नव्हे तर कुरिअर केल्याची पावतीही पाठवली.

ज्या दिवशी कुरिअर भारतात पोहोचणार, त्याच दिवशी आपल्याला फोन आला आणि त्यांनी कुरिअर कंपनीच्या बँक खात्यात २६ हजार ५०० रुपये भरल्यावर आपले कुरिअर घरपोच केले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र आधीपासूनच सावध असलेल्या या नागरिकाने आपण आपले पार्सल पोहोच झाल्यानंतरच आपण पैसे भरू, असे सांगितले. मात्र तत्पूर्वी त्याने त्या कुरिअरचा अकाऊंट नंबर टिपून घेतला.या अकाऊंटची माहिती घेतली असता फोन करणारी कुरिअर कंपनी दिल्लीतून फोन केल्याचे भासवते आणि पैसे भरण्यासाठी दिलेला बँक अकाऊंट नंबर हा बेंगलोर येथील असल्याचे दिसून आले. त्यामुळे फसवणुकीची पाळेमुळे ही अनेक ठिकाणी पसरली असल्याचे दिसून येते. यामागे एक टोळी कार्यरत असल्याचे मत व्यक्त होत असून त्यामुळेच या सर्व गोष्टी पध्दतशीरपणे आणि कोठेही समोरच्या व्यक्तीला फसवणूक होईपर्यंत संशय येणार नाही, अशा पध्दतीने हाताळल्या जातात, असे म्हटले जात आहे.

मेरी नावाच्या एका मुलीने जे पार्सल रत्नागिरीतील नागरिकाला पाठवले होते, त्या नागरिकाने सांगितले की, त्याला कुरिअर कंपनीकडून पंजाब बँकेचा इंदिरा नगर शाखेचा १२६८०००१०१६१२४०२ हा अकाऊंट नंबर देण्यात आला. कुरिअरमधून आलेला कॉल हा ९५८२६०४८५० या मोबाईलवरून आला होता, असे या नागरिकाने सांगितले.समज-गैरसमज१) परदेशातून येणारा कोणताही माल हा कस्टम खात्याच्या तपासणीनंतरच दिला जातो. कोणतीही कुरिअर कंपनी अकाऊंटमध्ये पैसे भरण्यास सांगत नाही. कस्टम खात्यातही हे पार्सल सर्वांसमक्ष फोडून आतील मालाचे मूल्यांकन केले जाते आणि त्यानंतर त्यावर कस्टम ड्यूटी आकारली जाते.२) परदेशातून बोलणारी तरूणी ही व्हॉटस्अ‍ॅप नंबर हा परदेशी असल्याचे भासवते. परंतु हा व्हॉटस्अ‍ॅप नंबर परदेशात कार्यान्वित केला जातो आणि त्याचा वापर मात्र भारतात केला जातो. त्यामुळे या परदेशी नंबरवर अनेकवेळा कॉलही होत नाही.३) तरूणीकडून केलेला व्हिडिओ कॉलही बनावट असतो. हा कॉल रेकॉर्ड करून आपल्या कॉलवेळी मोबाईलसमोर ठेवला जातो. या कॉलही केवळ काही सेकंदाचाच असतो. आपण बिझी असल्याचे सांगून हा फोन कट केला जातो. 

टॅग्स :fraudधोकेबाजीSocial Mediaसोशल मीडियाRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी