शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

‘त्या’ एक तासात हाेत्याचं नव्हतं झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

बुधवारी रात्री (२१.०७ वाजता) ते गुरुवारी पहाटे (२ वाजता) चिपळूण शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांनी एकमेकांना मोबाईलवरुन संपर्क ...

बुधवारी रात्री (२१.०७ वाजता) ते गुरुवारी पहाटे (२ वाजता) चिपळूण शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांनी एकमेकांना मोबाईलवरुन संपर्क करण्यास सुरुवात केली. २६ जुलै २००५ला महाराष्ट्रात महाप्रलय झाला होता, त्या अंदाजाने व्यापाऱ्यांनी आपले दुकानातील सामान, माल उंचावर ठेवण्यास (त्यावेळच्या पूररेषेच्यावर) सुरुवात केली आणि काही व्यापारी सामान आटोपून परत आपापल्या घरी जाता येणार नाही म्हणून त्यादिवशी पहाटे पाच वाजता घरी गेले.

मात्र, सकाळी साडेसात ते साडेआठ या एका तासात होत्याचं नव्हतं झालं. वरुन कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेली भरती आणि कोयनानगरच्या कोळकेवाडी धरणातून केलेला पाण्याचा विसर्ग, यामुळे एका तासात आठ ते दहा फूट पाणी बाजारपेठेत आले. चिपळूण शहर हे कपबशीसारखे आहे. शहरातील नदी फक्त एक इंच खाली आहे. जे व्यापारी दुकानाजवळ हजर होते ते आपले सामान वर आणखी वर नेऊ लागले. परंतु, पाणी दुकानात जाऊन दुकानाच्या वरुन एक फूट ते चार फूट वाहू लागले. माझ्या दुकानाच्या वरुन पाणी एक फूट वाहू लागले. माझा मुलगा जीव वाचवण्यासाठी दुकानातून मागील बाजूने डोंगरातून घरी आला. माझे घर शहरातील उंच भागावर आहे तरीही घरात प्रथमच ४ फूट पाणी एका तासात आले. डोळ्यादेखत सर्व काही वाहून गेले. दुकानाचे शटर तोडून पाणी आत शिरले आणि टी. व्ही., मोबाईल, अन्नधान्य वाहून गेले. अत्यंत छोटा व्यापारी (१ लाख रुपये) ते मोठे व्यावसायिक (दीड ते दोन कोटी) इतके नुकसान झाले आहे.

या प्रलयाला निव्वळ आणि निव्वळ धरणातील पाणी सोडणारे आणि ते पाणी सोडले जाणार आहे, हे माहीत असूनही आम्हाला अलर्ट न करणारे सर्व अधिकारी जबाबदार आहेत. पाणी सोडायलाच लागते अन्यथा धरणाला धाेका असतो. परंतु, हवामान खात्याने पाच दिवस प्रचंड पाऊस पडेल, याचा अंदाज वर्तवला होता. त्या पाच दिवसांत टप्प्याटप्याने पाणी सोडले असते, ओहोटीच्या काळात सोडले असते तर हे अस्मानी संकट टळलं असतं.

मी आणि सहकाऱ्यांनी शासनाने आम्हाला १० वर्षांसाठी १ टक्क्याने २ लाखांपासून ५० लाखांपर्यंत कर्ज द्यावे, पहिले १ वर्ष हप्ते घेऊ नयेत तसेच आताच सर्व कर्ज एकदाच माफ करावे, (प्रत्येकवेळी शेतकऱ्यांनाच माफी मिळते. ती गैर नाही) अशी विनंती आणि मागणी केलेली आहे.

आता मोठ्या प्रमाणात रोगराई पसरणार आहे. त्यासाठी डाॅक्टरांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी येईलच. सगळीकडे कुबट वास आहे. आज तीन दिवसाने दुकानातील माल बाहेर काढला जाईल, तेव्हा अनेक कचरा गाड्यांतून ही घाण उचलली जाईल.

आम्ही व्यापारी खचलेलो नाही. आम्ही यातूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारणारच, हा आत्मविश्वास आहे. पण एकच मनात हुरहूर आहे. आज माझं वय ५८ आहे. आम्ही आमच्या पुढील पिढीच्या हातात आमचा व्यवसाय देताना त्यांच्या हातात उज्ज्वल भविष्यकाळ देणार आहोत का? कारण आमच्या डोक्यावर कोळकेवाडी धरण नावाचा जिवंत बाॅम्ब उभा आहे.

(लेखक चिपळूण व्यापारी महासंघटनेचे अध्यक्ष आहेत.)

----------------------------

दहा वर्ष चिपळूण मागे गेले

तुम्ही म्हणाल विमा असेल, तो आहे ना, पण २५ टक्के दुकानदारांचाच आणि तोही २००५च्या पूररेषेच्यावरती असलेल्या सामानाचाच मिळणार. चारचाकी गाड्या एकमेकांवर आदळल्या. काही गाड्या ५०० फूट वाहून गेल्या, कितीतरी उलट्या होऊन झाडात वगैरे ठिकाणी अडकल्या. ३० ते ३५ टक्के गाड्या पाण्याखाली असल्यामुळे त्या फक्त आता स्क्रॅबमध्येच जाणार. मी स्वत: २००५चा पूर पाहिलेला आहे. परंतु, आता २२ जुलै २०२१चा महाप्रलयाचा थरार भयानक होता. संपूर्ण चिपळूण शहर आता दहा वर्ष मागे गेले आहे. कोरोनामुळे तीन महिने व्यवसाय ठप्प होता. त्यात पाच व्यापाऱ्यांच्या मागे घरातील एक ते चार सदस्य कोरोनाने ॲडमिट झालेले (त्यातील काही जग सोडून गेले) त्यात आता पुराचा फटका बसला आहे.