शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘त्या’ एक तासात हाेत्याचं नव्हतं झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

बुधवारी रात्री (२१.०७ वाजता) ते गुरुवारी पहाटे (२ वाजता) चिपळूण शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांनी एकमेकांना मोबाईलवरुन संपर्क ...

बुधवारी रात्री (२१.०७ वाजता) ते गुरुवारी पहाटे (२ वाजता) चिपळूण शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांनी एकमेकांना मोबाईलवरुन संपर्क करण्यास सुरुवात केली. २६ जुलै २००५ला महाराष्ट्रात महाप्रलय झाला होता, त्या अंदाजाने व्यापाऱ्यांनी आपले दुकानातील सामान, माल उंचावर ठेवण्यास (त्यावेळच्या पूररेषेच्यावर) सुरुवात केली आणि काही व्यापारी सामान आटोपून परत आपापल्या घरी जाता येणार नाही म्हणून त्यादिवशी पहाटे पाच वाजता घरी गेले.

मात्र, सकाळी साडेसात ते साडेआठ या एका तासात होत्याचं नव्हतं झालं. वरुन कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेली भरती आणि कोयनानगरच्या कोळकेवाडी धरणातून केलेला पाण्याचा विसर्ग, यामुळे एका तासात आठ ते दहा फूट पाणी बाजारपेठेत आले. चिपळूण शहर हे कपबशीसारखे आहे. शहरातील नदी फक्त एक इंच खाली आहे. जे व्यापारी दुकानाजवळ हजर होते ते आपले सामान वर आणखी वर नेऊ लागले. परंतु, पाणी दुकानात जाऊन दुकानाच्या वरुन एक फूट ते चार फूट वाहू लागले. माझ्या दुकानाच्या वरुन पाणी एक फूट वाहू लागले. माझा मुलगा जीव वाचवण्यासाठी दुकानातून मागील बाजूने डोंगरातून घरी आला. माझे घर शहरातील उंच भागावर आहे तरीही घरात प्रथमच ४ फूट पाणी एका तासात आले. डोळ्यादेखत सर्व काही वाहून गेले. दुकानाचे शटर तोडून पाणी आत शिरले आणि टी. व्ही., मोबाईल, अन्नधान्य वाहून गेले. अत्यंत छोटा व्यापारी (१ लाख रुपये) ते मोठे व्यावसायिक (दीड ते दोन कोटी) इतके नुकसान झाले आहे.

या प्रलयाला निव्वळ आणि निव्वळ धरणातील पाणी सोडणारे आणि ते पाणी सोडले जाणार आहे, हे माहीत असूनही आम्हाला अलर्ट न करणारे सर्व अधिकारी जबाबदार आहेत. पाणी सोडायलाच लागते अन्यथा धरणाला धाेका असतो. परंतु, हवामान खात्याने पाच दिवस प्रचंड पाऊस पडेल, याचा अंदाज वर्तवला होता. त्या पाच दिवसांत टप्प्याटप्याने पाणी सोडले असते, ओहोटीच्या काळात सोडले असते तर हे अस्मानी संकट टळलं असतं.

मी आणि सहकाऱ्यांनी शासनाने आम्हाला १० वर्षांसाठी १ टक्क्याने २ लाखांपासून ५० लाखांपर्यंत कर्ज द्यावे, पहिले १ वर्ष हप्ते घेऊ नयेत तसेच आताच सर्व कर्ज एकदाच माफ करावे, (प्रत्येकवेळी शेतकऱ्यांनाच माफी मिळते. ती गैर नाही) अशी विनंती आणि मागणी केलेली आहे.

आता मोठ्या प्रमाणात रोगराई पसरणार आहे. त्यासाठी डाॅक्टरांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी येईलच. सगळीकडे कुबट वास आहे. आज तीन दिवसाने दुकानातील माल बाहेर काढला जाईल, तेव्हा अनेक कचरा गाड्यांतून ही घाण उचलली जाईल.

आम्ही व्यापारी खचलेलो नाही. आम्ही यातूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारणारच, हा आत्मविश्वास आहे. पण एकच मनात हुरहूर आहे. आज माझं वय ५८ आहे. आम्ही आमच्या पुढील पिढीच्या हातात आमचा व्यवसाय देताना त्यांच्या हातात उज्ज्वल भविष्यकाळ देणार आहोत का? कारण आमच्या डोक्यावर कोळकेवाडी धरण नावाचा जिवंत बाॅम्ब उभा आहे.

(लेखक चिपळूण व्यापारी महासंघटनेचे अध्यक्ष आहेत.)

----------------------------

दहा वर्ष चिपळूण मागे गेले

तुम्ही म्हणाल विमा असेल, तो आहे ना, पण २५ टक्के दुकानदारांचाच आणि तोही २००५च्या पूररेषेच्यावरती असलेल्या सामानाचाच मिळणार. चारचाकी गाड्या एकमेकांवर आदळल्या. काही गाड्या ५०० फूट वाहून गेल्या, कितीतरी उलट्या होऊन झाडात वगैरे ठिकाणी अडकल्या. ३० ते ३५ टक्के गाड्या पाण्याखाली असल्यामुळे त्या फक्त आता स्क्रॅबमध्येच जाणार. मी स्वत: २००५चा पूर पाहिलेला आहे. परंतु, आता २२ जुलै २०२१चा महाप्रलयाचा थरार भयानक होता. संपूर्ण चिपळूण शहर आता दहा वर्ष मागे गेले आहे. कोरोनामुळे तीन महिने व्यवसाय ठप्प होता. त्यात पाच व्यापाऱ्यांच्या मागे घरातील एक ते चार सदस्य कोरोनाने ॲडमिट झालेले (त्यातील काही जग सोडून गेले) त्यात आता पुराचा फटका बसला आहे.