शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुळवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 2:50 PM

gram panchayat Elecation Ratnagiri- असगोली तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी असली तरी गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून अन्य सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देगुहागरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुळवड२९ ग्रामपंचायतींसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू

असगोली : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी असली तरी गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून अन्य सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.तालुक्यातील कोंडकरूळ, रानवी, भातगाव, तळवली, निगुंडळ, पालपेणे, नरवण, पिंपर, मळण, शीर, वेळणेश्वर, जामसुत, मासू, अडूर, काजुर्ली, शिवणे, गोळेवाडी, मुंढर, पडवे, काताळे, उमराठ, कुडली, पेवे, खामशेत, साखळी बुद्रुक, साखरी आगर, कोळवली, गिमवी, कोसबीवाडी आदी २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुन्या-नव्यांची सांगड घालावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून राजेंद्र आरेकर यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गाव पातळीवरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित बैठका सुरू झाल्या आहेत.राष्ट्रवादी अडसर ठरेल?राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र असले तरी गुहागरात मात्र राष्ट्रवादी शिवसेनेला अडसर ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला बळकटी मिळाली आहे.लढत तीन पक्षात?भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या माध्यमातून वाडी-वस्तीवर बैठका सुरू केल्या आहेत. केंद्रशासनाच्या योजनांच्या जोरावर अधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. खरी लढत ही शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप या तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार हे निश्चित आहे. त्यातही तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून रिंगणात उतरल्यास चित्र बदलेल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीGuhagar Nagar Panchayatगुहागर नगरपंचायतElectionनिवडणूक