शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन

By शोभना कांबळे | Updated: December 10, 2024 18:32 IST

रत्नागिरी : बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या सांधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, या मागणीसाठी ...

रत्नागिरी : बांगलादेशातीलहिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या सांधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, या मागणीसाठी रत्नागिरीतील विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदाेलनाला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. बांगलादेशाच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी यावेळी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली.बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवरही अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयाेगाने याची दखल घ्यावी, स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमधील हिंदूंची संख्या ३८ टक्के होती. ती आता केवळ आठ टक्केच राहिली आहे.त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते उपाय तत्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता होण्यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळातर्फे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे देण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत आमच्या या भावना पोहचवाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार उदय सामंत, किरण सामंत, रूची महाजनी, सचिन वहाळकर, तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBangladeshबांगलादेशHinduहिंदूagitationआंदोलनUday Samantउदय सामंत