शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन

By शोभना कांबळे | Updated: December 10, 2024 18:32 IST

रत्नागिरी : बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या सांधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, या मागणीसाठी ...

रत्नागिरी : बांगलादेशातीलहिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या सांधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, या मागणीसाठी रत्नागिरीतील विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदाेलनाला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. बांगलादेशाच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी यावेळी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली.बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवरही अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयाेगाने याची दखल घ्यावी, स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमधील हिंदूंची संख्या ३८ टक्के होती. ती आता केवळ आठ टक्केच राहिली आहे.त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते उपाय तत्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता होण्यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळातर्फे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे देण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत आमच्या या भावना पोहचवाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार उदय सामंत, किरण सामंत, रूची महाजनी, सचिन वहाळकर, तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBangladeshबांगलादेशHinduहिंदूagitationआंदोलनUday Samantउदय सामंत