शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूने चिंता वाढली, आणखी २२ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:29 AM

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. आराेग्य विभागाच्या अहवालानुसार आणखी ...

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. आराेग्य विभागाच्या अहवालानुसार आणखी २२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर २५६ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले असून, दिवसभरात केवळ ११६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्हा आराेग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार शनिवारी दिवसभरात ४, तर मागील १८ रुग्णांचा काेराेनाने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील मृतांमध्ये राजापूर तालुक्यातील ७, रत्नागिरीतील ६, चिपळुणातील ४, संगमेश्वरमध्ये २ आणि खेड, गुहागर, लांजातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २०८३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण ६७,१२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रुग्णांचा बरे होण्याचा दर ९३.८५ टक्के आहे. ३,६८२ आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५२ बाधित, तर २,३०० अँटिजन चाचण्यांमध्ये १०४ बाधित रुग्ण सापडले. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात २ रुग्ण, दापोलीत १७, खेडमध्ये २७, गुहागरात २४, चिपळुणात ५३, संगमेश्वरात ७, रत्नागिरीत ९०, लांजात २१ आणि राजापुरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २,०७४ रुग्ण उपचार घेत असून, त्यामध्ये १,६५६ लक्षणे नसलेले रुग्ण, तर ४१८ लक्षणे असलेले रुग्ण आहेत. १९७ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असून, ७२ अतिदक्षता विभागात आहेत.

-----------------

अजून मागील मृत्यू किती?

जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शुक्रवारी २८ रुग्ण दाखविण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी आराेग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालामध्ये १८ रुग्णांचा मृत्यू मागील दिवसांमध्ये झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मागील दिवसांत आणखी किती जणांचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.