शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

साखरपा धरणातून गळतीमुळे धोका, अधिकाऱ्यांकडून धरणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:04 IST

संतोष पोटफोडेसाखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरपा धरणाला गळती लागली आहे. धरणाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ५०० घरांना धोका आहे. शनिवारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली.तत्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या प्रयत्नाने साखरपा येथे धरण बांधण्यात आले. १९९५ साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली काम पूर्ण ...

ठळक मुद्दे तालुक्यातील कोंडगाव - साखरपा परिसरातील पाचशे घरे भीतीच्या छायेत धरणाला मोठे भगदाड पडून ते फुटण्याची शक्यता

संतोष पोटफोडे

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरपा धरणाला गळती लागली आहे. धरणाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ५०० घरांना धोका आहे. शनिवारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली.तत्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या प्रयत्नाने साखरपा येथे धरण बांधण्यात आले. १९९५ साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली काम पूर्ण होऊन पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. तत्कालिन ठेकेदार चन्ना रेड्डी यांनी या धरणाचे काम घेतले होते. प्रथम धरणातून गढूळ पाणी येत असल्याचे निवृत्त प्राथमिक शिक्षक दत्ताराम शिंदे यांच्या निदर्शनास आले.

हे गढूळ पाणी कोठून येते, याची खातरजमा करण्यासाठी दत्ताराम शिंदे यांनी धरण परिसरात पाहणी केली असता, धरणाच्या जॅकवेल शेजारील भिंतीमधून तळाच्या भागातून पाणी येत असल्याचा अंदाज त्यांनी बांधला. शिंदे यांना गळती होत असल्याची पक्की खात्री पटताच त्यांनी त्वरित पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला.

या घटनेचे गांभीर्य ओळखून लांजा पाटबंधारे विभागाचे लवंदे व नलावडे हे घटनास्थळी दाखल झाले. प्रथम १६ तारखेला त्यानंतर १७ व २० आॅक्टोबर रोजी रत्नागिरी विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर २८ आॅक्टोबरला गडगडी प्रकल्पाच्या प्रसादे मॅडम यांनी धरणाची पाहणी केली. या सर्वांनी धरणाला शंभर टक्के धोका असल्याचा निष्कर्ष काढला असून, धरणाची त्वरित दुरुस्ती केली नाही तर धरणाला मोठे भगदाड पडून ते फुटण्याची शक्यता आहे.धरणाची गळती सुरु असताना याबाबतची कल्पना सरपंचांना व पोलीसपाटीलांना का देण्यात आली नाही, धरणापासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर वस्ती असतानाही खबरदारीचा म्हणून त्यांना का कळविण्यात आले नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी धरण पूर्ण भरल्यावर पोलीस पाटलांना कळविले जात असे. मात्र धरण धोकादायक स्थितीत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांना कळविण्याची तसदीदेखील घेतली नाही.

धरणाची देखरेख करण्यासाठी पाडावे नामक व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून सुमारे १० वर्षे काम करीत होते. मात्र, सध्या येथे सुरक्षा रक्षकच नाही. धरणाच्या आजूबाजूला जंगल असल्याने गुराखी जनावरांना चरण्यासाठी नेतात. याआधी पाटबंधारे विभागाचे अभियंता लवंदे यांच्याकडून धरणाची देखरेख होत होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर धरणाकडे दुर्लक्ष होत गेल्याचे शिंदे यांनी सांगितले.सुमारे पाचशे घरांना धोकाधरणापासून १०० ते १५० मीटर अंतरावर असणाऱ्या जोयशीवाडी, बौद्धवाडी, बार्इंगवाडी, केतकरआळी, मच्छीमार्के ट परिसरातील घरांना धरणाचा धोका असून, यामध्ये ग्रामदेवता गांगेश्वर मंदिर, जांगळदेव मंदिर, प्राथमिक शाळा, तु. ग. गांधी विद्यालय, सान बार्इंगवाडी येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, मच्छीमार्के ट परिसरातील वस्ती व कार्यालये यांनाही धोका पोहोचू शकतो. एवढे असूनदेखील पोलीसपाटीलांना कल्पना का देण्यात आली नाही, याचीदेखील चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण