शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

साखरपा धरणातून गळतीमुळे धोका, अधिकाऱ्यांकडून धरणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:04 IST

संतोष पोटफोडेसाखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरपा धरणाला गळती लागली आहे. धरणाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ५०० घरांना धोका आहे. शनिवारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली.तत्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या प्रयत्नाने साखरपा येथे धरण बांधण्यात आले. १९९५ साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली काम पूर्ण ...

ठळक मुद्दे तालुक्यातील कोंडगाव - साखरपा परिसरातील पाचशे घरे भीतीच्या छायेत धरणाला मोठे भगदाड पडून ते फुटण्याची शक्यता

संतोष पोटफोडे

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरपा धरणाला गळती लागली आहे. धरणाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ५०० घरांना धोका आहे. शनिवारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली.तत्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या प्रयत्नाने साखरपा येथे धरण बांधण्यात आले. १९९५ साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली काम पूर्ण होऊन पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. तत्कालिन ठेकेदार चन्ना रेड्डी यांनी या धरणाचे काम घेतले होते. प्रथम धरणातून गढूळ पाणी येत असल्याचे निवृत्त प्राथमिक शिक्षक दत्ताराम शिंदे यांच्या निदर्शनास आले.

हे गढूळ पाणी कोठून येते, याची खातरजमा करण्यासाठी दत्ताराम शिंदे यांनी धरण परिसरात पाहणी केली असता, धरणाच्या जॅकवेल शेजारील भिंतीमधून तळाच्या भागातून पाणी येत असल्याचा अंदाज त्यांनी बांधला. शिंदे यांना गळती होत असल्याची पक्की खात्री पटताच त्यांनी त्वरित पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला.

या घटनेचे गांभीर्य ओळखून लांजा पाटबंधारे विभागाचे लवंदे व नलावडे हे घटनास्थळी दाखल झाले. प्रथम १६ तारखेला त्यानंतर १७ व २० आॅक्टोबर रोजी रत्नागिरी विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर २८ आॅक्टोबरला गडगडी प्रकल्पाच्या प्रसादे मॅडम यांनी धरणाची पाहणी केली. या सर्वांनी धरणाला शंभर टक्के धोका असल्याचा निष्कर्ष काढला असून, धरणाची त्वरित दुरुस्ती केली नाही तर धरणाला मोठे भगदाड पडून ते फुटण्याची शक्यता आहे.धरणाची गळती सुरु असताना याबाबतची कल्पना सरपंचांना व पोलीसपाटीलांना का देण्यात आली नाही, धरणापासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर वस्ती असतानाही खबरदारीचा म्हणून त्यांना का कळविण्यात आले नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी धरण पूर्ण भरल्यावर पोलीस पाटलांना कळविले जात असे. मात्र धरण धोकादायक स्थितीत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांना कळविण्याची तसदीदेखील घेतली नाही.

धरणाची देखरेख करण्यासाठी पाडावे नामक व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून सुमारे १० वर्षे काम करीत होते. मात्र, सध्या येथे सुरक्षा रक्षकच नाही. धरणाच्या आजूबाजूला जंगल असल्याने गुराखी जनावरांना चरण्यासाठी नेतात. याआधी पाटबंधारे विभागाचे अभियंता लवंदे यांच्याकडून धरणाची देखरेख होत होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर धरणाकडे दुर्लक्ष होत गेल्याचे शिंदे यांनी सांगितले.सुमारे पाचशे घरांना धोकाधरणापासून १०० ते १५० मीटर अंतरावर असणाऱ्या जोयशीवाडी, बौद्धवाडी, बार्इंगवाडी, केतकरआळी, मच्छीमार्के ट परिसरातील घरांना धरणाचा धोका असून, यामध्ये ग्रामदेवता गांगेश्वर मंदिर, जांगळदेव मंदिर, प्राथमिक शाळा, तु. ग. गांधी विद्यालय, सान बार्इंगवाडी येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, मच्छीमार्के ट परिसरातील वस्ती व कार्यालये यांनाही धोका पोहोचू शकतो. एवढे असूनदेखील पोलीसपाटीलांना कल्पना का देण्यात आली नाही, याचीदेखील चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण