शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: बसने रस्ता सोडला, झाडाने जीव वाचवला; दाभोळ-मुंबई बसला शेनाळे घाटात अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:44 IST

मंडणगड : दापाेलीहून मुंबईच्या दिशेने निघालेली दाभाेळ - मुंबई एसटी बस रस्ता साेडून १५ फूट खाली घसरून पलटी झाल्याची ...

मंडणगड : दापाेलीहून मुंबईच्या दिशेने निघालेली दाभाेळ - मुंबई एसटी बस रस्ता साेडून १५ फूट खाली घसरून पलटी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री मंडणगड ते म्हाप्रळ मार्गावरील शेनाळे घाटात घडली. सुदैवाने ही बस झाडाला अडकल्याने रस्त्याशेजारील चिंचाळी धरणात काेसळता काेसळता वाचली. त्यामुळे बसमधील ४१ प्रवाशांचे प्राण वाचले.बसचालक व्ही. एस. गावडे हे दाभाेळ - मुंबई बस (एमएच १४, बीटी २२६५) घेऊन निघाले हाेते. या बसमध्ये वाहक मंदार भाेईर यांच्यासह ४१ प्रवासी हाेते. ही बस मंडणगड येथून निघाली असता, मध्यरात्री १:५५ च्या दरम्यान चिंचाळी धरणानजीक आली असता बसने रस्ता साेडला आणि १५ फूट बाजूला उलटली. सुदैवाने त्याचठिकाणी असणाऱ्या झाडाला बस अडकल्याने माेठा अनर्थ टळला. या अपघातात प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली आहे.या अपघातादरम्यान चाैक (ता. खालापूर, जि. रायगड) येथील मनोज थोरवे व त्यांचे सहकारी प्रवास करत हाेते. त्यांनी अपघात पाहिला आणि ते मदतीसाठी थांबलेे. तसेच मंडणगड येथील सचिन चव्हाण व गोठे गावातील जितेंद्र दवंडे हे एका रुग्णाला घेऊन या मार्गाने मुंबईला जात होते. चव्हाण यांनी थांबून गाडीत चढून प्रवाशांना बाहेर काढले. गाडीतील काही तरुण प्रवाशांनीही त्यांना मदत केली. त्याचबरोबर नगरसेवक मुश्ताक दाभीळकर यांनीही मदत करून जखमींना बाहेर काढले.या अपघाताची माहिती मिळताच मंडणगडचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय धुपकर, पोलिस हवालदार गणेश चव्हाण, पोलिस काॅन्स्टेबल सुहास मांडवकर, विशाल कोळथरकर, महेंद्र तांदळे, आकाराम माने यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेने मंडणगड ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

संरक्षक भिंत गरजेचीसुमारे चार वर्षांपूर्वी याच ठिकाणावरून एक डंपर धरण क्षेत्रात कोसळून एका तरुणाचा जीव गेला होता. त्यामुळे याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी होत आहे.

यंत्रणांचे दूरध्वनी बंदया अपघाताची माहिती देण्याकरिता नागरिकांनी मंडणगड तहसील कार्यालय, पोलिस स्थानक व दवाखान्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिन्ही ठिकाणचे फोन बंद हाेते. त्यामुळे आपत्तीच्या काळात नेमका संपर्क काेठे साधायचा, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात