शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

कोरोनाची धास्ती चोरट्यांनाही, रत्नागिरीत घरफोड्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 17:17 IST

Crime News Ratnagiri Police- कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला असल्याचे घरफोड्यांच्या घटलेल्या संख्येवरून दिसत आहे. रत्नागिरी शहरात २०१८ मध्ये २४, तर २०१९ मध्ये ३० घरफोड्या झाल्या आहेत. मात्र, २०२० या वर्षी शहरात केवळ ७ घरफोड्यांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात पोलिसांची गस्त वाढल्यानेही चोरट्यांना बसला धसकालोक घरी असल्याचा सकारात्मक परिणाम

तन्मय दातेरत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला असल्याचे घरफोड्यांच्या घटलेल्या संख्येवरून दिसत आहे. रत्नागिरी शहरात २०१८ मध्ये २४, तर २०१९ मध्ये ३० घरफोड्या झाल्या आहेत. मात्र, २०२० या वर्षी शहरात केवळ ७ घरफोड्यांची नोंद झाली आहे.कोरोनाने सन २०२० मध्ये सगळीच आर्थिक गणितं बिघडून टाकली होती. पहिले काही दिवस सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ह्यवर्क फ्रॉम होमह्णला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या तर पोलीस २४ तास रस्त्यावर तैनात झाले.

या सर्व परिस्थितीचा परिणाम सर्वसामान्यांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकालाच झाल्याचे दिसले. त्याचप्रमाणे तो गुन्हेगारी क्षेत्रावरही झाला. कोरोनाच्या काळात पोलिसांबरोबरच ग्रामसुरक्षा दलासह पोलीस मित्र बनूनही अनेक नागरिक डोळ्यात तेल घालून न दिसणाऱ्या कोरोनापासून सर्वांचे संरक्षण करत होते. त्यामुळे चोरट्यांनाही बाहेर पडणे मुश्कील झाले होते. चोरी हाच आधार असणाऱ्यांचीही आर्थिक कोंडी झाली.गेल्या काही वर्षांत घरफोड्यांचे प्रमाण खूपच वाढत आहे. २०१८ मध्ये रत्नागिरी शहरात २४ घरफोड्या झाल्या होत्या. त्यातील ४ चोऱ्या दिवसा झाल्या होत्या. एकूण ९ चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोड्यांचा हा आकडा सन २०१९ मध्ये ३० पर्यंत जाऊन पोहोचला होता. या चोऱ्यांमध्ये एक चोरी दिवसाची झाली होती. त्यातील ११ घरफोड्यांचा तपास पूर्ण झाला आहे. २०२० मध्ये मात्र शहरात केवळ ७ घरफोड्या झाल्याची नोंद आहे. त्यातील एक चोरी दिवसाढवळ्या झाली होती. या सर्व चोऱ्यांपैकी ३ चोऱ्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. कोरोनाच्या धसक्याने चोरट्यांनीही बाहेर न पडण्याचे ठरविल्याची शक्यता असल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.

घरातून बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना, नातेवाइकांना किंवा पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे. कोणताही किमती ऐवज बाहेर जाताना आपल्या सोबत किंवा घरातही ठेवू नका. किमती किंवा मौल्यवान ऐवज बँकेचा लॉकरमध्ये ठेवा. घराच्या आवारात जर सीसीटीव्ही असेल तर त्याचा डीव्हीआर सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.- अनिल लाड,शहर पोलीस निरीक्षक, रत्नागिरी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी