शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

कोरोनाची धास्ती चोरट्यांनाही, रत्नागिरीत घरफोड्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 17:17 IST

Crime News Ratnagiri Police- कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला असल्याचे घरफोड्यांच्या घटलेल्या संख्येवरून दिसत आहे. रत्नागिरी शहरात २०१८ मध्ये २४, तर २०१९ मध्ये ३० घरफोड्या झाल्या आहेत. मात्र, २०२० या वर्षी शहरात केवळ ७ घरफोड्यांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात पोलिसांची गस्त वाढल्यानेही चोरट्यांना बसला धसकालोक घरी असल्याचा सकारात्मक परिणाम

तन्मय दातेरत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला असल्याचे घरफोड्यांच्या घटलेल्या संख्येवरून दिसत आहे. रत्नागिरी शहरात २०१८ मध्ये २४, तर २०१९ मध्ये ३० घरफोड्या झाल्या आहेत. मात्र, २०२० या वर्षी शहरात केवळ ७ घरफोड्यांची नोंद झाली आहे.कोरोनाने सन २०२० मध्ये सगळीच आर्थिक गणितं बिघडून टाकली होती. पहिले काही दिवस सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ह्यवर्क फ्रॉम होमह्णला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या तर पोलीस २४ तास रस्त्यावर तैनात झाले.

या सर्व परिस्थितीचा परिणाम सर्वसामान्यांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकालाच झाल्याचे दिसले. त्याचप्रमाणे तो गुन्हेगारी क्षेत्रावरही झाला. कोरोनाच्या काळात पोलिसांबरोबरच ग्रामसुरक्षा दलासह पोलीस मित्र बनूनही अनेक नागरिक डोळ्यात तेल घालून न दिसणाऱ्या कोरोनापासून सर्वांचे संरक्षण करत होते. त्यामुळे चोरट्यांनाही बाहेर पडणे मुश्कील झाले होते. चोरी हाच आधार असणाऱ्यांचीही आर्थिक कोंडी झाली.गेल्या काही वर्षांत घरफोड्यांचे प्रमाण खूपच वाढत आहे. २०१८ मध्ये रत्नागिरी शहरात २४ घरफोड्या झाल्या होत्या. त्यातील ४ चोऱ्या दिवसा झाल्या होत्या. एकूण ९ चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोड्यांचा हा आकडा सन २०१९ मध्ये ३० पर्यंत जाऊन पोहोचला होता. या चोऱ्यांमध्ये एक चोरी दिवसाची झाली होती. त्यातील ११ घरफोड्यांचा तपास पूर्ण झाला आहे. २०२० मध्ये मात्र शहरात केवळ ७ घरफोड्या झाल्याची नोंद आहे. त्यातील एक चोरी दिवसाढवळ्या झाली होती. या सर्व चोऱ्यांपैकी ३ चोऱ्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. कोरोनाच्या धसक्याने चोरट्यांनीही बाहेर न पडण्याचे ठरविल्याची शक्यता असल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.

घरातून बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना, नातेवाइकांना किंवा पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे. कोणताही किमती ऐवज बाहेर जाताना आपल्या सोबत किंवा घरातही ठेवू नका. किमती किंवा मौल्यवान ऐवज बँकेचा लॉकरमध्ये ठेवा. घराच्या आवारात जर सीसीटीव्ही असेल तर त्याचा डीव्हीआर सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.- अनिल लाड,शहर पोलीस निरीक्षक, रत्नागिरी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी