शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती चोरट्यांनाही, रत्नागिरीत घरफोड्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 17:17 IST

Crime News Ratnagiri Police- कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला असल्याचे घरफोड्यांच्या घटलेल्या संख्येवरून दिसत आहे. रत्नागिरी शहरात २०१८ मध्ये २४, तर २०१९ मध्ये ३० घरफोड्या झाल्या आहेत. मात्र, २०२० या वर्षी शहरात केवळ ७ घरफोड्यांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात पोलिसांची गस्त वाढल्यानेही चोरट्यांना बसला धसकालोक घरी असल्याचा सकारात्मक परिणाम

तन्मय दातेरत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला असल्याचे घरफोड्यांच्या घटलेल्या संख्येवरून दिसत आहे. रत्नागिरी शहरात २०१८ मध्ये २४, तर २०१९ मध्ये ३० घरफोड्या झाल्या आहेत. मात्र, २०२० या वर्षी शहरात केवळ ७ घरफोड्यांची नोंद झाली आहे.कोरोनाने सन २०२० मध्ये सगळीच आर्थिक गणितं बिघडून टाकली होती. पहिले काही दिवस सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ह्यवर्क फ्रॉम होमह्णला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या तर पोलीस २४ तास रस्त्यावर तैनात झाले.

या सर्व परिस्थितीचा परिणाम सर्वसामान्यांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकालाच झाल्याचे दिसले. त्याचप्रमाणे तो गुन्हेगारी क्षेत्रावरही झाला. कोरोनाच्या काळात पोलिसांबरोबरच ग्रामसुरक्षा दलासह पोलीस मित्र बनूनही अनेक नागरिक डोळ्यात तेल घालून न दिसणाऱ्या कोरोनापासून सर्वांचे संरक्षण करत होते. त्यामुळे चोरट्यांनाही बाहेर पडणे मुश्कील झाले होते. चोरी हाच आधार असणाऱ्यांचीही आर्थिक कोंडी झाली.गेल्या काही वर्षांत घरफोड्यांचे प्रमाण खूपच वाढत आहे. २०१८ मध्ये रत्नागिरी शहरात २४ घरफोड्या झाल्या होत्या. त्यातील ४ चोऱ्या दिवसा झाल्या होत्या. एकूण ९ चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोड्यांचा हा आकडा सन २०१९ मध्ये ३० पर्यंत जाऊन पोहोचला होता. या चोऱ्यांमध्ये एक चोरी दिवसाची झाली होती. त्यातील ११ घरफोड्यांचा तपास पूर्ण झाला आहे. २०२० मध्ये मात्र शहरात केवळ ७ घरफोड्या झाल्याची नोंद आहे. त्यातील एक चोरी दिवसाढवळ्या झाली होती. या सर्व चोऱ्यांपैकी ३ चोऱ्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. कोरोनाच्या धसक्याने चोरट्यांनीही बाहेर न पडण्याचे ठरविल्याची शक्यता असल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.

घरातून बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना, नातेवाइकांना किंवा पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे. कोणताही किमती ऐवज बाहेर जाताना आपल्या सोबत किंवा घरातही ठेवू नका. किमती किंवा मौल्यवान ऐवज बँकेचा लॉकरमध्ये ठेवा. घराच्या आवारात जर सीसीटीव्ही असेल तर त्याचा डीव्हीआर सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.- अनिल लाड,शहर पोलीस निरीक्षक, रत्नागिरी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी