शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

corona virus -रत्नागिरी पुन्हा नागरिकांनी गजबजली, अनेक वाहने रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 15:04 IST

जनता कर्फ्यूला रविवारी १०० टक्के प्रतिसाद देणाऱ्या रत्नागिरीकरांनी सोमवारी मात्र बेपर्वाईचे दर्शन घडविले. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रत्नागिरीत सोमवारी सकाळपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे नागरिकही खरेदीसाठी घराबाहेर, वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईतीन तासात ६०० वाहन चालकांवर कारवाई

रत्नागिरी : जनता कर्फ्यूला रविवारी १०० टक्के प्रतिसाद देणाऱ्या रत्नागिरीकरांनी सोमवारी मात्र बेपर्वाईचे दर्शन घडविले. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रत्नागिरीत सोमवारी सकाळपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे.

सगळीकडे १४४ कलम लागू असल्याने गर्दी होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून मोठी कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सकाळपासून केवळ तीन तासात पोलिसांनी जवळजवळ ६०० वाहन चालकांवर कारवाई केली.रविवारी जनता कर्फ्यूला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार असल्याने बहुतांशी लोक घराबाहेर पडलीच नव्हती. त्यामुळे सर्वत्र सामसूम होते. लोकांची गर्दी होऊ नये यासाठी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचे गांभीर्य रत्नागिरीकरांना नसल्याचे दिसून आले.

लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करूनही अनेकजण सकाळी घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेकजण फिरायला बाहेर पडल्याचेही विदारक चित्र पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आलेली असतानाही अनेकजण बेफिकीरपणे विनाकारण घराबाहेर पडले होते.कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडलेल्या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. वाहनचालकांना थांबवून त्यांना विचारणा करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहन्यांची तपासली पोलिसांकडून होत असल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.रत्नागिरी शहरात सोमवारी सकाळी तब्बल ६०० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. लोकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करुन सुध्दा लोक गर्दी करु लागलेत. त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून रत्नागिरी शहरातील गाडीतळ, परटवणे एस्. टी. स्टॅण्ड, आठवडा बाजार, मारुती मंदिर, नाचणे - गोडावून स्टॉप या परिसरात सर्वच रिक्षा थांब्यावर रिक्षा व्यवसाय सुरू आहेत.शहरातील सर्व रिक्षा वाहतूक तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार रिक्षाचालकांवरही कारवाई करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात सुरू त्यामुळे आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीtraffic policeवाहतूक पोलीस