शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Coronavirus Unlock- कोरोनाला रोखण्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर हिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 18:27 IST

CoronaVirus, Ratnagirinews कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांनी जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. एका सप्टेंबर महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्ण सापडले असण्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये एक हजार आणि नोव्हेंबरमध्ये तर ३६० नवे रूग्ण सापडले आहेत. ही संख्या घटत असल्याने आता आरोग्य यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाला रोखण्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर हिटमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचाही हातभार

मनोज मुळ्येरत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांनी जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. एका सप्टेंबर महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्ण सापडले असण्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये एक हजार आणि नोव्हेंबरमध्ये तर ३६० नवे रूग्ण सापडले आहेत. ही संख्या घटत असल्याने आता आरोग्य यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि जिल्हा हादरून गेला. सुरुवातीला एक नवीन रूग्ण सापडण्याने धास्ती वाढत होती, तिथे नंतर नंतर रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत गेली.सुरुवातीला तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाला उपस्थित लोक कोरोनाबाधित असल्याचे सापडले. त्यानंतर मुंबईत वाढणाऱ्या रुग्णांमुळे लाखो मुंबईकर रत्नागिरी जिल्ह्यात परत आले. तेव्हापासून रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढतच गेले. गणेशोत्सव काळात ही संख्या अधिकच जोमाने वाढली. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढले.सुदैवाने ऑक्टोबर महिन्यापासून हे प्रमाण घटू लागले. १९ ऑक्टोबरपासून नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट होत गेली. नोव्हेंबर महिन्यात तर हे प्रमाण अधिकच कमी आले आहे.महिनानिहाय सापडलेले रुग्ण- मार्च - ०१, एप्रिल - ०५, मे - २६४, जून - ३४४, जुलै - १२१२, ऑगस्ट - २०१६, सप्टेंबर - ३४७६, ऑक्टोबर - १०४१, नोव्हेंबर ३६०चाकरमानी आल्यानंतर..ज्या प्रमाणात चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात येऊ लागले, त्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे चाकरमानी गावी आले. पण त्यातील काहीजणांनी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली.रुग्णांचे वेळेवर निदानरत्नागिरीत कोरोना टेस्ट लॅब सुरू झाल्यानंतर रुग्णांचे निदान होण्याची वेळ अधिक कमी झाली. त्याआधी स्वॅब तपासणी मिरज, कोल्हापूर येथे केली जात होती. निदान वेळेवर झाल्याने आजार पसरण्याआधी रूग्णांवर उपचार सुरू झाले. आसपासच्या लोकांवरही वेळेवर उपचार झाले.माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचाही हातभारराज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम दोन टप्प्यात राबवली. आरोग्य खात्याने प्रत्येक कुटुंबाची तपासणी केली. जे लोक लक्षणे नाहीत, म्हणून तपासणीसाठी गेले नव्हते, जे लोक आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून तपासणीपासून वंचित होते, अशा सर्व लोकांची तपासणी झाली. कोरोनाला रोखण्यामध्ये त्याचाही हातभार खूप मोठा होता. त्यामुळे तळागाळातील लोकांमध्ये चांगल्या प्रमाणात जागृतीही झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक