शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र, मंत्री उदय सामंत यांचा महाविकास आघाडीवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:12 IST

एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले तंताेतंत खरे

रत्नागिरी : वक्फ बाेर्ड हे सर्वसामान्य मुस्लीम बांधवांना न्याय देण्यासाठी आणण्यात आले आहे. त्यामुळे खाेटे बाेलून आपल्याकडे आलेली मुस्लीम समाजाची मते पुन्हा महायुतीकडे जातील या भीतीने आराेप-प्रत्याराेप केले जात आहेत. वक्फ बाेर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखल्याचा आराेप राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.मंत्री सामंत रविवारी रत्नागिरी दाैऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून हाेणाऱ्या आराेपात काही तथ्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, वक्फ बाेर्ड मुस्लीम समाजाला किंवा धर्माला त्रास देण्यासाठी आणलेले नाही. उलट सर्वसामान्य मुस्लीम बांधवांना न्याय देण्यासाठी आणलेले आहे.ज्या जमिनींच्या नावावर व्यापार मांडला जाताे, त्या जमिनी खऱ्या अर्थाने मुस्लीम बांधवांच्या असतील तर त्यांच्याकडे द्यायच्या. त्याच्यावर अतिक्रमण झाले असेल तर कायदेशीर गाेष्टी करायच्या यासाठी आणलेले ते विधेयक आहे. परंतु, खाेटे बाेलून आपल्याकडे जी मुस्लीम धर्माची मते आली आहेत ती परत महायुतीकडे जातील या भीतीने काही लाेक आराेप-प्रत्याराेप करत आहेत. गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना फाेडायची आणि भाजपच्या तत्त्वावर नेऊन ठेवायची, असा आराेप उद्धव सेनेकडून करण्यात आला आहे. यावर मंत्री सामंत म्हणाले की, तुम्ही १०० पैकी ५० तरी निवडून आणायला हवी हाेती. तर आम्ही मान्य केले असते. १०० जागा घेऊन २० जागा निवडून आल्या म्हणजे तुमचा निकाल २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ८० पैकी ६० जागा आम्ही जिंकल्या आहेत. त्यामुळे आमचा निकाल हा ८३ टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले तंताेतंत खरेतत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धाेका हाेता. त्यावेळी त्यांची सुरक्षा वाढवू नयेत असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षाही अचानक एका कार्यक्रमातून काढून घेण्यात आली हाेती. गिरीश महाजन यांनाही मकाेकाखाली अटक करण्याच्या दृष्टीने काही खाेट्या केसेस दाखल केल्या जात हाेत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलेली गाेष्ट तंताेतंत खरी आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwaqf board amendment billवक्फ बोर्डministerमंत्रीUday Samantउदय सामंतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी