शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

वक्फ बोर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र, मंत्री उदय सामंत यांचा महाविकास आघाडीवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:12 IST

एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले तंताेतंत खरे

रत्नागिरी : वक्फ बाेर्ड हे सर्वसामान्य मुस्लीम बांधवांना न्याय देण्यासाठी आणण्यात आले आहे. त्यामुळे खाेटे बाेलून आपल्याकडे आलेली मुस्लीम समाजाची मते पुन्हा महायुतीकडे जातील या भीतीने आराेप-प्रत्याराेप केले जात आहेत. वक्फ बाेर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखल्याचा आराेप राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.मंत्री सामंत रविवारी रत्नागिरी दाैऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून हाेणाऱ्या आराेपात काही तथ्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, वक्फ बाेर्ड मुस्लीम समाजाला किंवा धर्माला त्रास देण्यासाठी आणलेले नाही. उलट सर्वसामान्य मुस्लीम बांधवांना न्याय देण्यासाठी आणलेले आहे.ज्या जमिनींच्या नावावर व्यापार मांडला जाताे, त्या जमिनी खऱ्या अर्थाने मुस्लीम बांधवांच्या असतील तर त्यांच्याकडे द्यायच्या. त्याच्यावर अतिक्रमण झाले असेल तर कायदेशीर गाेष्टी करायच्या यासाठी आणलेले ते विधेयक आहे. परंतु, खाेटे बाेलून आपल्याकडे जी मुस्लीम धर्माची मते आली आहेत ती परत महायुतीकडे जातील या भीतीने काही लाेक आराेप-प्रत्याराेप करत आहेत. गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना फाेडायची आणि भाजपच्या तत्त्वावर नेऊन ठेवायची, असा आराेप उद्धव सेनेकडून करण्यात आला आहे. यावर मंत्री सामंत म्हणाले की, तुम्ही १०० पैकी ५० तरी निवडून आणायला हवी हाेती. तर आम्ही मान्य केले असते. १०० जागा घेऊन २० जागा निवडून आल्या म्हणजे तुमचा निकाल २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ८० पैकी ६० जागा आम्ही जिंकल्या आहेत. त्यामुळे आमचा निकाल हा ८३ टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले तंताेतंत खरेतत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धाेका हाेता. त्यावेळी त्यांची सुरक्षा वाढवू नयेत असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षाही अचानक एका कार्यक्रमातून काढून घेण्यात आली हाेती. गिरीश महाजन यांनाही मकाेकाखाली अटक करण्याच्या दृष्टीने काही खाेट्या केसेस दाखल केल्या जात हाेत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलेली गाेष्ट तंताेतंत खरी आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwaqf board amendment billवक्फ बोर्डministerमंत्रीUday Samantउदय सामंतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी