शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र, मंत्री उदय सामंत यांचा महाविकास आघाडीवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:12 IST

एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले तंताेतंत खरे

रत्नागिरी : वक्फ बाेर्ड हे सर्वसामान्य मुस्लीम बांधवांना न्याय देण्यासाठी आणण्यात आले आहे. त्यामुळे खाेटे बाेलून आपल्याकडे आलेली मुस्लीम समाजाची मते पुन्हा महायुतीकडे जातील या भीतीने आराेप-प्रत्याराेप केले जात आहेत. वक्फ बाेर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखल्याचा आराेप राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.मंत्री सामंत रविवारी रत्नागिरी दाैऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून हाेणाऱ्या आराेपात काही तथ्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, वक्फ बाेर्ड मुस्लीम समाजाला किंवा धर्माला त्रास देण्यासाठी आणलेले नाही. उलट सर्वसामान्य मुस्लीम बांधवांना न्याय देण्यासाठी आणलेले आहे.ज्या जमिनींच्या नावावर व्यापार मांडला जाताे, त्या जमिनी खऱ्या अर्थाने मुस्लीम बांधवांच्या असतील तर त्यांच्याकडे द्यायच्या. त्याच्यावर अतिक्रमण झाले असेल तर कायदेशीर गाेष्टी करायच्या यासाठी आणलेले ते विधेयक आहे. परंतु, खाेटे बाेलून आपल्याकडे जी मुस्लीम धर्माची मते आली आहेत ती परत महायुतीकडे जातील या भीतीने काही लाेक आराेप-प्रत्याराेप करत आहेत. गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना फाेडायची आणि भाजपच्या तत्त्वावर नेऊन ठेवायची, असा आराेप उद्धव सेनेकडून करण्यात आला आहे. यावर मंत्री सामंत म्हणाले की, तुम्ही १०० पैकी ५० तरी निवडून आणायला हवी हाेती. तर आम्ही मान्य केले असते. १०० जागा घेऊन २० जागा निवडून आल्या म्हणजे तुमचा निकाल २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ८० पैकी ६० जागा आम्ही जिंकल्या आहेत. त्यामुळे आमचा निकाल हा ८३ टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले तंताेतंत खरेतत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धाेका हाेता. त्यावेळी त्यांची सुरक्षा वाढवू नयेत असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षाही अचानक एका कार्यक्रमातून काढून घेण्यात आली हाेती. गिरीश महाजन यांनाही मकाेकाखाली अटक करण्याच्या दृष्टीने काही खाेट्या केसेस दाखल केल्या जात हाेत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलेली गाेष्ट तंताेतंत खरी आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwaqf board amendment billवक्फ बोर्डministerमंत्रीUday Samantउदय सामंतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी