शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका; मोर्चा काढणाऱ्यांना म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:04 IST

सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध

रत्नागिरी : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत बैठक बोलावली आणि मंत्र्यांची समिती स्थापन करण्याची सूचना केली. असे प्रथमच झाले आहे. मात्र या वादातून सरकारला बदनाम करण्यासाठी पडद्यामागून डाव रचले जात असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केली. सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील ८०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीमध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार योगेश सामंत, उद्योजक किरण सामंत, बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोणकोणत्या कामांचे डिजिटल भूमिपूजन होत आहे, याची चित्रफीत दाखवण्यात आली.मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकार स्थापनेपासूनच्या सर्व घटनांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, निसर्गरम्य अशा कोकणात आल्यानंतर बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण बाळासाहेबांनीही कोकणावर प्रेम केलं आणि कोकणी माणसानेही बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केले. कोकण आणि बाळासाहेब हे एक वेगळे समीकरण झाले होते. आता बाळासाहेब आपल्यात नसले तरीही त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यांचे हिंदुत्ववादी विचार आपल्यासोबत आहेत.

तेच विचार कोकणच्या मातीमध्ये अगदी मुळापर्यंत रुजले आहेत आणि बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार कोणीही, कितीही पुसण्याचा प्रयत्न केला, इतर पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला तर आमचा कोकणी माणूस तो पुसू देऊन देणार नाही आणि नष्ट करून देणार नाही. जर कोणी असा प्रयत्न केला तर नक्की तो नाठाळाच्या डोक्यात कोकणातला नारळ फोडल्याशिवाय राहणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी हाणला.आधीच्या सरकारच्या काळात अनेक कामे मार्गी लागलीच नाहीत. शासकीय नोकर भरती पूर्ण बंद होती. आता आपल्या सरकारने ७५ हजार लोकांची शासकीय भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी हे सगळं बंद होते. आता ही सभा बघून, धडाकेबाज निर्णय बघून मोर्चा काढतील, असे सांगतानाच काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा असा टोला हसत हसत मारला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकEknath Shindeएकनाथ शिंदे