शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका; मोर्चा काढणाऱ्यांना म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:04 IST

सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध

रत्नागिरी : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत बैठक बोलावली आणि मंत्र्यांची समिती स्थापन करण्याची सूचना केली. असे प्रथमच झाले आहे. मात्र या वादातून सरकारला बदनाम करण्यासाठी पडद्यामागून डाव रचले जात असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केली. सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील ८०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीमध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार योगेश सामंत, उद्योजक किरण सामंत, बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोणकोणत्या कामांचे डिजिटल भूमिपूजन होत आहे, याची चित्रफीत दाखवण्यात आली.मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकार स्थापनेपासूनच्या सर्व घटनांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, निसर्गरम्य अशा कोकणात आल्यानंतर बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण बाळासाहेबांनीही कोकणावर प्रेम केलं आणि कोकणी माणसानेही बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केले. कोकण आणि बाळासाहेब हे एक वेगळे समीकरण झाले होते. आता बाळासाहेब आपल्यात नसले तरीही त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यांचे हिंदुत्ववादी विचार आपल्यासोबत आहेत.

तेच विचार कोकणच्या मातीमध्ये अगदी मुळापर्यंत रुजले आहेत आणि बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार कोणीही, कितीही पुसण्याचा प्रयत्न केला, इतर पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला तर आमचा कोकणी माणूस तो पुसू देऊन देणार नाही आणि नष्ट करून देणार नाही. जर कोणी असा प्रयत्न केला तर नक्की तो नाठाळाच्या डोक्यात कोकणातला नारळ फोडल्याशिवाय राहणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी हाणला.आधीच्या सरकारच्या काळात अनेक कामे मार्गी लागलीच नाहीत. शासकीय नोकर भरती पूर्ण बंद होती. आता आपल्या सरकारने ७५ हजार लोकांची शासकीय भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी हे सगळं बंद होते. आता ही सभा बघून, धडाकेबाज निर्णय बघून मोर्चा काढतील, असे सांगतानाच काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा असा टोला हसत हसत मारला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकEknath Shindeएकनाथ शिंदे