शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका; मोर्चा काढणाऱ्यांना म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:04 IST

सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध

रत्नागिरी : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत बैठक बोलावली आणि मंत्र्यांची समिती स्थापन करण्याची सूचना केली. असे प्रथमच झाले आहे. मात्र या वादातून सरकारला बदनाम करण्यासाठी पडद्यामागून डाव रचले जात असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केली. सीमा भागातील मराठी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार कटीबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील ८०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीमध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार योगेश सामंत, उद्योजक किरण सामंत, बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोणकोणत्या कामांचे डिजिटल भूमिपूजन होत आहे, याची चित्रफीत दाखवण्यात आली.मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकार स्थापनेपासूनच्या सर्व घटनांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, निसर्गरम्य अशा कोकणात आल्यानंतर बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण बाळासाहेबांनीही कोकणावर प्रेम केलं आणि कोकणी माणसानेही बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केले. कोकण आणि बाळासाहेब हे एक वेगळे समीकरण झाले होते. आता बाळासाहेब आपल्यात नसले तरीही त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यांचे हिंदुत्ववादी विचार आपल्यासोबत आहेत.

तेच विचार कोकणच्या मातीमध्ये अगदी मुळापर्यंत रुजले आहेत आणि बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार कोणीही, कितीही पुसण्याचा प्रयत्न केला, इतर पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला तर आमचा कोकणी माणूस तो पुसू देऊन देणार नाही आणि नष्ट करून देणार नाही. जर कोणी असा प्रयत्न केला तर नक्की तो नाठाळाच्या डोक्यात कोकणातला नारळ फोडल्याशिवाय राहणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी हाणला.आधीच्या सरकारच्या काळात अनेक कामे मार्गी लागलीच नाहीत. शासकीय नोकर भरती पूर्ण बंद होती. आता आपल्या सरकारने ७५ हजार लोकांची शासकीय भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी हे सगळं बंद होते. आता ही सभा बघून, धडाकेबाज निर्णय बघून मोर्चा काढतील, असे सांगतानाच काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा असा टोला हसत हसत मारला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकEknath Shindeएकनाथ शिंदे