शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात आघाडीतील मारामारीत काँग्रेसच्या ‘हाता’त काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 18:13 IST

तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी

रत्नागिरी : जिल्ह्याच्या राजकारणात गेली ३० वर्षे फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या काँग्रेसने महाविकास आघाडीकडे जिल्ह्यातील पाचपैकी राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण अशा तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी केली आहे. उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात आघाडी म्हणून काँग्रेसच्या ‘हाता’त काय पडणार, असाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.एकेकाळी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या राजकारणात दबदबा असलेल्या काँग्रेसला शिवसेनेचा उदय झाल्यानंतर उतरती कळा लागली. १९९० साली राजापूर विधानसभा मतदारसंघात ॲड. ल. रं. हातणकर विजयी झाले, तो खऱ्या अर्थाने काँग्रेसचा पक्ष म्हणून जिल्ह्यातील शेवटचा विजय होता. त्यानंतरच्या काळात गणपत कदम (राजापूर) आणि सुभाष बने (संगमेश्वर) या दोघांनी काँग्रेसचे आमदार म्हणून विजय मिळवला असला तरी त्यात पक्षापेक्षा त्यांचा वैयक्तिक आणि त्यातही कोकणचे नेते नारायण राणे यांचा हातभार मोठा होता. या दोघांच्या विजयाच्या आधारे काँग्रेसला फार मोठी उभारी घेता आली नाही.

१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी चूल मांडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस अधिकच क्षीण झाली. १९९९, २००४ आणि २००९ अशी सलग १५ वर्षे राज्यातील सत्ता काँग्रेस आघाडीकडे होती. पण, या काळातही जिल्ह्यात काँग्रेसला उभारी घेता आली नाही. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात चांगले स्थान मिळवले. शिवसेनेच्या खालोखाल राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि विधानसभेच्या पटलावरही आपला प्रभाव दाखवला.गेल्या काही वर्षांत हुस्नबानू खलिफे आणि जमीर खलिफे यांच्या रुपाने राजापुरात काँग्रेस टिकून आहे. त्याच्या खेरीज चिपळूण शहरात काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवले आहे. अन्य कोठेही काँग्रेसची ताकद फार मोठी नाही. अर्थात राजापूर आणि चिपळूणच्या ग्रामीण भागातही शिवसेनेचे वर्चस्व कायमच अबाधित राहले आहे. त्यामुळेच १९९० नंतर पक्ष म्हणून काँग्रेसला कधीही विजय मिळाला नाही. हातणकर यांचा विजय त्यांची वैयक्तिक निष्कलंक प्रतिमा आणि तळागाळात रुजलेव्या काँग्रेसचा होता. त्यानंतर काँग्रेसला ते जुने दिवस कधीही दिसलेले नाहीत.आता महाविकास आघाडीच्या निमित्ताने निम्मी शिवसेना आणि निम्मी राष्ट्रवादी सोबत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघ मिळावेत, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस