शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात आघाडीतील मारामारीत काँग्रेसच्या ‘हाता’त काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 18:13 IST

तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी

रत्नागिरी : जिल्ह्याच्या राजकारणात गेली ३० वर्षे फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या काँग्रेसने महाविकास आघाडीकडे जिल्ह्यातील पाचपैकी राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण अशा तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी केली आहे. उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात आघाडी म्हणून काँग्रेसच्या ‘हाता’त काय पडणार, असाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.एकेकाळी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या राजकारणात दबदबा असलेल्या काँग्रेसला शिवसेनेचा उदय झाल्यानंतर उतरती कळा लागली. १९९० साली राजापूर विधानसभा मतदारसंघात ॲड. ल. रं. हातणकर विजयी झाले, तो खऱ्या अर्थाने काँग्रेसचा पक्ष म्हणून जिल्ह्यातील शेवटचा विजय होता. त्यानंतरच्या काळात गणपत कदम (राजापूर) आणि सुभाष बने (संगमेश्वर) या दोघांनी काँग्रेसचे आमदार म्हणून विजय मिळवला असला तरी त्यात पक्षापेक्षा त्यांचा वैयक्तिक आणि त्यातही कोकणचे नेते नारायण राणे यांचा हातभार मोठा होता. या दोघांच्या विजयाच्या आधारे काँग्रेसला फार मोठी उभारी घेता आली नाही.

१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी चूल मांडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस अधिकच क्षीण झाली. १९९९, २००४ आणि २००९ अशी सलग १५ वर्षे राज्यातील सत्ता काँग्रेस आघाडीकडे होती. पण, या काळातही जिल्ह्यात काँग्रेसला उभारी घेता आली नाही. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात चांगले स्थान मिळवले. शिवसेनेच्या खालोखाल राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि विधानसभेच्या पटलावरही आपला प्रभाव दाखवला.गेल्या काही वर्षांत हुस्नबानू खलिफे आणि जमीर खलिफे यांच्या रुपाने राजापुरात काँग्रेस टिकून आहे. त्याच्या खेरीज चिपळूण शहरात काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवले आहे. अन्य कोठेही काँग्रेसची ताकद फार मोठी नाही. अर्थात राजापूर आणि चिपळूणच्या ग्रामीण भागातही शिवसेनेचे वर्चस्व कायमच अबाधित राहले आहे. त्यामुळेच १९९० नंतर पक्ष म्हणून काँग्रेसला कधीही विजय मिळाला नाही. हातणकर यांचा विजय त्यांची वैयक्तिक निष्कलंक प्रतिमा आणि तळागाळात रुजलेव्या काँग्रेसचा होता. त्यानंतर काँग्रेसला ते जुने दिवस कधीही दिसलेले नाहीत.आता महाविकास आघाडीच्या निमित्ताने निम्मी शिवसेना आणि निम्मी राष्ट्रवादी सोबत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघ मिळावेत, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस