शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

रत्नागिरी जिल्हा बँकेच्या घरडा येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ, ९०० परीक्षार्थ्यांची परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 12:23 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७९ पदांसाठी तब्बल ८ हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत

खेड : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी रविवारी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. खेड तालुक्यातील घरडा येथील परीक्षेच्या केंद्रावरील इंटरनेट सुविधा बंद पडल्याने या परीक्षा केंद्रावर दुपार सत्रात हाेणाऱ्या परीक्षेदरम्यान गाेंधळ झाला. त्यामुळे ९०० परीक्षार्थ्यांची गैरसोय झाली. मात्र, जिल्ह्यातील उर्वरित परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७९ पदांसाठी तब्बल ८ हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेसाठी खेड येथील घरडा महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते. या परीक्षा केंद्रावर ९०० परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेसाठी लांजा, देवरूख, रत्नागिरी, मंडणगड, दापाेली, खेडसह अन्य भागांतील परीक्षार्थी आले हाेते. नियोजित वेळापत्रकापूर्वीच सकाळी उमेदवार परीक्षा केंद्रावर दाखल झाले हाेते.परंतु, परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या उमेदवारांना अचानक परीक्षा होणार नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. इंटरनेट समस्या निर्माण झाल्यामुळे ही परीक्षा रद्द केल्याचे सांगण्यात आले. मात्र, चिपळूण येथे विप्रो, देवरुखातील आंबव पॉलिटेक्निक महाविद्यालय आणि खेडमधील ज्ञानदीप येथील परीक्षा केंद्रावरील परीक्षा सुरळीत पार पडल्या.

रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून घरडा महाविद्यालयातील इंटरनेट सेवा ठप्प हाेती. त्यामुळे उमेदवारांची परीक्षा हाेऊ शकली नाही. एका बॅचचे २७० विद्यार्थी अशा एकूण ९०० विद्यार्थ्यांची याच केंद्रावर येत्या दाेन दिवसांत परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले आहे.

घरडा येथील परीक्षा केंद्रावर जिल्ह्याच्या बाहेरूनही परीक्षार्थी आलेले होते. दुपारी एकच्या बॅचच्या परीक्षार्थींना दोन तास आधी परीक्षा केंद्रावर बोलवण्यात आलेले होते. परंतु, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याचे कारण देत परीक्षार्थींना पुन्हा परत पाठवण्यात आले. सकाळी दहाची वेळ असलेल्या परीक्षार्थींची परीक्षा घेण्यात आली. परंतु, दुपारी एक आणि सायंकाळी चारच्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्राच्या गोंधळामुळे घरी परत जावे लागले. गणपतीनंतर तुम्हाला तारीख देऊ, असे सांगण्यात आले आहे. - सिद्धेश प्रकाश साळवी, परीक्षार्थीचे पालक.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाbankबँकStudentविद्यार्थी