शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

वातावरणातील बदलाने चिंता वाढली, शेतीसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

By शोभना कांबळे | Updated: January 10, 2024 15:45 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. एेन थंडीच्या हंगामात सोमवारी मध्यरात्रीपासून अवेळी पावसाने ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. एेन थंडीच्या हंगामात सोमवारी मध्यरात्रीपासून अवेळी पावसाने हजेरी लावली होती. दोन दिवस जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा प्रतिकूल परिणाम आंबा हंगामावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. या वातावरणाने बागायतदारांबरोबरच नागरिकांचीही चिंता वाढवली आहे.जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका असतो; परंतु सध्या वातावरणातील बदलामुळे सोमवारी (दि.८) मध्यरात्रीनंतर थंडीऐवजी अवकाळी पावसाचा मेघगर्जनेसह जोरदार वर्षाव जिल्ह्यात झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाऊस पडेल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, दिवसभर मळभच होते. मात्र, काहीसा गारवा जाणवत होता. बुधवारीही सकाळपासूनच पावसाची शक्यता वाटत असली तरीही मळभाचे वातावरण कायम आहे.उत्तरेकउील शीत लहरींचा प्रभाव कमी झाल्याने कोकण किनारपट्टीपरील भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे; मात्र सध्या पावसाला अनुकूल असलेले वातावरण तयार होत असल्याने हवामान खात्याने कोकणासह महाराष्ट्रात अवेळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे काही दिवस कोकणात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.जानेवारी महिना थंडीचा महिना समजला जातो; परंतु सध्या वातावरणात चमत्कारिक बदल दिसू लागले आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. सर्दी - खोकला, तापसरी याबरोबरच श्वसनाचे विकारही वाढले आहेत. त्याचबरोबर सध्या आंबा, काजू फळपिके मोहोर धरू लागला आहे.आंबा, काजू या फळपिकांना मोहोर येऊ लागला आहे. परंतु सध्याच्या या मळभाच्या वातावरणामुळे या पिकांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बागायतदारांचीही चिंता अधिकच वाढली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरी