शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

वातावरणातील बदलाने चिंता वाढली, शेतीसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

By शोभना कांबळे | Updated: January 10, 2024 15:45 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. एेन थंडीच्या हंगामात सोमवारी मध्यरात्रीपासून अवेळी पावसाने ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. एेन थंडीच्या हंगामात सोमवारी मध्यरात्रीपासून अवेळी पावसाने हजेरी लावली होती. दोन दिवस जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा प्रतिकूल परिणाम आंबा हंगामावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. या वातावरणाने बागायतदारांबरोबरच नागरिकांचीही चिंता वाढवली आहे.जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका असतो; परंतु सध्या वातावरणातील बदलामुळे सोमवारी (दि.८) मध्यरात्रीनंतर थंडीऐवजी अवकाळी पावसाचा मेघगर्जनेसह जोरदार वर्षाव जिल्ह्यात झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाऊस पडेल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, दिवसभर मळभच होते. मात्र, काहीसा गारवा जाणवत होता. बुधवारीही सकाळपासूनच पावसाची शक्यता वाटत असली तरीही मळभाचे वातावरण कायम आहे.उत्तरेकउील शीत लहरींचा प्रभाव कमी झाल्याने कोकण किनारपट्टीपरील भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे; मात्र सध्या पावसाला अनुकूल असलेले वातावरण तयार होत असल्याने हवामान खात्याने कोकणासह महाराष्ट्रात अवेळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे काही दिवस कोकणात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.जानेवारी महिना थंडीचा महिना समजला जातो; परंतु सध्या वातावरणात चमत्कारिक बदल दिसू लागले आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. सर्दी - खोकला, तापसरी याबरोबरच श्वसनाचे विकारही वाढले आहेत. त्याचबरोबर सध्या आंबा, काजू फळपिके मोहोर धरू लागला आहे.आंबा, काजू या फळपिकांना मोहोर येऊ लागला आहे. परंतु सध्याच्या या मळभाच्या वातावरणामुळे या पिकांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बागायतदारांचीही चिंता अधिकच वाढली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरी