शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलाने चिंता वाढली, शेतीसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

By शोभना कांबळे | Updated: January 10, 2024 15:45 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. एेन थंडीच्या हंगामात सोमवारी मध्यरात्रीपासून अवेळी पावसाने ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. एेन थंडीच्या हंगामात सोमवारी मध्यरात्रीपासून अवेळी पावसाने हजेरी लावली होती. दोन दिवस जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा प्रतिकूल परिणाम आंबा हंगामावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. या वातावरणाने बागायतदारांबरोबरच नागरिकांचीही चिंता वाढवली आहे.जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका असतो; परंतु सध्या वातावरणातील बदलामुळे सोमवारी (दि.८) मध्यरात्रीनंतर थंडीऐवजी अवकाळी पावसाचा मेघगर्जनेसह जोरदार वर्षाव जिल्ह्यात झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाऊस पडेल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, दिवसभर मळभच होते. मात्र, काहीसा गारवा जाणवत होता. बुधवारीही सकाळपासूनच पावसाची शक्यता वाटत असली तरीही मळभाचे वातावरण कायम आहे.उत्तरेकउील शीत लहरींचा प्रभाव कमी झाल्याने कोकण किनारपट्टीपरील भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे; मात्र सध्या पावसाला अनुकूल असलेले वातावरण तयार होत असल्याने हवामान खात्याने कोकणासह महाराष्ट्रात अवेळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे काही दिवस कोकणात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.जानेवारी महिना थंडीचा महिना समजला जातो; परंतु सध्या वातावरणात चमत्कारिक बदल दिसू लागले आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. सर्दी - खोकला, तापसरी याबरोबरच श्वसनाचे विकारही वाढले आहेत. त्याचबरोबर सध्या आंबा, काजू फळपिके मोहोर धरू लागला आहे.आंबा, काजू या फळपिकांना मोहोर येऊ लागला आहे. परंतु सध्याच्या या मळभाच्या वातावरणामुळे या पिकांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बागायतदारांचीही चिंता अधिकच वाढली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरी